शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

वीज ग्राहकांकडे ३९१ कोटी रुपयांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) आठ लाख ७९ ग्राहकांकडे वीज बिलाची ३९१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : महावितरणच्या कल्याण परिमंडळात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) आठ लाख ७९ ग्राहकांकडे वीज बिलाची ३९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे व अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनियुक्त मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

कल्याण परिमंडळातील विजेची हानी कमी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी परिमंडळातील अधिकारी, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, मीटर रीडिंग, वीज बिल वाटप व पायाभूत सुविधा उभारणाऱ्या एजन्सीज समवेत संवाद साधून आगामी कामांबाबत भूमिका मांडली.

कल्याण-डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण मंडळ कार्यालय एक अंतर्गत एक लाख ६७ हजार ३२३ ग्राहकांकडे ३८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीज बिल थकीत आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड व ठाणे जिल्ह्यांचा ग्रामीण समाविष्ट असलेल्या कल्याण मंडळ कार्यालय दोनमधील दोन लाख ४७ हजार ९९ ग्राहकांकडे १८३ कोटींची थकबाकी आहे. वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे या वसई मंडळातील तीन लाख २६ हजार १३२ ग्राहकांकडे १०३ कोटी ८२ लाख रुपयांची, तर पालघर, डहाणू, बोईसर, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, सफाळे या पालघर मंडळातील एक लाख ३८ हजार ६९५ ग्राहकांकडे ६५ कोटी ३३ लाख रुपयांची वीज बिल थकबाकी आहे.

ग्रामपंचायतींचीही देयके थकीत

ग्रामपंचायतींच्या एक हजार ७१३ पथदीप जोडण्यांचे १२७ कोटी सात लाख आणि पाणीपुरवठा योजनांच्या ९९० जोडण्यांचे दोन कोटी ८६ लाख रुपयांच्या वीज बिल थकीत आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्राधान्याने भरावेत व याची जबाबदारी संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर असल्याचे परिपत्रक शासनाने जारी केलेले आहे. त्यानुसार वीजबिलाचा भरणा न झाल्यास पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून, होणाऱ्या गैरसोयीस संबंधित ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार आहे.

अन्यथा कारवाई करणार

महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व ग्राहकांकडून चालू वीज बिलासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देश औंढेकर यांनी दिले आहेत. त्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीपोटी तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी व अशा ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळल्यास वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाईच्या सक्त सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनीही थकबाकी व फेजोडणी शुल्क भरून विजेचा रीतसर वापर करावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.

----------