शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सेल्फीमुळे कलावंत रसिकांमधील संवाद हरवलाय- सुबोध भावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 06:47 IST

गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवल्याची खंत; बालपणापासून ते अभिनय, दिग्दर्शनापर्यंतचा उलगडला प्रवास

कल्याण : पूर्वी कलाकार आणि रसिकांमध्ये संवाद असायचा. अलिकडच्या काळात हा संवाद मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. सेल्फीच्या नादात दोघांमधील संवाद हरवला जात असताना, सुभेदारवाडा गणेशोत्सवात सेल्फीचा अट्टाहास अनुभवास आला नसल्याचे प्रतिपादन अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी केले.सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा दुर्वांकुर मंडळातर्फे सुबोध भावे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात अनुश्री फडणीस यांनी भावे यांची मुलाखत घेतली. बालपणापासून ते अभिनय दिग्दशनापर्यंतचा प्रवास भावे यांनी यावेळी कथन केला. मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले गेले. मुलाखतीदरम्यान भावे म्हणाले, जेव्हापासून मोबाईलमध्ये कॅमेरा आलाय, तेव्हापासून आमच्या कलाकारांच्या डोक्याचा ताण वाढलाय. कुठे सेल्फी घ्यावी, याचेही भान कुणाला राहीलेले नाही. मोबाईल कॅमेरे नव्हते, तेव्हा प्रेक्षकांचा कलावंतांशी संवाद असायचा. तो संवाद म्हणजे जिवंतपणाचे लक्षण होते. सेल्फीच्या जमान्यात हा संवादच हरवलाय. तो कृपया हरवून देऊ नका, असे आवाहन भावे यांनी केले. उत्सवाच्या बदललेल्या स्वरूपाविषयीही भावे यांनी भाष्य केले. विचारांचे आदान-प्रदान व्हावे. समाजात संवाद घडावा, या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.परंतू सध्याचा गणेशोत्सव मूळ हेतूपासून दूर जाऊ लागला आहे. विचारवंत आणि बुध्दीवंतांनी समाजातील घटक म्हणून याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.अभिनयाच्या प्रवासाबाबत बोलताना ते म्हणाले, शालेय जीवनात स्नेहसंमेलनामधील नाटकात काम करायचो. तेव्हा मला नाटकाची फार आवड नव्हती; पण अशा संमेलनामध्ये हौशेपोटी काम करण्याचा एक वेगळा आनंद मिळायचा. महाविद्यालयातील युवा नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. एका नाटकात औरंगजेबाची भूमिका साकारली होती. येथून अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणे यासारखा मनस्वी आनंद कशातच नसतो. तो मला मिळाला. परंतू सध्या सर्वत्र उलट स्थिती आहे. माणसाला जन्मल्यापासून मोक्ष कशात आहे, हेच शिकविले जाते. अडीअडचणी, संकटे, अपयश या गोष्टी मी मानत नाही. त्यामुळे आयुष्यात नापास होण्याची भिती बाळगत नाही, असे म्हणाले.आमीर खाँ, अभिषेकींचा प्रभावजितेंद्र अभिषेकी, उस्ताद आमीर खाँ यांच्या गायकीने माझे आयुष्यच झपाटून टाकले. ते संगीताचे पुजारी होते. बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली या यशस्वी कलाकृतींमागे अभिनेता म्हणून केवळ माझे श्रेय नसून अभिषेकी आणि उत्साद खाँ यांच्या संगीताचाही मोलाचा वाटा आहे.

टॅग्स :Subodh Bhaveसुबोध भावे Ganpati Festivalगणेशोत्सवLokmanya Tilakलोकमान्य टिळकmusicसंगीत