शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

परवानगी दिली नाही तरी पाणी देऊ; महापालिकेची वनविभागाविरुद्ध आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 05:50 IST

मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत.

ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा भागातील आदिवासी पाड्यावरील सुमारे दोन हजार नागरिकांना अद्याप शुद्ध पाणी मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध करताच ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागाचे धाबे दणाणले. दोन दिवसांत या भागाची पाहणी करून वनविभागाच्या सहकार्याने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. वनविभागाने जलवाहिनी टाकण्यास परवानगी दिली नाही तरी ती टाकली जाईल, अशी ग्वाही महापालिकेने दिली.

मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत. मात्र, त्याला गढूळ पाणी येत असून, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. दोन वर्षांपासून महापालिकेने येथे जलवाहिनी टाकली, पण त्याला एक थेंबही पाणी येत नसल्याने येथील लोकांना डबक्यातील अशुद्ध पाणी प्यावे लागते. ठाण्यासारख्या प्रगत शहरातील या भीषण वास्तवाचे दर्शन घडवणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला. 

ज्या शाळेजवळ जलवाहिनी पोहोचली आहे, तेथून ती पुढे नेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून काम केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय या भागाची दोन दिवसांत पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

शाळेपासून जलवाहिनी पुढे नेण्याचे नियोजन करणार आहे. मात्र, वनविभागाचा अडसर असल्याने पुढे काम करता येत नव्हते. मात्र, आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून लवकर या भागाची पाण्याची समस्या सोडविली जाईल.- विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग 

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका