शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली डिटर्जंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 23:44 IST

रिठा-शिकेकाईचा वापर; बाल विज्ञान परिषदेत दाखवली चमक

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस या सरकारच्या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या बालविज्ञान परिषदेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेतील नंदन कार्ले व ओंकार ठाकूर यांनी इकोफ्रेंडली डिटर्जंट बनवले आहे. त्यांच्या या प्रकल्पाने पूर्व राज्य पातळीपर्यंत मजल मारली आहे.राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेकरिता ‘स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न देशासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना’ हा विषय प्रकल्प सादर करण्यासाठी दिला होता. त्यात पारंपारिक ज्ञानव्यवस्था हा उपविषय निवडून नंदन आणि ओंकार यांनी इकोफे्रं डली डिटर्जंट तयार केला आहे.यंदाची ही २७ वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन करावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येते. इकोफें्रडली डिटर्जंट हा प्रकल्प आता पूर्व राज्यपातळीवर निवडला गेला आहे. राज्य पातळीवरील निवडीसाठी या प्रकल्पाची प्रथम फाइल पाठवण्यात येणार आहे. फाइलची निवड झाल्यास त्या प्रकल्पाला राज्यपातळीवर जाण्याची संधी मिळेल. राज्यपातळीची स्पर्धा पुण्यात ६ व ७ डिसेंबरदरम्यान होणार आहे. ही फाइल जिज्ञासा ट्रस्टमार्फत पुढे जाईल.नंदन आणि ओंकार हे दोघे इयत्ता आठवीत आहेत. त्यांनी तयार केलेला हे डिटर्जंट केमिकलमुक्त असून हर्बल आहे. तसेच हा डिटर्जंट आॅल इन वन क्लिनर असणार आहे. हा डिटर्जंट कपडे धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणे आणि बेसिन धुण्याकरिता वापरता येऊ शकतो. सिथेंटिक डिटर्जंटने जलप्रदूषण होते. या समस्येवर हा डिटर्जंट एक चांगला पर्याय आहे. या प्रकल्पाच्या जागृतीसाठी नंदन यांनी एक पोवडा व पथनाट्य तयार केले आहे. स्वामी विवेकानंद शाळा आणि ट्युलिप सोसायटी यांनी नाटकाद्वारे या डिटर्जंटची जागृती केली आहे. या डिटर्जंटची सॅम्पल लोकांना वापरायला दिली आहेत. २३ नोव्हेंबरला पुसाळकर उद्यान येथे जागृती करण्यात येणार आहे. या डिटर्जंटने कपडे खराब होत नाही ना? कपड्यावरील डाग जातात का? कपडयाचा रंग नीट राहतो ना? या सगळ््याची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच प्रदूषण विरहित हे डिटर्जंट आहे का हे पाहण्यासाठी पेंढरकर महाविद्यालयात ते टेस्टींगसाठी दिले आहे. त्याचा रिपोर्ट बुधवारपर्यंत मिळणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या इकोफ्रें डली डिटर्जंटकडे वळण्याची गरज आहे असल्याचे नंदन यांनी सांगितले.या डिटर्जंटमध्ये बाजारात सहज उपलब्ध होणाºया रिठा व शिकेकाई यासारख्या गोष्टींचा वापर केला आहे. या डिटर्जंटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केल्यास ते कमी किंमतीत नागरिकांना उपलब्ध होऊ शकते. या प्रकल्पाची टॅगलाईन ‘वापरा इकोफे्रं डली डिटर्जंट, जलप्रदूषण थांबवयाचे अर्जंट’ अशी आहे. एप्रिलपासून सतत वृत्तपत्रात उल्हासनदीच्या प्रदूषणाची बातमी येत होती. एका लेखामध्ये डिटर्जंटमध्ये केमिकल असल्याने त्यांचा खतासारखा वापर होतो. डिटर्जंटमधील केमिकल कमी केले पाहिजे, असे लिहिले होते. त्यावरून हे डिटर्जंट बनवण्याची कल्पना सुचल्याचे नंदन यांनी सांगितले. त्याचा हा प्रकल्पातील पहिलाच सहभाग आहे. या प्रकल्पासाठी शाळेच्या विज्ञान शिक्षिका जयश्री दौंड व मुख्याध्यापिका ज्योती नारखेडे यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.