शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

समाजाचा विकासासाठी शिक्षण महत्वाचे : धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:00 IST

धनगर प्रतिष्ठानतर्फे ठाणे जिल्ह्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. 

ठळक मुद्देधनगर प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवसमाजाचा विकासासाठी शिक्षण महत्वाचे :  जयसिंग शेंडगे  

ठाणे : समाजाचा खऱ्या अर्थाने सर्वागीण विकास करायचा असेल तर शिक्षण हे महत्वाचे आहे यासाठी सर्व  विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे असे प्रतिपादन धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे यांनी ठाणे येथे केले. 

    धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ,ठाणे यांच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे शेंडगे प्रमुख पाहुणे होते. याप्रसंगी ठाणे जिल्हयातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि प्रशस्तीपत्र देऊन धनगर समाजाचे नेते जयसिंग तात्या शेंडगे व नगरसेविका परिषा सरनाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात जन्मताच दोन्ही हात नसतानाही खडतर परस्थिती परिश्रम करून दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या माथेरान येथील जयेश शिंगाडे या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच या विद्यार्थांचा पदवीधर होऊ पर्यंतचा शिक्षणाचा खर्च संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क पोलीस निरीक्षक गोविंद पाटील,शिवसेना उपविभागप्रमुख राजेश वीरकर,कोपरी -पाचपाखाडी युवा सेना समन्वयक दीपक झाडे,खोपट एसटी आगार डेपोचे युनियनचे अध्यक्ष सुरेश भांड,प्रतिष्ठानचे सल्लगार सुनील राहिंज,प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळ अध्यक्षा माधवी बारगीर,आदी सह मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्रात शासकीय व सामाजिक क्षेत्रात धनगर समाजाचे हातावर मोज्यांना इतकेही लोक नसल्याने समाजाचा सर्वांगीण विकास होत नसून यासाठी समाजाचा विकास करायचा असेल तर विद्यार्थांनी उच्च शिक्षण घेणे आवश्यक आहे. धनगर समाजाला एसटी चे आरक्षण मिळवायचे असेल तर सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे असे शेंडगे यांनी सांगितले. समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु समाज पुढे गेला पाहिजे यासाठी झटणारी एकमेव संस्था धनगर प्रतिष्ठान असल्याचे गौरव उद्गार नगरसेविका परिषा सरनाईक यांनी काढले धनगर समाजासाठी नवनवीन कार्यक्रम राबवून समाजाला एकत्रित करण्याचे कार्य कौतूकास्पद असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव अमोल होळकर,उपाध्यक्ष संतोष बुधे,,खजिनदारअविनाश लबडे,सल्लागार मनोहर वीरकर,सूर्यकांत रायकर  कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,अरुण परदेशी ,सचिन बुधे,प्रशांत कुरकुंडे,ऋषी पिसे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ  सचिव गायत्री गुंड ,खजिनदार भारती पिसे, उपखजिनदार संगीत खटावकर,सदस्य सुचिता कुचेकर,सुषमा बुधे,स्नेहा खटावकर,सीमा कुरकुंडे,सुजाता भांड,सल्लागार अर्चना वारे आदीने परिश्रम घेतले 

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणMumbaiमुंबई