शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जिल्हा नियोजन कार्यालय 1 एप्रिलपासून होणार पेपरलेस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 3:48 PM

जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज आय-पास संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठाणे : जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज आय-पास संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिल २०२०पासून नियोजन विभागाचे कामकाज पेपरलेस होणार आहे. नियोजन विभागाशी संबंधित सर्व कामे एका क्लिकवर होणार असल्याने सर्व विभागांना या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येत आहे. तरी सर्व विभागांनी 1 जानेवारीपासून सर्व प्रस्ताव ऑनलाइन सादर करावे, अशा सूचना उपायुक्त बापूसाहेब सबनीस यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता एकदिवसीय आय-पास प्रणाली प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना सबनीस यांनी सूचना दिल्या. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे उपस्थित होते. नियोजन विभागातील कामकाज पेपरलेस करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी इंटिग्रेटेड प्लानिंग ऑफिस ऑटोमेशन(आय-पास)प्रणाली विकसित करण्यात आली आहे.आय- पास ही संगणकीय यंत्रणा राज्यभर कार्यान्वित केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालांचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान, कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड ही सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना ,आमदार निधी, खासदार निधी,डोंगरी विकास कार्यक्रम या सारख्या विविध योजनांच्या कामांना मान्यता,निधी वितरण, सर्वंकष मॉनेटरींग, जी.पी.एस.लोकेशन टॅगिंग, कामाची प्रगती तपासणे इत्यादी विविध बाबींचा समावेश आहे. तसेच संबंधित विभागाच्या अधिका-यांना आपल्या प्रस्तावाची सद्यस्थिती, निधी, प्रस्ताव पास झाला किंवा नाही हे एका क्लिकवर दिसणार आहे.जनतेसाठी प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज संगणकीकृत होऊन सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समिती स्तरावर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निवेदिता पाटील यांच्या अधिपत्याखाली सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून सदर प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. सर्व विभाग प्रमुख आणि अधिनस्त कर्मचारी यांना युझर नेम व पासवर्ड तसेच हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे पूर्णत: संगणकीकरण करून कार्यालयातील कामकाज कागदविरहित (पेपरलेस) करण्याचे काम नाशिक येथील ईएसडीएस लि. या कंपनीकडे सोपविण्यात आले असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सांगितले. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.