शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे कोंडीची स्थिती ‘जैसे थे’; आता जीवानिशी गेल्यावर जाग येणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 06:19 IST

कल्याण-डोंबिवली शहरात अरुंद रस्ते, जागोजागी अतिक्रमण करणारे फेरीवाले यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर गर्दीच्या वेळी पाय ठेवायलाही जागा नसते

प्रशांत माने, डोंबिवलीकल्याण-डोंबिवलीकरांसाठी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा मुद्दा नवीन नाही. आमचे पुनर्वसन व्हावे, अशी मागणी फेरीवाल्यांकडून सातत्याने होत आहे. मात्र, केडीएमसीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. अतिक्रमणामुळे कोंडीची स्थिती ‘जैसे थे’ असताना बसण्याच्या जागेवरून फेरीवाल्यांमध्ये जुंपण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, फेरीवाला धोरण राबविण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे.शहर फेरीवाला समिती ही आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या कार्यकाळात स्थापन झाली होती. त्यानंतर आयुक्त म्हणून आलेले ई. रवींद्रन यांनी फेरीवाल्यांच्या विषयात सकारात्मक दखल घेतली होती. तर विद्यमान आयुक्त गोविंद बोडके यांनीही शहरातील फेरीवाला क्षेत्रातील फेरीवाल्यांना ओळखपत्र व नव्याने जागा देण्याचा निर्णय बैठकीत घेतला होता. पण आजतागायत हा निर्णय अंमलबजावणीअभावी कागदावरच राहिला आहे. दरम्यान, केडीएमसीकडून २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षण यादीत असलेल्या फेरीवाल्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा मार्ग खरे तर मोकळा झाला आहे. पण, विलंबाचे कारण काय? याचे गूढ कायम आहे. फेरीवाला सर्वेक्षणानुसार महापालिका हद्दीत नऊ हजार ५३१ फेरीवाले आहेत. सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिका त्यांना ओळखपत्र तसेच व्यवसायासाठी जागा ठरवून देणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले याप्रमाणे काही ठिकाणी पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. धार्मिक स्थळे, महाविद्यालये, शाळा, सरकारी कार्यालयांपासून १०० मीटर अंतरापर्यंतही व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई केली आहे. पण, केडीएमसीकडून ठोस अंमलबजावणीला आजतागायत सुरुवात झालेली नाही. फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. एकीकडे रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांना व्यवसाय क रण्यास मज्जाव केला असला तरी न्यायालयाच्या आदेशाची ऐशीतैशी झाल्याची प्रचिती कल्याण आणि डोंबिवलीमधील स्कायवॉकवरील वास्तव पाहता येते. फेरीवाला अतिक्रमणविरोधी पथकांच्या कृपाशीर्वादाने स्कायवॉकवर काही फेरीवाल्यांनी ठाण मांडले असताना जे फेरीवाले मनाई केलेल्या क्षेत्राच्या बाहेर प्रामाणिकपणे व्यवसाय करतात त्यांना मात्र विरोधाला सामोरे जावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. दुकानदारांकडून तसेच वाहन पार्क करणाऱ्यांकडून त्यांना विरोध होत आहे. त्यामुळे १५० मीटरच्या परिक्षेत्राबाहेर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांचा रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे.

फेरीवाल्यांना बसू दिले जात नसल्याने वादविवादाचे प्रसंग सातत्याने घडत आहेत. डोंबिवलीतील फडके रोडवर मध्यंतरी फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करणारे बेकायदा फलकही लावले गेले होते. त्यामुळे लवकर पुनर्वसन व्हावे आणि आम्हाला आमची हक्काची जागा मिळावी, अशी मागणी फेरीवाले करत असले तरी दुसरीकडे बसण्याच्या जागेवरून फेरीवाले आता एकमेकांच्या जीवावरही उठले आहेत.

पूर्वेकडील रेल्वे स्थानक नजीक असलेल्या शिवसेना शाखेसमोर पदपथावर बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात सलाउद्दीन सिद्दिकी शेख या फेरीवाल्याने जाफर अली इंद्रिसी या फेरीवाल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मागील आठवड्यातील सोमवारच्या बाजारात घडली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न करणाºया सलाउद्दीनला रामनगर पोलिसांनी अटक केली. बसण्याच्या जागेवरून जीवघेणी झालेली मारहाण ही गंभीर बाब आहे.

हल्ला करणारा आणि जखमी झालेला हे दोघेही फेरीवाले कुर्ला आणि वांद्रे येथील राहणारे आहेत. व्यवसाय करण्यासाठी बाहेरून डोंबिवलीत येणारे बहुतांश फेरीवाले हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, याचा नमुनाही या हल्ल्यातून दिसला. बाहेरचे फेरीवाले स्थानिक फेरीवाल्यांवरही दादागिरी करतात. याआधीही बसण्याच्या जागेवरून तसेच व्यवसाय करण्यावरून स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असे वाद झाले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हेही दाखल झाले आहेत. वादावादी, हल्ल्यांचे प्रकार सुरूच राहिले आहेत. या वाढत्या घटनांची गांभीर्याने दखल महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी घेतली पाहिजे. फेरीवाल्यांनाही रोजगाराचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. पण त्यासाठी आखून दिलेल्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.नुकत्याच घडलेल्या घटनेवरून तरी शहाणे बनून तातडीने महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तेव्हाच कुठेतरी बाहेरील फेरीवाल्यांचे लोंढे थांबून स्थानिकांना न्याय मिळेल. अन्यथा अतिक्र मणाचे चित्र कायम राहून वादाचे आणि हल्ल्यांचे प्रकार सुरूच राहतील, यात शंका नाही.कल्याण-डोंबिवली शहरात अरुंद रस्ते, जागोजागी अतिक्रमण करणारे फेरीवाले यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर गर्दीच्या वेळी पाय ठेवायलाही जागा नसते. शिवाय रस्ते, पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या आणखीनच बिकट होत आहे. जागेवरून दररोज उडणारे खटके जीवघेण्या हाणामारीपर्यंत पोहचल्या आहेत. या बसण्याच्या जागेच्या वादातून नुकतीच डोंबिवलीत फेरीवाल्यावर झालेला हल्ला हा पुढील धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे कुणाचा तरी जीव गेल्यावरच फेरीवाला धोरण राबवण्यासंदर्भात केडीएमसीला जाग येणार का, असा सवाल करण्यात येत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका