शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांवरुन संप सुरू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 22:58 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ सप्टेंबर २०१५ पासुन कंत्राटी पध्दतीवर स्थानिक परिवहन विभागात काम करणा-या सुमारे २७५ कर्मचाऱ्यांना किमान वेतनातील फरक, वेळेवर वेतन न देण्यासह भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजनेचा लाभ अनेकदा मागण्या करुनही देण्यास विलंब लावल्याने कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांवरुन शुक्रवारी दुपारी ३ वाजल्यापासुन बेमुदत संप पुकारला आहे. 

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ सप्टेंबर २०१५ पासुन कंत्राटी पध्दतीवर स्थानिक परिवहन विभागात काम करणा-या सुमारे २७५ कर्मचाऱ्यांना किमान वेतनातील फरक, वेळेवर वेतन न देण्यासह भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजनेचा लाभ अनेकदा मागण्या करुनही देण्यास विलंब लावल्याने कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांवरुन शुक्रवारी दुपारी ३ वाजल्यापासुन बेमुदत संप पुकारला आहे. 

कर्मचाऱ्यांनी संप करु नये, यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारी श्रमिक जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र मेहता व पदाधिकारी तसेच परिवहन सेवा कंत्राटदाराची रात्री उशीरापर्यंत बैठक सुरु होती. मात्र त्यात तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवल्याचे सांगण्यात आले. यामुळे सायंकाळी ऐन गर्दीच्यावेळी कामावरुन घरी परतणाऱ्या विशेषत: उत्तन परिसरात जाणाऱ्यांचे मात्र चांगलेच हाल झाले. त्यांना रिक्षा व खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. पालिकेने २०१५ मध्ये जीसीसी (ग्रॉस कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट) संकल्पनेवर आधारित स्थानिक परिवहन सेवा सुरु करण्याच्या कार्यवाहीला विलंब लावल्याने सध्या ती कंत्राटी पद्धतीवर सेवा चालविण्यात येत आहे. त्यात सुमारे २७५ वाहक, चालक, अधिकारी व तांत्रिक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. सरकारी नियमानुसार सर्व श्रेणीतील कर्मचारी व कामगारांना भविष्य निर्वाह निधी, किमान वेतन, कामगार विमा योजना आदींचा लाभ दिला जातो. परंतु, पालिकेच्या स्थानिक परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना २०१५ पासुन त्याचा लाभ देण्यात आलेला नाही. तसेच २०१६ पासुन किमान वेतनातील फरकही अद्याप अदा करण्यात आलेला नाही. इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना दिले जात नाहीत. कर्मचाऱ्यांना वेतनाची पावती दिली जात नसुन दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत वेतन मिळणे अपेक्षित असतानाही ते वेळेवर दिले जात नाही. डिसेंबर महिन्यातील वेतन दोन दिवसांपुर्वीच देण्यात आले असले तरी ते अर्धेच देण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या कारभारावर प्रशासनाचा अंकुश नसल्यानेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर गांभीर्य दाखविले जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. या मागण्या गेल्या दोन वर्षांपासुन प्रलंबित असताना कर्मचाऱ्यांनी  संघटनेच्या माध्यमातुन प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. यापुर्वी ३० नोव्हेंबर, ७ व १६ डिसेंबरला प्रशासनाला लेखी पत्र देऊन तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. त्यावरही गांभीर्य न दाखविल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याचे संघटनेचे सरचिटणीस प्रभाकर गायकवाड यांनी सांगितले. यावर अद्याप आयुक्तांसोबत चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक