शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

डोंबिवली: बिल्वदलचे रहिवासी न्यायाच्या प्रतिक्षेत, पालकमंत्र्यांनी दिली केवळ आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 6:22 PM

मानपाडा रोडवरील बिल्वदल ही इमारत ८ ऑगस्ट २०१४ रोजी अचानक खचल्याने त्या इमारतीमधील ४८ कुटुंबीयांना रातोरात जागा सोडण्यास सांगितले होते.

डोंबिवली: येथिल मानपाडा रोडवरील बिल्वदल ही इमारत ८ ऑगस्ट २०१४ रोजी अचानक खचल्याने त्या इमारतीमधील ४८ कुटुंबीयांना रातोरात जागा सोडण्यास सांगितले होते. तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनामुळे रहिवाश्यांनी इमारत तातडीने रिकामी केली. पण त्यास आज ३ वर्षे ८ महिने झाले, पुढे इमारतीच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने कसलीही हालचाल झालेली नाही. दोन दिवसांपूर्वी सुनिलनगरमधील ओमशिव गणेश या इमारतीला तडे गेल्याने त्यांनीही इमारत रीकामी केली, पण त्यांना आयुक्त गोविंद बोडके हे तातडीने प्लॅन मंजूर करुन देणार आहेत तर मग आमच्यावर अन्याय का असा सवाल रहिवाश्यांनी केला.येथिल रहिवासी शिवसेनेचे कार्यकर्ते संजय मांजरेकर म्हणाले की, यासंदर्भात अनेकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले असून मुख्यमंत्र्यांना १२० वेळा पत्रव्यवहार केला, पण हाती मात्र काहीही आले नाही. स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांनाही पत्र दिले, पण स्थिती जैसे थे. १९८३ मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. त्यामुळे इमारत जुनी झाली असून रिकामी करावी लागणार असे सोनवणे यांनी आदेश दिले, ते आम्ही तातडीने पाळले होते, पण ते एकल्यामुळेच रस्त्यावर येण्याची वेळ आली का असा सवाल मांजरेकर यांनी केला. पालकंत्र्यांना ९ जानेवारी रोजी देखिल भेटलो, पण बघू करु अशीच आश्वासने मिळाली, पुढे हालचाल मात्र काहीही झाली नाही. खासदात श्रीकांत शिंदेंनीही १७ जानेवारी रोजी आमची मंत्रालयात बैठक लावली होती. त्यावेळीही पालकमंत्री, महापौर, महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी, नगरसेवक सगळे उपस्थित होते, पण ती केवळ बैठकच ठरल्याचे ते म्हणाले.आतापर्यंत सहा आयुक्त आले, पण आमची ओंजळ रिकामीच राहीली. आता नवे आयुक्त बोडके हे वेगवान कार्यशील अधिकारी असल्याचे जाणवत आहे. ज्या प्रमाणे त्यांनी मंगळवारी डोंबिवलीत येत ‘त्या’ रहिवाश्यांना दिलासा दिला, तसाच न्याय आम्हालाही द्यावा अशी रहीवाश्यांच्या वतीने मागणी करत असल्याचे मांजरेकर म्हणाले. आयुक्त दर महिन्याच्या तिस-या सोमवारी डोंबिवलीत येणार असल्याचे कळले होते, ते जेव्हा डोंबिवलीत येतील तेव्हा त्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे ते म्हणाले. त्या रहिवाश्यांना न्याय मिळायलाच पाहिजे, पण आम्हालाही आमच्या जागा मिळाव्यात ही अपेक्षा असून आश्वासनांच्या हिंदोळयावर किती दिवस जगायचे असा सवाल मांजरेकर यांनी केला.