शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नव्या शिक्षण धोरणाच्या दृष्टीने 'ही' शिक्षण परिषद महत्वाची; ...तर आम्हीही याचा फायदा करून घेऊन - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 22:06 IST

याच वेळी सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांचे दोने डोस झालेले असावेत. पण, ज्यांचे दोन डोस झालेले नाहीत, त्यांची ना इलाजाने ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागेल असेही ते म्हणाले.

शिक्षण परिषद हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. तयार करण्यात आलेले नवे शिक्षण धोरण कशा प्रकारे प्रेझेंट करायचे, यासाठी या कार्यक्रमाचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. याचा फायदा आम्हाला होणार असेल तर आम्ही तो नक्कीच करून घेऊ. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा कार्यक्रम लाभदायक ठरणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

“आंतर भारती" आणि "ग्राममंगल" आयोजित समारंभात 'ग्राममंगल' या संस्थेच्या कार्याची ४० वर्षे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सामंत पत्रकारांशी बोलत होते.

याच वेळी सामंत म्हणाले, महाविद्यालये सुरू करताना विद्यार्थ्यांचे दोने डोस झालेले असावेत. पण, ज्यांचे दोन डोस झालेले नाहीत, त्यांची ना इलाजाने ऑनलाइन परीक्षा घ्यावी लागेल असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील ओमायक्रॉनचे संकट पाहता नक्की काय करायचे यासंदर्भात डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावे. अशा सूचना आम्ही केल्या आहेत. तसेच कुलगुरूंनीही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले. 

अपक्षांच्या प्रचारासाठी न गेल्याने रामदास भाईंचा गैरसमज झाला असेल -यावेळी रामदास कदम यांच्या संदर्भात बोलताना सामंत म्हणाले, मी शिक्षण परिषदेला आलो आहे. ज्येष्ठ मंडळी माझ्यासोबत आहेत. कालच्या आरोपासंदर्भात बोलण्यापेक्षा आजच्या कार्यक्रमाला न्यू एज्युकेशन पॉलिसी परिस्थितीवर बोलावे. याच्यावर चर्चा केली तर चांगले होईल. कालच्या आरोप-प्रत्यारोपांसंदर्भात शिवसैनिक म्हणून मी बोललो आहे. ते (रामदास कदम) ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु ज्या ठिकाणी प्रचारासाठी गेलो होतो, तो पक्षाचा आदेश होता. त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते अपक्षांच्या प्रचारासाठी गेलो नवतो. अपक्षाच्या प्रचारासाठी न गेल्यामुळे कदाचित रामदास भाईंचा गैरसमज झाला असेल, हे मी काल सांगितले आहे. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी