शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

बालसंरक्षक समित्यांचा अभाव तरीही जिल्ह्यात पाच बालविवाह रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 11:46 PM

प्रतिसादात्मक पातळीवर काम आवश्यक

सुरेश लोखंडेठाणे : कोरोनाकाळात राज्यात बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातही पाच बालविवाह रोखण्यात यश आले. हे बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बालसंरक्षक समित्यांचा अभाव असून जिल्ह्यात मुरबाड वगळता सर्व तालुक्यांतील गावपाडे आणि शहरांत समित्या स्थापन झालेल्या नसल्याची बाब उघड झाली.

कोरोनाकाळात बालविवाहांचे प्रमाण जिल्ह्यातही वाढल्याचे मानले जात आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बालसंरक्षण कक्ष, चाइल्ड लाइन आणि पोलीस भाग कार्यरत आहेेत. या यंत्रणांनी कोरोनाच्या आठ महिन्यांच्या कालावधीत पाच बालविवाह रोखले आहेत. यापैकी डोंबिवलीत दोन, उल्हासनगरला दोन आणि ठाण्याच्या कळवा परिसरात एक बालविवाह असे पाच बालविवाह या यंत्रणांनी रोखले आहेत. बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळेच बालविवाहांसंदर्भात प्रतिबंधात्मक आणि प्रतिसादात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करणे आवश्यक आहे. 

बालसंरक्षक समित्या करतात हे कामस्थानिक पातळीवरील या बालसंरक्षक समितीचे सदस्य त्यांच्या कार्यक्षेत्रात एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असल्याची माहिती प्राप्त होताच तातडीने त्याची दखल घेऊन त्याची माहिती बालविवाह प्रतिबंधक अधिकारी किंवा सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना देऊन बालविवाह थांबवण्याचे आवश्यक व महत्त्वाचे कार्य या समित्यांकडून केले जाते. त्यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलीस विभाग आणि चाइल्ड लाइन यांचेही कार्य महत्त्वाचे आहे.

या शहरांत एकही समिती नाहीअसे असले तरी बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या शहरांत प्रभागनिहाय व ग्रामीणमध्ये गावनिहाय समित्या अद्यापही स्थापन झालेल्या नसल्याचे गंभीर वास्तव बालविवाहासंदर्भातील चौकशीअंती निदर्शनात आले आहे. केवळ मुरबाड तालुक्यात २६९ महसुली गावांत बालसंरक्षक समित्यांची स्थापना झाली असल्याचे निदर्शनात आले आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या सहापैकी एकाही महानगरपालिकेच्या शहरात बालसंरक्षक समिती स्थापन झाली नसल्याची गंभीर बाब प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात समित्यांबाबत उदासीनतासमित्या स्थापन करण्याची उदासीनता जिल्ह्यात आढळून आली आहे. देशात सर्वात जास्त महापालिकांचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. या महानगराच्या कोणत्या कोपऱ्यात काय घडते त्याची माहिती ठेवणाऱ्या यंत्रणांच्या समित्यांप्रमाणे बाल संरक्षक समित्यांची सर्वत्र आवश्यकता आहे.

 

टॅग्स :marriageलग्न