शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

ई-कचरा प्रक्रिया: दोन कंपन्यांच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:39 IST

मेपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता

- मुरलीधर भवारकल्याण : कचऱ्यापासून खत, बायोगॅस आणि वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यासाठी केडीएमसीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर ई-कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी राबवलेल्या निविदेस दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला जागा व शेड उभारण्याव्यतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. दोनपैकी एका कंपनीला काम दिल्यावर प्रकल्प मे महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा गोळा होतो. त्यापैकी ७० मेट्रीक टन कचरा हा २७ गावांतील आहे. महापालिकेच्या हद्दीतून गोळा होणाºया एकूण कचºयापैकी १० टक्के कचरा हा ई-कचरा असतो. परंतु, त्यावर शास्त्रोक्त प्रक्रियाच केली जात नाही. या कचºयाचे शास्त्रोक्त विघटन व प्रक्रिया न झाल्यास त्यापासून असाध्य रोग नागरिकांना होऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची सक्ती केली आहे. महापालिका कचरा विघटन व प्रक्रिया व्यवस्थापनासाठी प्रयत्नशील असल्या तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील एकाही महापालिका व पालिकेने ई-कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारलेला नाही. केडीएमसीने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कंत्राट दिले आहे. त्याचबरोबर उंबर्डे व बारावे येथे घनकचरा प्रकल्प, १३ ठिकाणी कचºयापासून बायोगॅस आणि वीज तयार करणार आहे.पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी नव्या नियमावलीनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी केडीएमसीला ६ डिसेंबर २०१८ रोजी नोटीस पाठवून ई-कचरा प्रकल्प राबविण्याविषयी कृती आराखडा सादर करण्याची सूचना केली होती. महापालिकेने १७ डिसेंबरला ही नोटीस मिळताच ई-कचरा व्यवस्थापन व प्रकल्पासंदर्भात कृती आराखडा तयार करून तो मंडळाकडे सादर केला. त्यात महापालिकेने म्हटले आहे की, ई-कचºयावर जानेवारीमध्ये ‘एक्सप्रेशन आॅफ इंटरेस्ट’ तत्त्वावर निविदा मागवण्यात आल्या. त्यास नवी मुंबईतील ‘युनायटेड इंडस्ट्रीज’ व डोंबिवलीतील ‘रेस्पोज’ या कंपनीने प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पाचे काम एकाच कंपनीला दिले जाणार आहे. प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला कंपनीला जागा आणि पाच हजार चौरस फुटांची कचरा शेड उभारून द्यावी लागेल. वर्षाला ५०० मेट्रीक टन ई-कचºयावर प्रक्रिया तेथे होऊ शकते. प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीला दोन कोटी ८९ लाखांचा खर्च अपेक्षित असून, तो करण्याची तयारी कंपन्यांनी दर्शवली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील रामनगर व दत्तनगर येथे कचरा शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, मार्चपर्यंत कल्याणमधील बारावे, लोकग्राम आणि रामबागेत येथे शेड उभारण्याचे काम पूर्ण होईल. हा प्रकल्प मे अखेरपर्यंत अस्तित्वात आल्यास ई-कचरा प्रकल्प राबविणारी केडीएमसी ही राज्यातील पहिली महापालिका ठरू शकते, असेही महापालिकेने आराखड्यात म्हटले आहे.ई. रवींद्रन यांनी घेतला होता पुढाकारई-कचरा प्रकल्पासाठी तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी २०१५ मध्ये प्रयत्न केले होते. मात्र, त्याच्या बदलीनंतर पुढे काहीच हालचाल झाली नाही.मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठविल्यावर या प्रकल्पासाठी निविदा काढण्याची जाग महापालिकेस आली. तेव्हा महापालिकेची धावपळ सुरू झाली.‘व्हिजन डोंबिवली’ प्रकल्प राबविणारे डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी यापूर्वी ई-कचरा गोळा करण्यासाठी दोनदा मोहीम हाती घेतली होती. त्याला डोंबिवलीत चांगला प्रतिसाद मिळाला होता.

टॅग्स :kalyanकल्याण