शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

ठाण्यात आचारसंहिता काळात दोन हजार जणांवर कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: October 19, 2019 23:05 IST

निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राती ६८ अट्टल गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. तर सात पिस्तुलांसह ४९ बेकायदेशीर हत्यारे हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे४९ हत्यारे हस्तगत६८ अट्टल गुन्हेगार तडीपारएक कोटी पाच लाख ५६ हजार ४५० रुपयांची रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या महिनाभरात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत दोन हजार १० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, तर ६८ अट्टल गुन्हेगारांना तडीपार केले असून आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १४ दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, १० तलवारींसह बेकायदेशीररीत्या बाळगलेली ४९ हत्यारेही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.यात कलम १०७ नुसार १२३५ जणांवर, १०९ नुसार २५४ तर ११० नुसार ५२१ अशा दोन हजार १० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर ६८ अट्टल गुन्हेगारांना ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे या जिल्ह्यांमधून हद्दपार केले आहे. याव्यतिरिक्त ६५ जणांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव उपायुक्तांच्या कार्यालयात पाठविण्यात आले. आचारसंहिता २१ सप्टेंबर २०१९ पासून लागू झाल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांतील पोलीस ठाण्यांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व पथकांनी विशेष मोहीम राबवून या कारवाया केल्या.याशिवाय, बेकायदेशीर हत्यारे बाळगणा-यांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून यात सात पिस्तूल, नऊ गावठी कट्टे, दहा तलवारी, २२ चॉपर आणि ३६ काडतुसांचा समावेश आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकांसह ठाणे पोलिसांनी एक कोटी पाच लाख ५६ हजार ४५० रुपयांची रोकड जप्त केली आहे. यात शांतीनगरमध्ये दोन लाखांची रोकड, कोनगावमध्ये तीन लाख ८५ हजार ८१० रुपये, मुंब्रा पोलिसांनी आठ लाख १० हजार रुपये, निजामपुरा दोन लाख ७४ हजार १४० रुपये, अंबरनाथ ९२ हजार ५०० रुपये, तर कासारवडवली पोलीस ठाण्यात अपक्ष उमेदवार रमेश कदम यांच्याकडून मिळालेल्या ५३ लाख ४६ हजारांच्या रोकडचा यामध्ये समावेश आहे.* दारूबंदीच्या २०४ कारवायायामध्ये दारूबंदीच्या सुमारे २०४ कारवायांमध्ये ८० हजार १६२ लीटर दारूसह तीन लाख ३६ हजार ६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमली पदार्थांच्या २४ कारवाया करून ९१ हजार ३०० चा सात किलो गांजा, तर पाच लाख ४५ हजार २३० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.* आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १४ दखलपात्र, तर आठ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये आठ गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी झाली आहे. आर्म अ‍ॅक्टचे २६ गुन्हे दाखल असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ नुसार १३ जणांविरुद्ध कारवाई केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक