शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

‘अर्थपूर्ण’ व्यवहारांत अडकले डिजिटायझेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:48 IST

काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने दोन वर्गासाठी एकच शिक्षक आहे. शिक्षक संख्या कमी असण्यापेक्षा बहुतांश शिक्षकांची इच्छाशक्ती दिसत नाही.

- धीरज परबमीरा-भाईंदर महापालिकेच्या ३६ शाळा आहेत. या शाळांमध्ये ७ हजार ८३४ विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षात विद्यार्थ्यांची संख्या जवळपास दोन हजारांनी कमी झाली आहे. मराठी माध्यमाच्या २१ तर हिंदी, गुजराती व उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी ५ शाळा आहेत. बहुतांश शाळांमध्ये १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग असून मोजक्याच ४ ते ५ शाळांमध्ये ८ वीचे वर्ग आहेत.शाळांमध्ये १७४ शिक्षक आहेत. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात २३४ शिक्षकांची गरज असल्याचा दावा केला जातो. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने दोन वर्गासाठी एकच शिक्षक आहे. शिक्षक संख्या कमी असण्यापेक्षा बहुतांश शिक्षकांची इच्छाशक्ती दिसत नाही. खाजगी शाळेतील शिक्षकांपेक्षा या सरकारी शाळांमधील शिक्षकांना गलेलठ्ठ पगार मिळत असतानाही विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे दुर्लक्ष होते, अशी पालकांची तक्रार आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षक गप्पा मारण्यात वा आपली वैयक्तिक कामे करण्यात व्यस्त असतात, असे काही पालकांचे म्हणणे आहे. चौथी-सहावीच्या विद्यार्थ्यांना धड वाचता येत नाही. अभ्यासात अन्य खाजगी शाळांच्या तुलनेत या शाळांमधील विद्यार्थी खूपच मागे पडले आहेत. महापालिका विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तर, पाण्याची बाटली आदी मोफत दिले जाते. पण शाळा सुरु होऊन कित्येक महिने उलटले तरी हे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मिळत नाही. यंदा शैक्षणिक वर्ष संपायला आल्यावर पालिकेने साहित्याचे वाटप केले. साहित्याचा दर्जा आणि त्याकरिता मोजलेला दर हे व्यस्त असल्याने हा सर्व संशोधनाचा विषय आहे.बहुतांश शाळांमध्ये मैदानाच नाही. नवघर शाळेच्या मैदानाची पुरती वाताहत करुन टाकली आहे. मुलांनी खेळायचं कुठे, असा प्रश्न बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांना पडला आहे. मैदाने नाहीत, आवश्यक साधनसामग्री नाही, चांगले प्रशिक्षक नाहीत. अशा स्थितीत मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार तरी कसे? महापौर चषकाच्या नावाखाली चमकोगिरी करुन घेण्यासाठी एक कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात पालिकेला धन्यता वाटते. त्यापेक्षा शाळांची स्थिती सुधारणे अधिक गरजेचे आहे, असे शिक्षक, पालक यांचे मत आहे.अनेक शाळांच्या इमारतींची दुरवस्था झालेली आहे. वर्ग, बाकडे यांच्या दुरुस्तीची गरज आहे. शाळांमधील स्वच्छतागृहे दुर्गंधीची आगार आहेत. पाणी नाही, स्वच्छता नाही, दारे तुटलेली आहेत. पण ‘स्वच्छ भारत’च्या जाहिराबाजीच्या नावाने लाखो रुपयांचा खर्च मोठ्या जोमाने केला जात आहे.काही लोकप्रतिनिधींची शाळांबाबत व्यापारी भूमिका आहे. पालिका शाळांवर खर्च करण्यापेक्षा त्या खाजगी संस्थांना आंदण देण्याचा निर्णय घेण्याकरिता त्यांचा आग्रह असून भविष्यात तसे झाल्यास नवल वाटायला नको.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरSchoolशाळा