शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

पराभवानंतरच्या चिंतन बैठकीत राष्ट्रवादीची ट्रम्प अन् अंबानींवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 06:51 IST

वशिल्याच्या तट्टूंची हकालपट्टीची मागणी

ठाणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत काँगे्रस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील पक्षाचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या ठाणे ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ठाण्यातील एका शाळेच्या सभागृहात तीन दिवसांपूर्वी बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे मांडल्यावर माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी पराभवाची कारणमिमांसा करण्याऐवजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एकंदरीत राजकारण अन् उद्योगपती अनिल अंबानी यांची अधोगती का झाली, यावर भाष्य केल्याने सारेच कार्यकर्ते बुचकळ्यात पडले. अनेक नेत्यांनी ग्रामीण भागात पदाधिकारी म्हणून नेमलेल्या वशिल्याच्या तट्टूंची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.भिवंडीत मित्रपक्ष काँगे्रसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्यासह ठाणे मतदारसंघात आनंद परांजपे आणि कल्याण मतदारसंघात बाबाजी पाटील यांचा दारुण पराभव झाला. भिवंडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिवसा टावरेंचा प्रचार, तर रात्री कपिल पाटील यांचा पाहुणचार, असे धोरण अंगीकारल्याच्या तक्रारी होत्या. असाच प्रकार ठाणे आणि कल्याण मतदारसंघांतही झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या दोन बैठकांमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन पराभवावर विचारमंथन केले. सोबतच विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देशही दिले.पराभवाची कारणं जाणून न घेतल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोडजिल्ह्याचे नेते म्हणून गणेश नाईक यांनी तीन दिवसांपूर्वी ठाण्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी काय काम केले, कोणी गद्दारी केली, पक्षाचा पराभव कोणत्या कारणांमुळे झाला, मित्रपक्षांची भूमिका काय होती, यावर बोलण्याऐवजी फक्त इव्हीएमवर बोलण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली. या बैठकीत खरी कारणे, त्यांना सांगताच आली नाहीत. तरीही २३ कार्यकर्ते या बैठकीत बोलले. त्यानंतर गणेश नाईक हे गद्दारांची कानउघाडणी करून पराभवाची कारणमीमांसा करतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडले मात्र वेगळेच. गणेश नाईक यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकारण, त्यांच्या निर्णयांचे परिणाम, तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांचे चांगले-वाईट निर्णय अन् त्यांच्या व्यवसायाच्या अधोगतीवर भाष्य केल्याने आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAnil Ambaniअनिल अंबानीSharad Pawarशरद पवार