शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

पालघरमधील विविध रस्त्यांची खड्ड्यांमुळे दैना; मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर खड्डेच खड्डे :

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 11:55 PM

२५ मिनिटांच्या अंतरासाठी तासाभराचा वेळ, वाहनचालकांमध्ये व्यक्त होतोय संताप

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, वाडा तालुक्यांसह अनेक भागांतील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचेच साम्राज्य पसरलेले आहे. अनेक ठिकाणी रस्ता गायब होऊन फक्त खड्डेच दिसत असल्याने वाहन-चालकांना खड्डे चुकवण्याऐवजी रस्ताच शोधावा लागत आहे. तसेच एरवी २५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी आता तासाभराचा वेळ वाया जात असल्याने वाहनचालक संताप व्यक्त करत आहेत.

दरवर्षी पावसाचे वावडे असणाऱ्या त्र्यंबकेश्वर-मोखाडा रस्त्याची यंदाही दैना झाली आहे. सध्या या रस्त्यावर फक्त खड्ड्यांचेच साम्राज्य पसरले आहे. जव्हार ते मोखाडा आणि मोखाडा ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यात दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी अक्षरश: रस्त्यावरच तळे साचले आहे.

यामुळे नेमका खड्डा किती मोठा आहे याचाही अंदाज वाहनचालकांना येणे कठीण बनल्याने अपघातही होत आहेत. याशिवाय मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्ता अगोदरच घाट रस्ता असून त्यातच खड्डे पडल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु मागील वर्षी हाच रस्ता सां. बा. विभाग मोखाडा यांनी दुरुस्त केला होता. यामुळे हा रस्ता नूतनीकरण होईल तेव्हा होईल, मात्र सध्या या रस्त्यावरील खड्डे तरी किमान भरावेत, अशी अपेक्षा जनतेकडून करण्यात येत आहे.

भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग, कुडूस-चिंचघर-देवघर रस्ता, डाकिवली-चांबले-केळठण आदीसह तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आजारी, आबालवृद्ध, गरोदर माता भगिनींना या रस्त्यांवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील संपूर्ण रस्त्यांची वाताहत झाली असून रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतुकीस योग्य करण्याची मागणी केली आहे. अन्यथा स्वाभिमान संघटना कोरोना महामारीतही नियमांचे पालन करून जनतेच्या हितासाठी आमरण उपोषण करेल, असा इशारा स्वाभिमान संघटनेने दिला आहे.

टॅग्स :palgharपालघर