शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परवानगी दिली नाही तरी पाणी देऊ; महापालिकेची वनविभागाविरुद्ध आक्रमक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 05:50 IST

मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत.

ठाणे : घोडबंदर भागातील पानखंडा भागातील आदिवासी पाड्यावरील सुमारे दोन हजार नागरिकांना अद्याप शुद्ध पाणी मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध करताच ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागाचे धाबे दणाणले. दोन दिवसांत या भागाची पाहणी करून वनविभागाच्या सहकार्याने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. वनविभागाने जलवाहिनी टाकण्यास परवानगी दिली नाही तरी ती टाकली जाईल, अशी ग्वाही महापालिकेने दिली.

मागील कित्येक वर्षांपासून पानखंडा, देवाचा पाडा, बदानी पाडा येथील रहिवासी पाण्यासाठी तीन बोअरवेलवर अवलंबून आहेत. मात्र, त्याला गढूळ पाणी येत असून, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. दोन वर्षांपासून महापालिकेने येथे जलवाहिनी टाकली, पण त्याला एक थेंबही पाणी येत नसल्याने येथील लोकांना डबक्यातील अशुद्ध पाणी प्यावे लागते. ठाण्यासारख्या प्रगत शहरातील या भीषण वास्तवाचे दर्शन घडवणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला. 

ज्या शाळेजवळ जलवाहिनी पोहोचली आहे, तेथून ती पुढे नेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून काम केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय या भागाची दोन दिवसांत पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

शाळेपासून जलवाहिनी पुढे नेण्याचे नियोजन करणार आहे. मात्र, वनविभागाचा अडसर असल्याने पुढे काम करता येत नव्हते. मात्र, आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून लवकर या भागाची पाण्याची समस्या सोडविली जाईल.- विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग 

टॅग्स :WaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका