शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

खड्ड्यातील दूषित पाणी आले ग्रामस्थांच्या नशिबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:06 IST

२० वर्षांपासून टंचाईचा करत आहेत सामना

- रोहिदास पाटील अनगाव : भिवंडी तालुक्यातील वळणाचापाडा, गवणीपाडा, दामूचापाडा, पागीपाडा या चार पाड्यांत पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न भेडसावत असतानाच तालुक्यातील गोदामपट्ट्यातील लोनाड ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील चौधरपाडा येथील बापदेवपाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. पाड्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.बापदेवपाड्यात १५ ते २० वर्षांपासून येथील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाड्याशेजारी खड्डा आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचलेले असते. ते पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने आरोग्यास धोकादायक असते. हे पाणी इतर कामासाठी वापरले जाते, तर पिण्यासाठी पाणी लांबून आणावे लागते. यामुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.येथील महिलांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करून पाणीसमस्या दूर करण्याची मागणी केली आहे. पंचायतीने या पाड्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला, मात्र पाड्याच्या बाजूला असणाऱ्या काहींनी त्याला विरोध केल्याने येथील महिला आणि त्यांच्यामध्ये वाद झाल्याने पंचायतीने टँकरने पाणीपुरवठा बंद केल्याने येथील पाड्यातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा उपविभागाच्या वतीने या पाड्यात बोअरवेल का केली नाही. पाणीपुरवठा विभाग झोपला होता का, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. तालुका पाणीटंचाईमुक्त झाल्याचे कागदोपत्री दाखवणारे अधिकारी आपल्यावर कारवाईची वेळ आल्यावर पाणीटंचाईच नसल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतात. गेल्या वर्षी ‘लोकमत’ ने पाणीटंचाईचे विदरक सत्य मांडल्यावर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राऊत व शाखा अभियंता भास्करराव यांनी पाणीटंचाई नसल्याचे जि.प. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम समिती सभापती यांना सांगितले होते. मात्र, ‘लोकमत’ने वास्तव मांडल्याने पाणीपुरवठा विभागाला अखेर मान्यच करावे लागले. या विभागाला असे दुर्लक्षित गाव, पाडे का दिसत नाहीत, वर्षभर ते काय करतात, असा प्रश्न विचारला जात आहे.लोनाड ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील या पाड्यात टंचाईचे संकट आहेच. मात्र, या पाड्यात जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. रस्ता नसल्याने येथील नागरिकांना येजा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तर, रुग्ण व मुलांना पावसाळ्याच्या दिवसांत शाळेत गुडघाभर चिखलातून पावसात जाण्याची वेळ येते. या पाड्यात रस्ता तर नाहीच. सार्वजनिक स्वच्छतागृहही नाही.गरोदरपणात माहेरीच राहावे लागतेपाणी नाही, त्यातच पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गरोदर महिलेला माहेरी राहूनच प्रसूती करावी लागते. तिच्या पोटात दुखायला लागले, तर तिला रुग्णालयात नेण्यासाठी रस्ताच नाही, अशी माहिती वैशाली जाधव यांनी दिली.या पाड्यात पाण्याची समस्या गंभीर आहे. येथील महिलांनी पंचायतीकडे तक्र ार केली आहे. महिलांना सोबत घेऊन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे नेले होते. त्यावेळी पाहणी करून ग्रामसेवकांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. तो बंद केला आहे. तो पुन्हा सुरू न केल्यास श्रमजीवी संघटना आंदोलन करेल.- डॉ. स्वाती खान-सिंह, कार्यकर्ती, श्रमजीवी संघटनाबापदेवपाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. मात्र, वाद झाल्याने बंद करण्यात आला आहे. लवकरच सुरू करण्याबाबत सरपंचांसह गटविकास अधिकारी यांना माहिती देणार आहे.- आर.डी. आंधळे, ग्रामविकास अधिकारी

टॅग्स :droughtदुष्काळbhiwandiभिवंडी