शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी दिली नाही तरी पाणी देऊ; महापालिकेची वनविभागाविरुद्ध आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 05:50 IST

मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत.

ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा भागातील आदिवासी पाड्यावरील सुमारे दोन हजार नागरिकांना अद्याप शुद्ध पाणी मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध करताच ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागाचे धाबे दणाणले. दोन दिवसांत या भागाची पाहणी करून वनविभागाच्या सहकार्याने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. वनविभागाने जलवाहिनी टाकण्यास परवानगी दिली नाही तरी ती टाकली जाईल, अशी ग्वाही महापालिकेने दिली.

मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत. मात्र, त्याला गढूळ पाणी येत असून, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. दोन वर्षांपासून महापालिकेने येथे जलवाहिनी टाकली, पण त्याला एक थेंबही पाणी येत नसल्याने येथील लोकांना डबक्यातील अशुद्ध पाणी प्यावे लागते. ठाण्यासारख्या प्रगत शहरातील या भीषण वास्तवाचे दर्शन घडवणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला. 

ज्या शाळेजवळ जलवाहिनी पोहोचली आहे, तेथून ती पुढे नेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून काम केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय या भागाची दोन दिवसांत पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

शाळेपासून जलवाहिनी पुढे नेण्याचे नियोजन करणार आहे. मात्र, वनविभागाचा अडसर असल्याने पुढे काम करता येत नव्हते. मात्र, आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून लवकर या भागाची पाण्याची समस्या सोडविली जाईल.- विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग 

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका