शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे केंद्रीय मंत्र्यांचेहस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 16:02 IST

जवळपास ४६ लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १५ फूट असून १२५० किलो एवढे वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचे १०० वर्षे एवढे आयुष्यमान आहे,

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न राजकीय पक्ष बाजूला सारुन करावा, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रांगणात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पंधरा फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, आरपीआय एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.           भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा महापालिकेत उभारावा अशी भिवंडीकरांची मागणी होती. त्यानुसार पालिकेने पूर्णाकृती पुतळा उभारावा असा ठराव घेऊन त्यासंबंधी शासनाच्या सर्व संबंधित विभागाच्या परवानग्या घेण्यात आल्या असून जवळपास ४६ लाख रुपये खर्च करून भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची उंची १५ फूट असून १२५० किलो एवढे वजन आणि डार्क ब्राऊन ऑक्सीडाईझ करण्यात आलेल्या या पुतळ्याचे १०० वर्षे एवढे आयुष्यमान असल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत दिली.               भिवंडीतील अनधिकृत व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे असून तसा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठवावा अशी सूचना यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री शिंदे यांनी मनपा आयुक्तांना केली. समृद्धी महामार्गामुळे भिवंडीतील वाहतूक कोंडी सुटणार असल्याची आशाही शिंदेंनी यावेळी व्यक्त केली. तर डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशातील सर्व समाजाच्या नागरिकांचा उद्धार केला, तशीच सामाजिक जाणिव केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी लक्षात घेऊन ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न राजकीय पक्ष बाजूला सारुन करावा, अशी सूचना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

त्यास प्रतिउत्तर म्हणून बाबसाहेब हे समानतेचा संदेश देणारे नेते होते, जाती पातीचे राजकारण दूर ठेऊन त्यांनी सर्व कार्यामध्ये समानता ठेवत आपले कार्य केले. ठाण्यातील मंत्र्यांनी ठाणे शहराचा जसा विकास केला तसा भिवंडी शहराचा विकास झालेला नाही. त्यामुळे शहर विकासाबाबत तशीच समानता भिवंडी शहराच्या विकासाबाबत व्हावी कारण भिवंडी आणि ठाणे या शहरांमध्ये विकासाबाबत मोठी तफावत आहे, असे प्रतिउत्तर केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणातून मंत्री आव्हाड यांना दिले.                दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी पुतळ्याचे वास्तू विशारद जीवन धिवरे शिल्पकार स्वप्नील कदम व कंत्राटदार अशा तिघांचा सन्मान यावेळी उपस्थित मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मानसी राजे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनपा उपायुक्त दीपक झिंजाड यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील