शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

निवडणूक विशेष : राहूचा काळ, चंद्राचे स्थान अन् शनीचे बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 04:52 IST

उमेदवार आध्यात्मिक गुरुचरणी : मुहूर्ताची लगबग, बोटात अंगठ्या तर मनगटावर गंडेदोरे

मुरलीधर भवार कल्याण : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास येत्या मंगळवारपासून प्रारंभ होत असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शुभ-अशुभ योगाच्या मार्गदर्शनाकरिता आपापले आध्यात्मिक गुरू-बाबा-बुवा यांच्याकडे धाव घेतली आहे. राजकारणात प्रतिस्पर्धी पक्षातील राहू किंवा स्वपक्षातील केतू यांची पीडा लीलया निष्प्रभ करणारे उमेदवार अर्ज दाखल करताना आपापल्या कुंडलीतील ‘राहूकाळ’ मात्र अवश्य टाळतात. प्रत्येक उमेदवारांचे आध्यात्मिक गुरू हे वेगवेगळे असून त्यांच्या सल्ल्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

डोंबिवलीतील वेदमूर्ती ज्योतिषाचार्य ल.कृ. पारेकर यांनी सांगितले की, राजकीय मंडळी उमेदवारी अर्ज दाखल करताना राहूकाळ टाळतात. दिवसातून सात वेळा राहूची वेळ असते. ती टाळूनच शुभकार्य केले जाते. प्रत्येक उमेदवाराची पत्रिका, रास काय आहे, त्यानुसार त्याचा शुभमुहूर्त काढला जातो. त्यामुळे अमुक एका उमेदवारासाठी अमुक एक दिवस व त्यामधील विशिष्ट काळ हा शुभ असू शकतो. प्रत्येकाच्या राशी, नक्षत्रानुसार चांगला दिवस वेगवेगळा येऊ शकतो. याचबरोबर चौथ्या, आठव्या आणि बाराव्या चंद्राचे स्थान पाहिले जाते. चंद्र व गुरूचे बळ अर्ज दाखल करताना पाहिले जाते. राजकीय मंडळींचा शनी व रवी चांगला असावा लागतो. तो केव्हा चांगला आहे, याची खात्री करून ते शुभकार्याचा आरंभ करतात.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल असून पक्षातील एखादा असंतुष्ट राहू-केतू बंडखोरी करून अर्ज दाखल करून राशीला येऊ नये, याकरिता अनेक मंडळी शेवटच्या दिवशी अर्ज भरतात. त्यामुळे बहुतांश उमेदवार हे दि. ८ अथवा ९ एप्रिल रोजी आपल्याला अनुकूल ग्रहमान केव्हा आहे, तेच पाहणार आहेत. ग्रहमान अनुकूल असले, तर अनुष्ठान करण्याची गरज नसते. मात्र, बहुतांश राजकीय व्यक्ती उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनुष्ठान करतात. दोन ते तीन प्रकारचे अनुष्ठान केले जाते. त्याकरिता, वेळ पाहिली जाते. अनेक राजकीय नेते जाहीरपणे आम्ही काही मानत नाही, अशा वल्गना करत असले, तरी प्रत्यक्षात बहुतांश नेते हातामध्ये गुरू, शनी, पाचू असे खडे घालतात. बऱ्याचदा त्यांच्या आध्यात्मिक गुरूंनी हे त्यांना घालण्याचा सल्ला दिलेला असतो.कल्याण लोकसभा मतदारसंघातील एक उमेदवार साईभक्त आहेत, तर भिवंडीतील एका उमेदवाराचे कुलदैवत खंडोबा असल्याने तेथे नारळ फोडून ते उमेदवारी अर्ज भरण्याची चर्चा आहे. कल्याणमधील एक उमेदवार गादीचा आदेश आल्याशिवाय पुढचे पाऊल टाकत नाही.मतदारसंघातील मतदारांवर जर एखाद्या आध्यात्मिक गुरूचा प्रभाव असेल, तर सर्वच उमेदवार त्या गुरूच्या आशीर्वादाकरिता जातात. प्रचाराच्या काळात मंदिर, मशीद, गुरुद्वारा वगैरे धार्मिक स्थळांवर माथा टेकण्याकरिता उमेदवारांना जावेच लागते.पाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या कर्माला धर्माची जोड दिली, तरच निभाव लागेल, यावर बहुतांश उमेदवारांचा विश्वास असल्याने निवडणूक काळात उमेदवारांच्या हातात गंडे, दोरे, तावीज, अंगठ्या, गळ्यात माळा वगैरे दिसते. अर्थात, एखाद्या मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांनी आपापल्या आध्यात्मिक गुरूंचे आशीर्वाद घेऊन, मुहूर्त काढून अर्ज दाखल केले, तरी लोकशाहीत मतदारराजा एकालाच देवासारखा पावतो, हे वास्तव नजरेआड करता येत नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणे