शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 3:54 PM

गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.

डोंबिवली - गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने या कामी डोंबिवलीत निर्मल युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे ४० टन २६० किलो निर्माल्य, २० टन १९५ किलो प्लास्टिक, १२ टन घनकचरा असे वर्गीकरण करून जलस्त्रोतात जाण्यापासून वाचवण्यात आले व जलप्रदूषण टाळत निर्माल्य गणेश मंदिर संस्थानाच्या गांडूळखत निर्मितीसाठी सुपूर्त करण्यात आले.

 दीड ते अकरा दिवसांच्या गणेशोत्सव काळात या जेथे गणेश विसर्जन करण्यात आले त्या ठिकाणी विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन करण्यात आले. ह्या वर्षी ही निर्मल युथ फाऊंडेशन , डोंबिवली संस्थेचे स्वयंसेवक निर्मल्य संकलनाचे कार्य  पूर्वेकडे आयरे गाव तलाव, पश्चिममेला  कोपर तलाव,जुनी डोंबिवली गणेश घाट, रेतीबंदर गणेश घाट, देवीचा पाडा, कुंभारखन पाडा येथे विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे सुमारे 350 हुन अधिक स्वयंसेवक भर पावसात कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.

या कार्यास गतवर्षीपासून संस्थेसोबत साऊथ इंडियन आसोसिएशन व प्रगति या महाविद्यालयाच्या एन. एस.एस विभागाचे स्वयंसेवक तसेच जी. आर. पाटिल महाविद्यालयाचे विद्यार्थी, पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेच्या रूपाली शाईवाले, घनकचरा व्यवस्थापन विभाग क.डो.म.पा. डोंबिवलीचे अधिकारी विलास जोशी, पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक अधिकारी विलास गायकवाड, पश्चिम विभागाचे राजेंद्र खैरे आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, पवन पाटिल, नगरसेेेक दीपेेेश म्हात्रे, प्रकाश भोईर,  विकास म्हात्रे आणि संगिता पाटील यांचे सहकार्य मिळाले. पुढच्या वर्षीही विसर्जनाच्या वेळीही हे कार्य असेच सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

नाले, समुद्र इत्यादी जलाशयात निर्माल्य तसेच प्लास्टिक कचरा टाकल्यास प्रदूषण वाढते तसेच जलाशयातील जलचर प्राण्यांच्या शरीरात हा कचरा अडकू शकतो शिवाय त्यांच्या पर्यावरणीय अधिवासासही ह्या मुळे धोका निर्माण होतो आणि जैवविविधता  नष्ट होऊ लागते आणि सृष्टीचे चैतन्य हरवते. त्यामुळे संस्थेने नागरिकांना आवाहन केले होते की आपल्या घरच्या अथवा मंडळाचा गणपती विसर्जित करताना निर्माल्य संकलनासाठी स्वतःहून जबाबदारीने निर्मल युथ फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे अशा पद्धतीने जनजागृती करण्यात आली होती.

त्यानुसार या संस्थेद्वारे आयोजित व राबवण्यात येणाऱ्या आगळ्या वेगळ्या निर्माल्य संकलनाच्या योजनेमुळे डोंबिवली शहराचे नागरीक सजग होत आहेत व पर्यावरणपूरक सण साजरे होण्यास चालना मिळत आहे तसेच त्या त्या विभागात विकासाची गती वाढून स्वच्छतेचा व प्रदूषण टाळण्याचा संदेश पोहचल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Mahotsavगणेशोत्सवdombivaliडोंबिवली