शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी तयार केले इकोफ्रेंडली डिटर्जंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 23:44 IST

रिठा-शिकेकाईचा वापर; बाल विज्ञान परिषदेत दाखवली चमक

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस या सरकारच्या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या बालविज्ञान परिषदेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर शाळेतील नंदन कार्ले व ओंकार ठाकूर यांनी इकोफ्रेंडली डिटर्जंट बनवले आहे. त्यांच्या या प्रकल्पाने पूर्व राज्य पातळीपर्यंत मजल मारली आहे.राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेकरिता ‘स्वच्छ, हरित आणि आरोग्यसंपन्न देशासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना’ हा विषय प्रकल्प सादर करण्यासाठी दिला होता. त्यात पारंपारिक ज्ञानव्यवस्था हा उपविषय निवडून नंदन आणि ओंकार यांनी इकोफे्रं डली डिटर्जंट तयार केला आहे.यंदाची ही २७ वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन करावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येते. इकोफें्रडली डिटर्जंट हा प्रकल्प आता पूर्व राज्यपातळीवर निवडला गेला आहे. राज्य पातळीवरील निवडीसाठी या प्रकल्पाची प्रथम फाइल पाठवण्यात येणार आहे. फाइलची निवड झाल्यास त्या प्रकल्पाला राज्यपातळीवर जाण्याची संधी मिळेल. राज्यपातळीची स्पर्धा पुण्यात ६ व ७ डिसेंबरदरम्यान होणार आहे. ही फाइल जिज्ञासा ट्रस्टमार्फत पुढे जाईल.नंदन आणि ओंकार हे दोघे इयत्ता आठवीत आहेत. त्यांनी तयार केलेला हे डिटर्जंट केमिकलमुक्त असून हर्बल आहे. तसेच हा डिटर्जंट आॅल इन वन क्लिनर असणार आहे. हा डिटर्जंट कपडे धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणे आणि बेसिन धुण्याकरिता वापरता येऊ शकतो. सिथेंटिक डिटर्जंटने जलप्रदूषण होते. या समस्येवर हा डिटर्जंट एक चांगला पर्याय आहे. या प्रकल्पाच्या जागृतीसाठी नंदन यांनी एक पोवडा व पथनाट्य तयार केले आहे. स्वामी विवेकानंद शाळा आणि ट्युलिप सोसायटी यांनी नाटकाद्वारे या डिटर्जंटची जागृती केली आहे. या डिटर्जंटची सॅम्पल लोकांना वापरायला दिली आहेत. २३ नोव्हेंबरला पुसाळकर उद्यान येथे जागृती करण्यात येणार आहे. या डिटर्जंटने कपडे खराब होत नाही ना? कपड्यावरील डाग जातात का? कपडयाचा रंग नीट राहतो ना? या सगळ््याची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच प्रदूषण विरहित हे डिटर्जंट आहे का हे पाहण्यासाठी पेंढरकर महाविद्यालयात ते टेस्टींगसाठी दिले आहे. त्याचा रिपोर्ट बुधवारपर्यंत मिळणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या इकोफ्रें डली डिटर्जंटकडे वळण्याची गरज आहे असल्याचे नंदन यांनी सांगितले.या डिटर्जंटमध्ये बाजारात सहज उपलब्ध होणाºया रिठा व शिकेकाई यासारख्या गोष्टींचा वापर केला आहे. या डिटर्जंटचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केल्यास ते कमी किंमतीत नागरिकांना उपलब्ध होऊ शकते. या प्रकल्पाची टॅगलाईन ‘वापरा इकोफे्रं डली डिटर्जंट, जलप्रदूषण थांबवयाचे अर्जंट’ अशी आहे. एप्रिलपासून सतत वृत्तपत्रात उल्हासनदीच्या प्रदूषणाची बातमी येत होती. एका लेखामध्ये डिटर्जंटमध्ये केमिकल असल्याने त्यांचा खतासारखा वापर होतो. डिटर्जंटमधील केमिकल कमी केले पाहिजे, असे लिहिले होते. त्यावरून हे डिटर्जंट बनवण्याची कल्पना सुचल्याचे नंदन यांनी सांगितले. त्याचा हा प्रकल्पातील पहिलाच सहभाग आहे. या प्रकल्पासाठी शाळेच्या विज्ञान शिक्षिका जयश्री दौंड व मुख्याध्यापिका ज्योती नारखेडे यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे.