शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

सेल्फीमुळे कलावंत रसिकांमधील संवाद हरवलाय- सुबोध भावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 06:47 IST

गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवल्याची खंत; बालपणापासून ते अभिनय, दिग्दर्शनापर्यंतचा उलगडला प्रवास

कल्याण : पूर्वी कलाकार आणि रसिकांमध्ये संवाद असायचा. अलिकडच्या काळात हा संवाद मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. सेल्फीच्या नादात दोघांमधील संवाद हरवला जात असताना, सुभेदारवाडा गणेशोत्सवात सेल्फीचा अट्टाहास अनुभवास आला नसल्याचे प्रतिपादन अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे यांनी केले.सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा दुर्वांकुर मंडळातर्फे सुबोध भावे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात अनुश्री फडणीस यांनी भावे यांची मुलाखत घेतली. बालपणापासून ते अभिनय दिग्दशनापर्यंतचा प्रवास भावे यांनी यावेळी कथन केला. मुलाखतीतून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले गेले. मुलाखतीदरम्यान भावे म्हणाले, जेव्हापासून मोबाईलमध्ये कॅमेरा आलाय, तेव्हापासून आमच्या कलाकारांच्या डोक्याचा ताण वाढलाय. कुठे सेल्फी घ्यावी, याचेही भान कुणाला राहीलेले नाही. मोबाईल कॅमेरे नव्हते, तेव्हा प्रेक्षकांचा कलावंतांशी संवाद असायचा. तो संवाद म्हणजे जिवंतपणाचे लक्षण होते. सेल्फीच्या जमान्यात हा संवादच हरवलाय. तो कृपया हरवून देऊ नका, असे आवाहन भावे यांनी केले. उत्सवाच्या बदललेल्या स्वरूपाविषयीही भावे यांनी भाष्य केले. विचारांचे आदान-प्रदान व्हावे. समाजात संवाद घडावा, या उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.परंतू सध्याचा गणेशोत्सव मूळ हेतूपासून दूर जाऊ लागला आहे. विचारवंत आणि बुध्दीवंतांनी समाजातील घटक म्हणून याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.अभिनयाच्या प्रवासाबाबत बोलताना ते म्हणाले, शालेय जीवनात स्नेहसंमेलनामधील नाटकात काम करायचो. तेव्हा मला नाटकाची फार आवड नव्हती; पण अशा संमेलनामध्ये हौशेपोटी काम करण्याचा एक वेगळा आनंद मिळायचा. महाविद्यालयातील युवा नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. एका नाटकात औरंगजेबाची भूमिका साकारली होती. येथून अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळणे यासारखा मनस्वी आनंद कशातच नसतो. तो मला मिळाला. परंतू सध्या सर्वत्र उलट स्थिती आहे. माणसाला जन्मल्यापासून मोक्ष कशात आहे, हेच शिकविले जाते. अडीअडचणी, संकटे, अपयश या गोष्टी मी मानत नाही. त्यामुळे आयुष्यात नापास होण्याची भिती बाळगत नाही, असे म्हणाले.आमीर खाँ, अभिषेकींचा प्रभावजितेंद्र अभिषेकी, उस्ताद आमीर खाँ यांच्या गायकीने माझे आयुष्यच झपाटून टाकले. ते संगीताचे पुजारी होते. बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली या यशस्वी कलाकृतींमागे अभिनेता म्हणून केवळ माझे श्रेय नसून अभिषेकी आणि उत्साद खाँ यांच्या संगीताचाही मोलाचा वाटा आहे.

टॅग्स :Subodh Bhaveसुबोध भावे Ganpati Festivalगणेशोत्सवLokmanya Tilakलोकमान्य टिळकmusicसंगीत