शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुदतवाढीचा गोषवारा आयुक्तांच्या अंगाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:48 AM

विकास आराखडा प्रकरण; अहवाल देण्याचा आदेश

मीरा रोड : सरकारच्या आदेशाला डावलून वादग्रस्त विकास आराखड्यास मुदतवाढ देण्याचा गोषवारा देणारे आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यावर कारवाईप्रकरणी सरकारने पालिकेस विनाविलंब अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे आमदार प्रताप सरनाईक यांनीही आयुक्तांवर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली आहे.‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या आराखडा घोटाळ्याप्रकरणी सरनाईक यांनी गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. शेतकरी, भूमिपुत्रांवर अन्याय, बिल्डरांकडून कोट्यवधींची वसुली व या सर्वात स्थानिक नेत्यामुळे आरक्षणबदल आदी मुद्दे उपस्थित केले होते. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हा प्रारूप आराखडा रद्द करून सरकारकडून एमआरटीपीच्या कलम २४ अन्वये नवा अधिकारी नेमून पुन्हा नव्याने प्रारूप तयार करण्याचे काम केले जाईल, असे जाहीर आश्वासन विधानसभेत दिले होते. त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. असे असताना २६ जुलैच्या विशेष महासभेत आयुक्तांनी आधीचाच वादग्रस्त विकास आराखडा प्रसिद्ध करणे व त्यास मुदतवाढ देण्याचा गोषवारा दिला. महापौर डिम्पल मेहता यांनीसुद्धा विषय घेत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासह विद्यमान नगररचना अधिकारी यांनी तीन महिन्यांत आराखडा महासभेत सादर करण्याचा ठराव मंजूर केला होता.भाजपाचे माजी नगरसेवक संजय पांगे यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार करत आयुक्तांनी विधिमंडळाचा अवमान केला आहे. आयुक्त व पालिकेची कृती विधानसभेचा अवमान करणारी असल्याने खतगावकर यांना व्यक्तिश: जबाबदार धरून कठोर कारवाईची मागणी केली होती. याप्रकरणी उपसचिव स.री. बांदेकर-देशमुख यांनी नगरविकास विभागास पत्र देऊन आयुक्त खतगावकर हे मुख्याधिकारी संवर्गातील असल्याने नगरविकास विभागाला कार्यवाही करण्यास कळवले होते. त्या अनुषंगाने नगरविकास विभागाचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी २१ जानेवारीच्या पत्रानुसार पालिका आयुक्तांनाच विनाविलंब अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, हे पत्र ई-मेलद्वारे पालिकेस २९ जानेवारीला मिळाले असून आयुक्तच सध्या रजेवर असल्याने सरकारला अहवाल देण्यास दिरंगाई केली जाण्याची शक्यता आहे.मार्चमध्ये विधिमंडळात मी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर सरकारने नव्याने अधिकारी नेमून विकास आराखडा तयार केला जाईल, असे स्पष्ट केले असतानाही आयुक्तांनी जुलैमध्ये आराखड्याला मुदवाढीचा गोषवारा देणे गंभीर असून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली विधिमंडळाचा केलेला अवमान खपवून घेणार नाही. आयुक्तांवर कारवाई झालीच पाहिजे.- प्रताप सरनाईक, आमदारआयुक्तांनी सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला, हे स्पष्ट असताना त्यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी वेळकाढूपणा केला जात आहे. निवडणुकांची आचारसंहिता लागू होईपर्यंत टोलवाटोलवी करण्याचा डाव आहे. कारवाईस टाळाटाळ करणाºया अधिकाºयांवरही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.- संजय पांगे, माजी नगरसेवक

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकcommissionerआयुक्त