शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रुंदीकरण नेमके कशासाठी?; सुशोभीकरणासाठी पालिकेकडून ८ कोटी २२ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 12:32 AM

भाईंदर पश्चिमेस अरुंद रस्त्यामुळे कोंडी होत होती.

भाईंदर: भाईंदर पश्चिमेस अरुंद रस्त्यामुळे कोंडी होत होती. ती फोडण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण केले. यासाठी तेथील बांधकामे पाडली. पण, रुंदीकरणाच्या नावाखाली मोकळ्या केलेल्या रस्त्याच्या जागेत सुशोभीकरणासाठी तब्बल आठ कोटी २२ लाखांच्या खर्चाचे बांधकाम सुरू करून रुंदीकरणाला महापालिकेने हरताळ फासला आहे.

भाईंदर पश्चिमेतील रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर अतिशय अरुंद होता. त्यातच, वाढती लोकसंख्या व वाढत्या वाहनांमुळे या भागात नेहमीच कोंडी होते. या ठिकाणी मीरा-भार्इंदर महापालिका परिवहन उपक्रम, बेस्ट, एसटी महामंडळाच्या बस तसेच मोठ्या संख्येने रिक्षांची वर्दळ असते. शिवाय, दुचाकी व चारचाकींसह खाजगी बस मोठ्या संख्येने येतात. त्यात फेरीवाल्यांची भर पडली आहे. भाईंदर पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या जेसलपार्क येथील शहीद भगतसिंह भुयारी मार्गामुळे तर वाहतूककोंडी वाढली आहे. रेल्वे पुलावर चढताना वा उतरताना प्रवेशद्वारावरच रिक्षाचालकांचे अतिक्रमण असते.

रेल्वेस्थानक परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेने येथील केंद्र सरकारच्या मीठ विभागाचे जुने बांधकाम व भिंत बळजबरीने तोडून टाकली. त्याविरोधात पालिकेच्या अधिकाऱ्यांवर सरकारने भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. याच भागात असणारी जुनी दुकाने व बार आदी महापालिकेने राजकीय दबावाखाली रीतसर कार्यवाही न करता बळजबरीने पाडले. त्यावेळी भाजपसह तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांनी श्रेयही घेतले.

रुंदीकरण केलेल्या जागेत पालिकेने डांबरीकरण केले. परंतु, रुंदीकरण केलेल्या जागेत मेहतांच्या भाजपप्रणीत रिक्षा संघटनेचा फलक लागला व रिक्षातळही सुरू झाला. उर्वरित जागेत पुन्हा हातगाडीवाले बसू लागले तसेच रिक्षा उभ्या राहू लागल्या. आजही रिक्षा थेट रेल्वे पुलाच्या जिन्याच्या प्रवेशद्वारावरच लावल्या जातात.

१५ टक्के जास्त दराने निविदा मंजूर सुशोभीकरणाच्या कामासाठी रुणुजा देव कॉर्पोरेशनला हे कंत्राट दिले आहे. या कामाची अंदाजित रक्कम सात कोटी १५ लाख असताना पालिकेने तब्बल १५ टक्के जास्त दराने निविदा मंजूर केली आहे. म्हणजेच, हे काम तब्बल आठ कोटी २२ लाखांच्या घरात गेले आहे. १३ सप्टेंबर २०१९ ला पालिकेने कार्यादेश दिला असून कामाची मुदत सहा महिन्यांची आहे. म्हणजेच, १२ मार्चआधी काम पूर्ण करायचे आहे.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र