शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

बदलापूरच्या आगीवेळी बसला पाणी कपातीचा फटका; बंब झाले रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 18:06 IST

बदलापुरातील कंपनीला आग लागल्यावर सर्वात आधी बदलापूरची अग्निशमन गाडी घटनास्थळी गेली. मात्र, आग भडकलेली असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अखंडीत पुरवठा गरजेचे होता.

- पंकज पाटील

बदलापूर : बदलापुरातील मानकिवली गावाला लागुन असलेल्या एमआयडीसी भागात छपाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या प्लॅटीनम पॉलीमोर या कंपनीला भीषण आग लागली. कंपनीपासून काही अंतरावरच कुळगांव-बदलापूर पालिकेचे अग्नीशमन केंद्र आहे. घटनास्थळी पालिकेचे बंब वेळेत देखील पोहचले. मात्र, पालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाण्याची कमतरता भासल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. भरलेल्या बंबातून जेवढे नियंत्रण मिळविणे शक्य झाले तेवढेच काम सुरुवातीला झाले. मात्र, अग्निशमन बंबाला पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारे टँकर भरले गेलेच नाहीत. शुक्रवारी एमआयडीसी भागात पाणी कपात असल्याने त्या परिसरातील पाणी पुरवठा हा पूर्ण बंद ठेवण्यात येत असल्याने पाणी कपातीचा फटका या कंपनीला सर्वाधिक बसला.

 बदलापुरातील कंपनीला आग लागल्यावर सर्वात आधी बदलापूरची अग्निशमन गाडी घटनास्थळी गेली. मात्र, आग भडकलेली असल्याने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याचा अखंडीत पुरवठा गरजेचे होता. मात्र, पाणी कपातीमुळे गुरवारी रात्रीपासुनच पाणी पुरवठा बंद राहत असल्याने शुक्रवारी आग लागल्यावर ती आटोक्यात आणण्यासाठी पाणी कमी पडले. अग्नीशमन बंबाला टँकरने पाणी पुरवठा गरजेचे होते. मात्र, एमआयडीसी भागात पाणी बंद असल्याने टँकरला इतर ठिकाणाहुन पाणी भरुन आणावे लागत होते. अनेकवेळा पाण्याअभावी अग्नीशमन विभागाचे कर्मचारी हे केवळ पाण्याची वाट बघत बसले होते. आग मोठी असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन बंबासोबत टँकरचीही गरज होती. वेळेवर टँकर आले देखील मात्र हे टँकर भरण्यासाठी जागा नसल्याने घोळ झाला. सुदैवाने जीवन प्राधिकरणाचा पाणी पुरवठा सुरू असल्याने काही प्रमाणात पाण्याची कमतरता कमी झाली. मात्र, पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध न झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड जात होते. 

  पाण्यासोबतच बघ्यांचाही त्रास मोठय़ा प्रमाणात झाला. आग पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक एकत्रित आले होते. ही गर्दी आवरण्यातच प्रशासनाचा सर्वाधिक वेळ जात होता. पोलीस प्रशासनालाही गर्दीवरच लक्ष केंद्रीत करुन बसावे लागले. आग लागल्यावर काही स्फोट कंपनीत झाल्याने घातक रसायन असल्याची जाणिव अग्नीशमन विभागाला झाल्याने मोठी हानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी हे देखील सतर्क राहुन काम करत होते. 

  आजच्या आगीच्या घटनेमुळे आपत्कालीन स्थितीत पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने अग्नीशमन यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे समोर आले आहे. पाणी कपातीचे धोरण हे शासन स्तरावरील असले तरी आपत्कालीन स्थितीत पाण्याचा पर्यायी व्यवस्था नसल्याचे आजच्या आगीच्या घटनेवरुन स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :fireआगbadlapurबदलापूर