शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पराभवानंतरच्या चिंतन बैठकीत राष्ट्रवादीची ट्रम्प अन् अंबानींवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 06:51 IST

वशिल्याच्या तट्टूंची हकालपट्टीची मागणी

ठाणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांत काँगे्रस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील पक्षाचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या ठाणे ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ठाण्यातील एका शाळेच्या सभागृहात तीन दिवसांपूर्वी बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे मांडल्यावर माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी पराभवाची कारणमिमांसा करण्याऐवजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एकंदरीत राजकारण अन् उद्योगपती अनिल अंबानी यांची अधोगती का झाली, यावर भाष्य केल्याने सारेच कार्यकर्ते बुचकळ्यात पडले. अनेक नेत्यांनी ग्रामीण भागात पदाधिकारी म्हणून नेमलेल्या वशिल्याच्या तट्टूंची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.भिवंडीत मित्रपक्ष काँगे्रसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्यासह ठाणे मतदारसंघात आनंद परांजपे आणि कल्याण मतदारसंघात बाबाजी पाटील यांचा दारुण पराभव झाला. भिवंडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिवसा टावरेंचा प्रचार, तर रात्री कपिल पाटील यांचा पाहुणचार, असे धोरण अंगीकारल्याच्या तक्रारी होत्या. असाच प्रकार ठाणे आणि कल्याण मतदारसंघांतही झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या दोन बैठकांमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची चांगलीच झाडाझडती घेऊन पराभवावर विचारमंथन केले. सोबतच विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देशही दिले.पराभवाची कारणं जाणून न घेतल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोडजिल्ह्याचे नेते म्हणून गणेश नाईक यांनी तीन दिवसांपूर्वी ठाण्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी काय काम केले, कोणी गद्दारी केली, पक्षाचा पराभव कोणत्या कारणांमुळे झाला, मित्रपक्षांची भूमिका काय होती, यावर बोलण्याऐवजी फक्त इव्हीएमवर बोलण्याचे फर्मान सोडण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली. या बैठकीत खरी कारणे, त्यांना सांगताच आली नाहीत. तरीही २३ कार्यकर्ते या बैठकीत बोलले. त्यानंतर गणेश नाईक हे गद्दारांची कानउघाडणी करून पराभवाची कारणमीमांसा करतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात घडले मात्र वेगळेच. गणेश नाईक यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकारण, त्यांच्या निर्णयांचे परिणाम, तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांचे चांगले-वाईट निर्णय अन् त्यांच्या व्यवसायाच्या अधोगतीवर भाष्य केल्याने आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAnil Ambaniअनिल अंबानीSharad Pawarशरद पवार