शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

संचारबंदीच्या काळात गेल्या चार दिवसात ८७३ वाहने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 17:05 IST

ठाणे जिल्हयात शहरी भागासह ग्रामीण भागात झपाटयाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात जमावबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि कोरोनाचा चाचणी अहवाल नसणारे अशी ८७३ वाहने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे नियम तोडणाऱ्या तीन हजार ९१८ चालकांवर कारवाई वाहतूक शाखेने उगारला कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे जिल्हयात शहरी भागासह ग्रामीण भागात झपाटयाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात जमावबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि कोरोनाचा चाचणी अहवाल नसणारे अशी ८७३ वाहने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केली आहे. त्याचबरोबर कोरोनासंबंधी नियम तोडणाºया इतर तीन हजार ९१८ वाहन चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ठाणे जिल्ह्यातही संचारबंदी लागू केली आहे. बुधवारी लागू केलेल्या संचारबंदीच्या आदेशामध्ये सार्वजनिक वाहतूकीस परवानगी दिलेली आहे. मात्र, त्यासाठी वाहन चालकांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे. तरच अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना वाहन घेऊन फिरता येऊ शकते, असे आदेशात स्पष्ट केले आहे. त्यानंतरही ठाणे ते बदलापूर यादरम्यान, अनेक वाहन चालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळले आहे. ठाणे वाहतूक शाखेच्या १८ विभागांतर्गत केलेल्या नाकाबंदीमध्ये ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे शहरात विनाकारण फिरणाºया नागरिकांवर तसेच रिक्षा चालक किंवा बसमधून प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. त्यानुसार १४ ते १८ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत ठाणे शहर वाहतूक पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलिसांनी ८७३ वाहने जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८० दुचाकींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्या खालोखाल २९६ रिक्षा, तर ९७ मोटारकारवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांकडून महत्त्वाच्या चौकांमध्ये तपासणी केली जात होती. यामध्ये सर्वाधिक कारवाई दुचाकी आणि रिक्षांवर करण्यात आली आहे.* ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये १४ ते १८ एप्रिल या संचारदबंदीच्या कालावधीमध्ये नियम धुडकावणाºया तब्बल तीन हजार ९१८ वाहन चालकांवर कलम १७९ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकीवर ट्रीपल सीट फिरणारे, वाहतूकीचे नियम मोडणाºया तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली आहे. यात भिवंडीमध्ये सर्वाधिक ४३७, नारपोलीमध्ये ४२६ तर कोनगावमध्ये ४१२ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.आपल्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी नागरीकांनीही महत्त्वाच्या कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस