शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विकासकाने केली १२ वृक्षांची कत्तल; कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 01:55 IST

वृक्ष प्राधिकरण समितीची २६ नोव्हेंबरला सभा झाली होती.

ठाणे : माजिवडा येथील बेथनी हॉस्पिटलजवळ बांधकामासाठी विकासकाने विनापरवानगी १२ वृक्षांची मुळापासून छाटणी केली आहे. ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत प्रशासनाने ही माहिती दिली असली तरी पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल केली नाही. विकासकावर प्रशासनाची मेहरनजर का असा सवाल करून समिती सदस्या नम्रता भोसले-जाधव, सदस्य विक्रांत तावडे, संकेत दमामे यांनी कारवाईची मागणी केली आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीची २६ नोव्हेंबरला सभा झाली होती. या सभेत वृक्ष अधिकारी यांनी १३ प्रकरणे मांडली. १३ पैकी १२ प्रकरणांत एफआयआर दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे म्हटले होते. म्हणजेच या तिन्ही प्रकरणांत नियमांना बगल देऊन वृक्षतोड झाली होती. गंभीर बाब म्हणजे माजिवडा येथील इमारतीच्या बांधकामासाठी भला मोठा खड्डा खणण्यात आला. यात ११ वृक्षांचे पुनर्रोपण, १ वृक्ष तोडणे आणि एका वृक्षाच्या फांद्या तोडण्यात येणार होते. मात्र, विकासकाने सरसकट १२ वृक्षांची कत्तल केली आहे.

प्रत्यक्ष दौरा करणार

वृक्षांची कत्तल होऊन इतके दिवस झाले तरी विकासकावर कारवाई न केल्याने ही खेदजनक बाब असल्याचे सदस्यांनी म्हटले आहे. वृक्षांची कत्तल केली, त्या भागाचा तातडीने पाहणी दौरा करुन सखोल चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाenvironmentपर्यावरणMaharashtraमहाराष्ट्रpollutionप्रदूषण