शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

ई-कचरा प्रक्रिया: दोन कंपन्यांच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:39 IST

मेपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता

- मुरलीधर भवारकल्याण : कचऱ्यापासून खत, बायोगॅस आणि वीजनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्यासाठी केडीएमसीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर ई-कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी राबवलेल्या निविदेस दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला जागा व शेड उभारण्याव्यतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. दोनपैकी एका कंपनीला काम दिल्यावर प्रकल्प मे महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा गोळा होतो. त्यापैकी ७० मेट्रीक टन कचरा हा २७ गावांतील आहे. महापालिकेच्या हद्दीतून गोळा होणाºया एकूण कचºयापैकी १० टक्के कचरा हा ई-कचरा असतो. परंतु, त्यावर शास्त्रोक्त प्रक्रियाच केली जात नाही. या कचºयाचे शास्त्रोक्त विघटन व प्रक्रिया न झाल्यास त्यापासून असाध्य रोग नागरिकांना होऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांना कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची सक्ती केली आहे. महापालिका कचरा विघटन व प्रक्रिया व्यवस्थापनासाठी प्रयत्नशील असल्या तरी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील एकाही महापालिका व पालिकेने ई-कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारलेला नाही. केडीएमसीने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कंत्राट दिले आहे. त्याचबरोबर उंबर्डे व बारावे येथे घनकचरा प्रकल्प, १३ ठिकाणी कचºयापासून बायोगॅस आणि वीज तयार करणार आहे.पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी नव्या नियमावलीनुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी केडीएमसीला ६ डिसेंबर २०१८ रोजी नोटीस पाठवून ई-कचरा प्रकल्प राबविण्याविषयी कृती आराखडा सादर करण्याची सूचना केली होती. महापालिकेने १७ डिसेंबरला ही नोटीस मिळताच ई-कचरा व्यवस्थापन व प्रकल्पासंदर्भात कृती आराखडा तयार करून तो मंडळाकडे सादर केला. त्यात महापालिकेने म्हटले आहे की, ई-कचºयावर जानेवारीमध्ये ‘एक्सप्रेशन आॅफ इंटरेस्ट’ तत्त्वावर निविदा मागवण्यात आल्या. त्यास नवी मुंबईतील ‘युनायटेड इंडस्ट्रीज’ व डोंबिवलीतील ‘रेस्पोज’ या कंपनीने प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पाचे काम एकाच कंपनीला दिले जाणार आहे. प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेला कंपनीला जागा आणि पाच हजार चौरस फुटांची कचरा शेड उभारून द्यावी लागेल. वर्षाला ५०० मेट्रीक टन ई-कचºयावर प्रक्रिया तेथे होऊ शकते. प्रकल्प उभारण्यासाठी कंपनीला दोन कोटी ८९ लाखांचा खर्च अपेक्षित असून, तो करण्याची तयारी कंपन्यांनी दर्शवली आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील रामनगर व दत्तनगर येथे कचरा शेड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, मार्चपर्यंत कल्याणमधील बारावे, लोकग्राम आणि रामबागेत येथे शेड उभारण्याचे काम पूर्ण होईल. हा प्रकल्प मे अखेरपर्यंत अस्तित्वात आल्यास ई-कचरा प्रकल्प राबविणारी केडीएमसी ही राज्यातील पहिली महापालिका ठरू शकते, असेही महापालिकेने आराखड्यात म्हटले आहे.ई. रवींद्रन यांनी घेतला होता पुढाकारई-कचरा प्रकल्पासाठी तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी २०१५ मध्ये प्रयत्न केले होते. मात्र, त्याच्या बदलीनंतर पुढे काहीच हालचाल झाली नाही.मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठविल्यावर या प्रकल्पासाठी निविदा काढण्याची जाग महापालिकेस आली. तेव्हा महापालिकेची धावपळ सुरू झाली.‘व्हिजन डोंबिवली’ प्रकल्प राबविणारे डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी यापूर्वी ई-कचरा गोळा करण्यासाठी दोनदा मोहीम हाती घेतली होती. त्याला डोंबिवलीत चांगला प्रतिसाद मिळाला होता.

टॅग्स :kalyanकल्याण