शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘ई’ प्रभाग कार्यालयात दिला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:39 IST

प्रभाग समितीची सभा सुरू असताना महिलांबरोबर सभापतींनीही ठिय्या धरला

कल्याण : पाणीटंचाईमुळे त्रस्त असलेल्या केडीएमसीच्या २७ गावांतील महिलांनी शुक्रवारी ई प्रभाग कार्यालयावर धाव घेतली. यावेळी तेथे प्रभाग समितीची सभा सुरू असताना महिलांबरोबर सभापतींनीही ठिय्या धरला. अधिकारी सभेला गैरहजर राहिल्याने नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना त्यांनी एक तास प्रवेशद्वाराजवळच रोखून धरले. अखेरीस उपायुक्त आल्यानंतर नगरसेवकांनी ठिय्या मागे घेतला.ई प्रभाग समितीची सभा चार महिन्यांनंतर शुक्रवारी होती. यावेळी प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रभाग समितीच्या सभापती पूजा म्हात्रे, प्रमिला पाटील, सुनीता पाटील, प्रभाकर जाधव, प्रेमा म्हात्रे, रूपाली म्हात्रे आदी १२ नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुुरू केले. याचवेळी पाणीसमस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी प्रभागात धाव घेतली होती. या महिलांसह प्रभाग समिती सदस्य व सभापतींनी ठिय्या आंदोलन सुरू केले.नगरसेवक प्रभाकर जाधव यांनी सांगितले की, नागरिकांना पाणी मिळत नाही. रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नाहीत. गणेशोत्सव जवळ आला आहे. नागरिकांचे हाल कुत्रे खात नाही. अधिकारी जर गावात आले, तर लोक त्यांना चपलेने मारतील. प्रभाग समितीच्या सभेला अधिकारी दाद देत नाही. नागरिक प्रभाग समितीत येऊन जाब विचारतात. योग्य उत्तरे त्यांना दिली जात नाही. सभेला प्रभाग अधिकारीच नाही. सक्षम अधिकारी नसल्याने प्रशासनाच्या वतीने उत्तरे कोण देणार.आयुक्तांनी दोनच दिवसांपूर्वी नांदिवली परिसराचा दौरा केला, तेव्हा अधिकारीवर्गाची कानउघाडणी केली होती. लोकांच्या समस्या न सोडवता काय झोपा काढता का, असा संतप्त सवाल आयुक्तांनीच उपस्थित केला होता. त्यानंतर, शुक्रवारी पुन्हा अधिकाºयांच्या निर्ढावलेल्या वृत्तीचा प्रत्यय ई प्रभाग कार्यालयाशी संलग्न असलेल्या २७ गावांमधील नगरसेवकांना आला. त्यामुळे महिलांनी प्रभाग कार्यालयात चक्क गोंधळ घातला. सभापतींनीही त्याला जोरदार समर्थन दिले.अधिकाºयांवर करणार कारवाई; उपायुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागेनगरसेवकांच्या गोंधळानंतर प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड कार्यालयात आले, तेव्हा त्यांना कार्यालयात न घेता प्रवेशद्वारावर ताटकळत रोखून धरले गेले. उशिरा येणाºया अधिकाºयांवर काय कार्यवाही करणार, असा सवाल नगरसेवकांनी केला.अखेरीस उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी ई प्रभाग कार्यालय गाठले. संतप्त झालेल्या नगरसेवकांची त्यांनी समजूत काढत गैरहजर राहणाºया अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यावर नगरसेवकांनी तीन तासांनंतर आंदोलन मागे घेतले.

 

टॅग्स :thaneठाणेagitationआंदोलनwater scarcityपाणी टंचाई