शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

सहज सुचलेल्या चाली, गीते अधिक लोकप्रिय - अशोक पत्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 4:10 AM

सहज सुचलेली चाल किंवा कविता लोकांना आपल्या अधिक जवळची वाटते. अशा चाली व गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, असे मत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केले.

कल्याण : तुमचे काम चांगले असेल, तर तुम्हाला कुणाकडेही जावे लागत नाही. संधी आपोआपच चालत येते. कोणतीही चाल किंवा कविता विचार करून केली, तर ती अधिक क्लिष्ट होते. त्यापेक्षा सहज सुचलेली चाल किंवा कविता लोकांना आपल्या अधिक जवळची वाटते. अशा चाली व गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, असे मत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केले.सुभेदारवाडा कट्ट्याच्या तृतीय वर्षपूर्ती कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रविवारी ‘सप्तसूर माझे...’ याअंतर्गत पत्की यांची संगीतमय मुलाखत पूर्वा कर्वे-बापट यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.पत्की म्हणाले, ‘केतकीच्या वनी, नाचला गं मोर’ यासारख्या गाण्यात मेलोडी होती. १९७२ मध्ये या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले. त्यानंतर, अशोक पत्की हे नाव लोकप्रिय झाले. ही गाणी ५०-६० वर्षांच्या काळ लोटला असला, तरी ती आजची वाटतात. दैवीकृपा असावी लागते, तेव्हा उत्कृष्ट निर्मिती आपल्या हातून होते. चांगली निर्मिती केली की, काम आपोआपच आपल्याकडे चालत येते. माझ्याबाबतीत सिनेमाचेही तेच झाले. एक काम झाले की, दुसरी कामे आपोआप चालत आली. कोणतेही काम हे मनापासून केले पाहिजे. ‘आपली माणसं’ यासाठी पुरस्कार मिळू देत, म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली होती. त्यानंतर, १० वर्षे पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, पण आज लाज ठेव, असे गाºहाणे घातले. त्यानुसार, ‘आपली माणसं’ याला पुरस्कार मिळाला. पुढच्या १० वर्षांत एकही पुरस्कार मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले.वसंत प्रभू, राम कदम, गदिमा, पी. सावळाराम ही माणसे प्रथम गाणे लिहीत. मग, त्यांचे ध्वनिमुद्रण होत असे. पण, माझ्या काळात चाल बनवून मग गाणी लिहिण्याचा एक ट्रेण्ड आला. शांताराम नांदगावकर यांच्याकडून गाणे लिहून घेणार होतो. त्या चालीवर मी डमी गाणे बसवले होते. या गाण्याचे बोल छान असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. त्या गाण्याचा अंतरा त्यांनी लिहिला. तिथूनच पुढे गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. त्यानंतर, सुरेश वाडकर यांच्यासाठी ‘तू सप्तसूर माझे’ हे गीत लिहिले.प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध‘केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर’, ‘तू सप्तसूर माझे तू श्वास अंतरीचा’, ‘राधा ही बावरी’, ‘टांग टिंग टिंगाक, टांग टिंग टिंगाक’, ‘मला सांगा सुख म्हणजे नक्कीकाय असतं’... या गीतांसोबतच ‘आभाळमाया’ आणि ‘वादळवाट’ ही मालिकांची शीर्षकगीते सादर क रून पत्की यांनी प्रेक्षकांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळवली.‘अधुरी एक कहाणी’ आणि ‘यमुना जळी खेळू खेळ कन्हैया’ या जुन्या गाण्यांना त्यांनी दिलेल्या चाली त्यांनी प्रेक्षकांसमोर सादर केल्या. पत्की यांनी काही जिंग्लसही सादर केल्या. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या लोकप्रिय गाण्याच्या निर्मितीचे मर्म त्यांनी उलगडून सांगितले.

टॅग्स :Ashok Patkiअशोक पत्कीmusicसंगीतmarathiमराठी