शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

ठाणे : जिल्ह्यात ११ महिन्यांत ६३ बालमृत्यू: गतवर्षीच्या तुलनेत प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:21 AM

ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यात एकूण सात तालुके असून, चार तालुक्यांचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. मात्र, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांमध्ये बहुतेक भाग हा ग्रामीण असून, त्यामध्ये आदिवासी भागही आहे. या तालुक्यांत गतवर्षी (एप्रिल १६ ते मार्च १७) १०७ बालमृत्यूू झाला होता. कमी असलेले वजन, जुळी जन्माला येणारे बालके, अपघात, सर्पदंश, जन्मजात अपंग अशी एक नव्हेतर ४५ कारणांमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हीच लक्षात घेऊन हे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला त्या कारणावर चर्चा करून मुळाशी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आदिवासी भागात जन्मला येणाºया बालकांची आरोग्य विभागाद्वारे नियमित लसीकरण, तपासणी, मानव विकास शिबीर घेऊन बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार, तसेच सॅम आणि मॅम बालकांची १५ दिवसांनी तपासणी तसेच बालक-पालकांच्या सभा आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी गाभा समितीची दर तीन महिन्यांनी होणारी बैठक दरमहा होेत आहे.जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत मिळाली माहिती-फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गाभा समितीच्या बैठकीत एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान, जिल्ह्यात ६३ बालकांचा मृत्यू झाला असून, ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत ४४ ने घटल्याचे समोर आले. जिल्ह्यात बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण शहापुरात ७८ होते. त्यापाठोपाठ मुरबाड-१५ आणि भिवंडी-१४ होते. यंदा शहापुरात बालमृत्यूचे प्रमाण ४४ एवढे आहे. भिवंडीत ९ ने प्रमाण कमी होऊन यंदा ५ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुरबाडमध्ये एकने हे प्रमाण घटले असून, या वर्षात १४ बालक दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे