शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

ज्ञानेश्वर महाराज हे पहिले बंडखोर, अशोक शहाणे यांचे आख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 05:26 IST

‘कुंडली बघून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे सोपे नाही. तसे करणाऱ्यांनी या फंदात पडू नये’, असा थेट हल्ला चढवत ‘माझ्या मºहाठीचिये बोल कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची भाषा समजल्या जाणाºया संस्कृतविषयी बंड केले, ते कुणी का सांगत नाही, असा थेट सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक, सुप्रसिद्ध साहित्यिक, कला अभ्यासक अशोक शहाणे यांनी त्यांच्या ‘आख्याना’त केला.

ठाणे : ‘कुंडली बघून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे सोपे नाही. तसे करणाऱ्यांनी या फंदात पडू नये’, असा थेट हल्ला चढवत ‘माझ्या मºहाठीचिये बोल कवतिके। परि अमृतातेहि पैजा जिंके’ असे लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची भाषा समजल्या जाणाºया संस्कृतविषयी बंड केले, ते कुणी का सांगत नाही, असा थेट सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक, सुप्रसिद्ध साहित्यिक, कला अभ्यासक अशोक शहाणे यांनी त्यांच्या ‘आख्याना’त केला.ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात रविवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि साद या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहाणे यांना ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी बोलते केले. साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या मुक्तसंवादाचे साक्षीदार झाले.‘लिहित का नाहीत?’ या प्रश्नापासून सुरू झालेल्या या संवादात शहाणे यांच्या वाङ्मयीन चळवळीचे, त्यांनी केलेल्या बंडखोरीचे, भाषावैभवाचे, भाषासंस्कृतीच्या चिकित्सेचे अवाक् करणारे संचित त्यांनी रिते केले. ‘साताºयात असताना शाळा संपली की संघाच्या शाखेत जायचो. तिथे गटवार उभं केलं जायचं. प्रार्थना व्हायची. त्याआधी वर्तमानपत्रातले उतारे वाचून दाखवले जायचे. ते नथुराम गोडसेच्या विचाराचे असायचे. एकदा मी काहीतरी प्रश्न विचारला, त्यामुळे खाडकन थोबाडीत ठेवून दिली. मोकळा वेळ भरून काढायला जाणाºया मला जर थोबाडीत खावी लागत असेल तर कशाला जायचे, म्हणून संघात जाणे बंद केले, ती पठडीबाहेर पडण्याची सुरुवात होती.’ असे सांगत शहाणे यांनी अनेक बंडांचे अनुभवकथन केले.‘पुढील शिक्षणासाठी पुण्यात आलो. तिथे कॉलेजपेक्षा ‘गूडलक’ कॅफेवर रंगणाºया मैफलीतच अधिक शिक्षण मिळाले,’ असे सांगत मासिक संपादन करण्याची मिळालेली संधी, ‘रसरंजन’ अंकाच्या संपादनाचे अनुभव, भल्याभल्यांनी अंकाचे केलेले कौतुक, जीएंनी पाठवलेले पत्र, भाऊ पाध्येंच्या ‘वासू नाका’ची, चि. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबरीची, अनेकांशी उडालेल्या खटक्यांची गोष्ट सांगत जुन्या आठवणींचा एक समृद्ध कॅनव्हास अशोक शहाणे यांनी चित्रबद्ध केला.बंगाली भाषेतील अनेक कलाकृतींचे मराठीत भाषांतर करणारे शहाणे यांनी त्याविषयीच्या अनेक आठवणी सांगितल्या. ‘कुंडली पाहून मुलीचे लग्न जुळवण्याइतके भाषांतर करणे म्हणजे सोपे नाही. अनुवाद करताना काही पथ्ये पाळायची असतात. ज्या भाषेत ती गोष्ट असते, तिथले ते कल्चर असते. अनुवाद करताना त्या परंपरेच्या जवळ जाणारी आपली संस्कृती शोधावी लागते. तेव्हा ती आपल्याला जवळची वाटते. त्यासाठी तिथली संस्कृती, त्यासाठी वापरलेले शब्द समजून घेण्याची गरज असते,’ असे शहाणे म्हणाले. बंगालीत टागोर तर मराठीत कोण? या प्रश्नावर शहाणे म्हणाले, तुकाराम आहेत, पण वाचतो कोण? त्यांची कविता ३०० वर्षांपूर्वीची आहे, तरी ती जेव्हा वाचतो तेव्हा जिवंत होते.संस्कृतविषयी बोलताना शहाणे म्हणाले, संस्कृत जर देवाची भाषा म्हणावी इतकी समृद्ध असेल, तर मराठी निपजली नसती. ‘प्राकृत’ ही संस्कृत भाषेतील शिवी आहे, असे सांगत त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ‘अमृतातेहि पैजा जिंके’चा संदर्भ देऊन, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले ते बंड आहे, असे विवेचन केले.पुढील संवाद ढाले यांच्याशी‘साद’ ही संस्था पुढचा संवाद प्रसिद्ध साहित्यिक राजा ढाले यांच्याशी साधणार असून, संवादक प्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रज्ञा पवार असणार आहेत.‘ण’ व ‘न’ म्हणणाºयांवर ताशेरे‘बाणा’तल्या ‘ण’ला ‘न’ म्हणणाºयांना नाव ठेवणारे ‘प्रश्ना’तल्या ‘न’चा ‘ण’ उच्चार करतात. त्यांचे काय करायचे, असा उलट प्रश्न विचारून, त्यांनी या संवादाची सांगता केली आणि सभागृह ‘प्रश्न’तला ‘न’ उच्चारण्याचा सराव करू लागले.शिवाजी महाराज आणि तुकाराम समकालीनआजची परिस्थिती लेखक, कलावंतांसाठी चांगली नाही. आणीबाणीची परिस्थिती आहे, आपणास काय वाटते? या प्रश्नावर व्यक्त होताना शहाणे म्हणाले, ‘आपल्याकडे ही परिस्थिती नेहमीच असते. शिवाजी महाराज आणि तुकाराम समकालीन होते’ असे सांगत त्यावेळीही तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवण्यात आल्याची आठवण उपस्थितांना झाली.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या