शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

Education: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या तक्रारींचा निपटारा महिन्याभरात करण्याचे आयुक्तांना आदेश

By सुरेश लोखंडे | Updated: September 11, 2022 13:48 IST

Education:

- सुरेश लोखंडेठाणे  - ग्रामविकास विभागामार्फत विन्सीस आय टी सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने  आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत अनेक त्रुटी असून बदल्यांच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार शिक्षक राज्य रोस्टर कृती समितीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  ग्रामविकास विभागाकडे केली होती. याकडे गांभीर्याने लक्ष देत राज्यभरातील विभागीय आयुक्तांनी या बदल्यांच्या तक्रारींसह आंतरजिल्हा बदल्यांच्या तक्रारींचा निपटरा एक महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले आहेत. यामुळे या समस्येत अडकलेल्या शिक्षकांना आता न्याय मिळणार असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 कोकण विभागीय आयुक्तांसह राज्य भरातील आयुक्तांकडे या समस्या ग्रस्त शिक्षकांनी शेकडो तक्रारी केलेल्या आहेत. त्यात बदल्यांमध्ये अन्याय झाल्याचा आरोप आहे. या हजारो शिक्षकांनी तक्रारी दाखल करुन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत ग्रामविकास विभागाने एक पत्र काढत आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या शिक्षकांना विभागीय आयुक्तांकडे तक्रारी दाखल करण्यास सांगितले. या आलेल्या सर्व तक्रारींचा एक  महिन्याच्या आत निपटारा करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना दिले. शिवाय ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबविलेल्या पुण्याच्या विन्सीस आयटी सोल्युशन कंपनीला अन्यायग्रस्त शिक्षकांची वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.त्यामुळे बदली प्रक्रियेतील अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आहे, असे या शिक्षक राज्यरोस्टर कृती समितीचे मुख्य निमंत्रक ॲड. राजकुमार रंगनाथ पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बहुप्रतिक्षित अशा बदल्यांच्या प्रक्रियेत खूप मोठी अनियमितता घडल्याच्या अनेक तक्रारी आहेत.अनेक जिल्हा परिषदांनी रिक्त जागा उपलब्ध असताना रिक्त जागा शून्य असल्याचे दाखविले. अनेक ठिकाणी मूळ परिपत्रकाला बाजूला ठेवत सेवाज्येष्ठता डावलून सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहे. सेवाज्येष्ठतेऐवजी पसंतीक्रम ग्राह्य धरून बदल्या झाल्या. अनेकांचे बदली संवर्ग बदलले गेले.याचा फटका 18 ते 20 वर्षापासून बाहेरच्या जिल्ह्यात सेवा करणाऱ्या हजारो शिक्षकांना बसला होता.या अन्याया विरोधात शिक्षक राज्यरोस्टर कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत विभागीय आयुक्तांकडे या तक्रारींच्या प्रकरणांची दखल घेतली जाणार असल्याने समाधान आहे.सुनावणी घेऊन या अन्यायग्रस्त शिक्षकांना ऑफलाईन पदस्थापना द्यावी,अशी मागणीही आता जोर धरू लागल्याचे अँड पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षणthaneठाणे