शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

क्लस्टरसाठी रखडला डोंबिवलीतील पुनर्विकास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:52 AM

इमारती धोकादायक बनल्या, त्या पडल्या किंवा त्यातील रहिवासी बेघर झाले तरी त्यांच्या पुनर्विकासाचे पालिकेचे धोरण ठरत नसल्याचे नागूबाई निवास इमारतीच्या घटनेनंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे.

मुरलीधर भवारडोंबिवली : इमारती धोकादायक बनल्या, त्या पडल्या किंवा त्यातील रहिवासी बेघर झाले तरी त्यांच्या पुनर्विकासाचे पालिकेचे धोरण ठरत नसल्याचे नागूबाई निवास इमारतीच्या घटनेनंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे. हा विषय मुख्यमंत्र्यांकडे रखडल्याचा सांगत सत्ताधारी शिवसेना येतून अंग काढते आहे, तर मुख्यमंत्र्यांशी बोलून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण देत आहेत.सत्ताधारी शिवसेना-भाजपाला क्लस्टर योजना लागू करण्यात रस असल्याने धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचे धोरण जाहीर होत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला आहे.वस्तुत: क्लस्टरचा ठराव गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये महासभेने मंजूर केला. त्याच्या अंमलबजावणीसाठी व त्याला गती देण्यासाठी प्रक्रिया व पाठपुरावा अत्यंत संथ गतीने सुरु आहे. सरकारने निर्णय घेतलेला नाही, असे सांगून पालिकेतील अधिकारी मोकळे होतात.नागूबाई निवास खचल्याची बाब वेळीच लक्षात आल्याने जीव वाचला असला, तरी पालिकेकडे धोकादायक इमारतींमधील नागरिंकांच्या पुनर्वसनवर उत्तर नाही. ठाकुर्लीत इमारत कोसळल्याच्या घटनेतून पालिका, लोकप्रतिनिधींनी धडाच घेतलेला नाही. त्यामुळे अशा इमारतींच्या पुनर्बांधणीचा तिढा सुटलेला नाही.फक्त नोटिसा देण्याचा उपचारकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ५०० पेक्षा जास्त धोकादायक, अतिधोकायक इमारती आहेत. दोन वर्षे पाठपुरावा करूनही पुनर्वसनाचे धोरण ठरलेले नाही. खास करून एकेकट्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मोठा आहे. अशा इमारतींत राहणाºया कुटंबियांची संख्या १० हजारापेक्षा अधिक आणि रहिवाशांची संख्या लाखाच्या घरात आहे. तरीही पालिका त्यावर विचार करायला, धोरण ठरवायला तयार नाही.एखादी इमारत पडली किंवा काही भाग कोसळला तर पालिका खडबडून जागे झाल्यासारखे दाखवते. पुन्हा झोपेचे सोंग घेते. ठाकुर्ली दोन वर्षांपूर्वी इमारत कोसळून नऊ जमांचा बळी गेल्यापासून हा विषय तीव्रतेने समोर आला आहे. इमारत नैसर्गिकरित्या कोसळली, तर भाडेकरुंचे पुनर्वसन करण्याचीच तरतूद नसल्याचे सांगत पालिकेने हात वर केले होते. ठाकुर्लीच्या दुर्घटनेनंतर शेजारच्या दोन इमारती पाडण्यात आल्या. मात्र त्या परिसरातील अन्य धोकादायक इमारतींना पालिका दर पावसाळ्यात फक्त नोटिसा देते. पालिकेकडे संक्रमण शिबिराची व्यवस्थाही नाही.रस्ते विकासात बाधित होणाºया आणि धोकादायक इमारतीत राहणाºयांसाठी पुनर्वसनाचे धोरण जाहीर करण्याची मागणी विविध सदस्यांनी अनेक वेळा महासभेत केली. पण त्यावर निर्णय होत नाही. काही दिवसापूर्वीच महासभेत धोकादायक इमारतीचा प्रश्न सत्ताधारी शिवसेनेचे सदस्य दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केल्यावर मालक आणि भाडेकरुंतील न्यायालयीन वादाचा मुद्दा पालिका अधिकाºयांनी उपस्थित केला. ठिकठिकाणचा हा वाद मिटविण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतल्यास पुनर्विकासाचा प्रश्न सुटू शकतो, असे सांगून हा विषय पुन्हा नगरसेवकांच्या गळ््यात मारण्यात आला.नागूबाई निवासचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यानंतरही मालकांच्या कुटुंबीयांतील वादामुळे पुनविकास खोळंबला आहे. त्या स्थितीत धोकादायक झाल्याने इमारत सोडावी लागत असल्याने या रहिवाशांचा भाडेकरू म्हणून पुनर्विकासात असलेला हक्क अबाधित ठेवल्याचे आश्वासन त्यांना पालिका अधिकारी आणि नेत्यांनी दिले आहे. तसे पत्रही देण्यात आले आहे.इमारत खचल्याने अंगावरच्या वस्त्रानिशी घर सोडाव्या लागलेल्या रहिवाशांना घरातील वस्तू, सामानसुमान हलवता यावे, यासाठी रविवारी ठिकठिकाणी टेकू लावण्यात आले. त्यानंतर रहिवाशांनी आपापल्या घरातील वस्तू नेल्या. इमारत रिकामी केली.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण