शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणाऱ्यांनी जाळले शेत, ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:59 PM

केडीएमसीच्या २७ गावांमधील सोनारपाडा येथे मंगळवारी शेतजमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणा-या चौघांनी शेत जाळले.

कल्याण : केडीएमसीच्या २७ गावांमधील सोनारपाडा येथे मंगळवारी शेतजमिनीचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण करणा-या चौघांनी शेत जाळले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, ड्रोनद्वारे सर्वेक्षणासाठी पोलीस आयुक्तांलयाकडून परवानगी घेतल्याचे पत्र त्यांनी दाखवले आहे. याप्रकरणाची शहानिशा पोलीस करीत आहेत.सोनारपाडा येथे एका बिल्डरने जमीन घेतली असून, त्याला शेतकºयांचा विरोध आहे. शेतजमिनीवरील पिकपाण्याची नोंद व्हावी, यासाठी शेतकºयांनी कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी तहसीलदारांनी सोनारपाडा येथे जाऊन पीक पाण्याची नोंद केली होती.त्यानंतर दुपारी ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्वेक्षण सुरू झाले. सर्वेक्षण करणाºया चौघांनी एकाचे शेत जाळले. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना पकडले. ड्रोन कॅमेºयाद्वारे सर्वेक्षणाची परवानगी कोणी दिली, ओळखपत्र आहे का, असे ग्रामस्थांनी विचारले असता त्यांनी कोणतीच माहिती दिली. त्यामुळे त्यांना बिल्डरने पाठविले असावे, असा ग्रामस्थांचा संशय बळावला. ग्रामस्थांनी चौघांना पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्याविरोधात बेकायदा जमिनाचे सर्वेक्षण करून शेत जाळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे.>सर्वेक्षण कशासाठी?ठाणे पोलीस आयुक्तांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षणासाठी परवानगी दिल्याचे पत्र चौघांनी दाखवले आहे. त्यात महापालिकेच्या नगररचनाकार मा. द. राठोड यांना ही परवानगी दिली आहे.२७ गावांच्या विकासासंदर्भात हे सर्वेक्षण करायचे आहे, असे त्यात म्हटले आहे. २७ गावांचा विकास आराखडा तर २०१५ मध्ये मंजूर झालेला आहे, तर मग हे सर्वेक्षण कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी २७ गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी केली आहे.