शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

संचारबंदीच्या काळात गेल्या चार दिवसात ८७३ वाहने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 17:05 IST

ठाणे जिल्हयात शहरी भागासह ग्रामीण भागात झपाटयाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात जमावबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि कोरोनाचा चाचणी अहवाल नसणारे अशी ८७३ वाहने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचे नियम तोडणाऱ्या तीन हजार ९१८ चालकांवर कारवाई वाहतूक शाखेने उगारला कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे जिल्हयात शहरी भागासह ग्रामीण भागात झपाटयाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात जमावबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणारे आणि कोरोनाचा चाचणी अहवाल नसणारे अशी ८७३ वाहने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जप्त केली आहे. त्याचबरोबर कोरोनासंबंधी नियम तोडणाºया इतर तीन हजार ९१८ वाहन चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ठाणे जिल्ह्यातही संचारबंदी लागू केली आहे. बुधवारी लागू केलेल्या संचारबंदीच्या आदेशामध्ये सार्वजनिक वाहतूकीस परवानगी दिलेली आहे. मात्र, त्यासाठी वाहन चालकांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे. तरच अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना वाहन घेऊन फिरता येऊ शकते, असे आदेशात स्पष्ट केले आहे. त्यानंतरही ठाणे ते बदलापूर यादरम्यान, अनेक वाहन चालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळले आहे. ठाणे वाहतूक शाखेच्या १८ विभागांतर्गत केलेल्या नाकाबंदीमध्ये ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे शहरात विनाकारण फिरणाºया नागरिकांवर तसेच रिक्षा चालक किंवा बसमधून प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. त्यानुसार १४ ते १८ एप्रिल या पाच दिवसांच्या कालावधीत ठाणे शहर वाहतूक पोलीस आयुक्तालयात वाहतूक पोलिसांनी ८७३ वाहने जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक ४८० दुचाकींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्या खालोखाल २९६ रिक्षा, तर ९७ मोटारकारवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांकडून महत्त्वाच्या चौकांमध्ये तपासणी केली जात होती. यामध्ये सर्वाधिक कारवाई दुचाकी आणि रिक्षांवर करण्यात आली आहे.* ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये १४ ते १८ एप्रिल या संचारदबंदीच्या कालावधीमध्ये नियम धुडकावणाºया तब्बल तीन हजार ९१८ वाहन चालकांवर कलम १७९ नुसार कारवाई करण्यात आली. यामध्ये दुचाकीवर ट्रीपल सीट फिरणारे, वाहतूकीचे नियम मोडणाºया तसेच सीट बेल्ट न लावणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली आहे. यात भिवंडीमध्ये सर्वाधिक ४३७, नारपोलीमध्ये ४२६ तर कोनगावमध्ये ४१२ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.आपल्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी नागरीकांनीही महत्त्वाच्या कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस