शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सिंघम सरांच्या शिकवणीमुळेच लागली शिस्त, आमच्या जीवनाला आयाम देण्याचे केले महत्त्वाचे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:08 IST

सर्वच शिक्षकांनी खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार दिला. कधी कौतुक केले तर कधी ओरडले. कधी शिस्त लावली, तर कधी चुका सुधारण्याची संधी दिली. अशा सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते.

- अजित मांडकेठाणे : आमच्या विद्यानिकेतन (नाशिक) शाळेत सिंघम सर होते. विद्यार्थ्यांवर प्रेम करायचे आणि वेळप्रसंगी बिघडलेल्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे कामही तितक्याच ताकदीने करायचे. त्यांच्यामुळेच मला चांगली शिस्त लागलेली आहे, असे मत व्यक्त केले आहे, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी.सर्वच शिक्षकांनी खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार दिला. कधी कौतुक केले तर कधी ओरडले. कधी शिस्त लावली, तर कधी चुका सुधारण्याची संधी दिली. अशा सर्वांचेच शिक्षकदिनी स्मरण होते. - संजय केळकरआमची शाळाचहोती शिस्तप्रियमाझे सुरुवातीचे शिक्षण हे डहाणूसारख्या ग्रामीण भागात झाले. इयत्ता चौथीपर्यंत मी तेथे शिक्षण घेतले. त्यानंतर, इंटर्नशिपची परीक्षा देऊन मी नाशिक येथील शासकीय विद्यानिकेतन शाळेत प्रवेश घेतला. आता एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी असतात. परंतु, त्याकाळी १९६७ मध्ये एकच वर्ग असायचा, तोही ३० विद्यार्थ्यांचाच. ही शाळा शिस्तप्रिय होती.तास इतर कोणाचाही असला तरी सिंघम सर ठेवायचे लक्षवर्गात कोणत्याही शिक्षकाचा तास असू दे, सिंघम सर त्या वर्गाच्या बाहेर उभे राहून प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष ठेवून असत. विद्यार्थ्याचे अभ्यासाकडे लक्ष आहे किंवा नाही, अभ्यास न करता इतर काही गोष्टी वर्गात केल्या जात आहेत का, या बाबीकडे त्यांचे लक्ष असायचे. तसेच विद्यार्थीदशेत काय महत्त्वाचे असते, यावरही ते लक्ष ठेवत.काही वेळेस त्यांच्या ते लक्षात आले की, ते वर्गावर येऊन विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत. त्यामुळे आम्हाला त्याचा निश्चितच फायदा होत होता. एकूणच आमच्या जीवनाला आयाम देण्याचे महत्त्वाचे काम हे सिंघम सरांनीच केले.शिक्षकांचे संस्कार येतात कामी...शाळेतील विद्यार्थी शिकून बाहेर गेल्यावर त्याला शाळेचे संस्कार आणि शिस्त ही कामी येत असते आणि त्याच आधारावर पुढे आयुष्यात मोठे कार्य करूशकतो, अशी सिंघम सरांसोबतच सर्वच शिक्षकांची धारणा होती. कधी त्या अतिशिस्तीचा कंटाळा यायचा. पण, त्यांच्या सहवासातून आम्ही शिकलो, घडलो, वाढलो आणि आज ती शिस्त संपूर्ण प्रवासकार्यात उपयोगी येते आहे.तो खाऊगेला परतमहिन्यातून पहिल्या रविवारी पालकांना पाल्याला भेटू दिले जात होते. एकदा काही पालक शाळेत पाल्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या हातात खाऊ होता. त्यांना विचारले की, खाऊ तुम्ही सर्वांसाठी की, तुमच्या पाल्याकरिता आणला. आपल्या पाल्यासाठी आणल्याचे सांगितल्यावर सर्व पालकांना तो खाऊ परत घरी न्यावा लागला.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनTeacherशिक्षकthaneठाणे