शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या आगीवेळी बसला पाणी कपातीचा फटका; बंब झाले रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 18:06 IST

बदलापुरातील कंपनीला आग लागल्यावर सर्वात आधी बदलापूरची अग्निशमन गाडी घटनास्थळी गेली. मात्र, आग भडकलेली असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अखंडीत पुरवठा गरजेचे होता.

- पंकज पाटील

बदलापूर : बदलापुरातील मानकिवली गावाला लागुन असलेल्या एमआयडीसी भागात छपाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या प्लॅटीनम पॉलीमोर या कंपनीला भीषण आग लागली. कंपनीपासून काही अंतरावरच कुळगांव-बदलापूर पालिकेचे अग्नीशमन केंद्र आहे. घटनास्थळी पालिकेचे बंब वेळेत देखील पोहचले. मात्र, पालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाण्याची कमतरता भासल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. भरलेल्या बंबातून जेवढे नियंत्रण मिळविणे शक्य झाले तेवढेच काम सुरुवातीला झाले. मात्र, अग्निशमन बंबाला पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारे टँकर भरले गेलेच नाहीत. शुक्रवारी एमआयडीसी भागात पाणी कपात असल्याने त्या परिसरातील पाणी पुरवठा हा पूर्ण बंद ठेवण्यात येत असल्याने पाणी कपातीचा फटका या कंपनीला सर्वाधिक बसला.

 बदलापुरातील कंपनीला आग लागल्यावर सर्वात आधी बदलापूरची अग्निशमन गाडी घटनास्थळी गेली. मात्र, आग भडकलेली असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अखंडीत पुरवठा गरजेचे होता. मात्र, पाणी कपातीमुळे गुरवारी रात्रीपासुनच पाणी पुरवठा बंद राहत असल्याने शुक्रवारी आग लागल्यावर ती आटोक्यात आणण्यासाठी पाणी कमी पडले. अग्नीशमन बंबाला टँकरने पाणी पुरवठा गरजेचे होते. मात्र, एमआयडीसी भागात पाणी बंद असल्याने टँकरला इतर ठिकाणाहुन पाणी भरुन आणावे लागत होते. अनेकवेळा पाण्याअभावी अग्नीशमन विभागाचे कर्मचारी हे केवळ पाण्याची वाट बघत बसले होते. आग मोठी असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन बंबासोबत टँकरचीही गरज होती. वेळेवर टँकर आले देखील मात्र हे टँकर भरण्यासाठी जागा नसल्याने घोळ झाला. सुदैवाने जीवन प्राधिकरणाचा पाणी पुरवठा सुरू असल्याने काही प्रमाणात पाण्याची कमतरता कमी झाली. मात्र, पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध न झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड जात होते. 

  पाण्यासोबतच बघ्यांचाही त्रास मोठय़ा प्रमाणात झाला. आग पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक एकत्रित आले होते. ही गर्दी आवरण्यातच प्रशासनाचा सर्वाधिक वेळ जात होता. पोलीस प्रशासनालाही गर्दीवरच लक्ष केंद्रीत करुन बसावे लागले. आग लागल्यावर काही स्फोट कंपनीत झाल्याने घातक रसायन असल्याची जाणिव अग्नीशमन विभागाला झाल्याने मोठी हानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी हे देखील सतर्क राहुन काम करत होते. 

  आजच्या आगीच्या घटनेमुळे आपत्कालीन स्थितीत पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने अग्नीशमन यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे. पाणी कपातीचे धोरण हे शासन स्तरावरील असले तरी आपत्कालीन स्थितीत पाण्याचा पर्यायी व्यवस्था नसल्याचे आजच्या आगीच्या घटनेवरुन स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :fireआगbadlapurबदलापूर