शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बालसंरक्षक समित्यांचा अभाव तरीही जिल्ह्यात पाच बालविवाह रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 23:47 IST

प्रतिसादात्मक पातळीवर काम आवश्यक

सुरेश लोखंडेठाणे : कोरोनाकाळात राज्यात बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातही पाच बालविवाह रोखण्यात यश आले. हे बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बालसंरक्षक समित्यांचा अभाव असून जिल्ह्यात मुरबाड वगळता सर्व तालुक्यांतील गावपाडे आणि शहरांत समित्या स्थापन झालेल्या नसल्याची बाब उघड झाली.

कोरोनाकाळात बालविवाहांचे प्रमाण जिल्ह्यातही वाढल्याचे मानले जात आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बालसंरक्षण कक्ष, चाइल्ड लाइन आणि पोलीस भाग कार्यरत आहेेत. या यंत्रणांनी कोरोनाच्या आठ महिन्यांच्या कालावधीत पाच बालविवाह रोखले आहेत. यापैकी डोंबिवलीत दोन, उल्हासनगरला दोन आणि ठाण्याच्या कळवा परिसरात एक बालविवाह असे पाच बालविवाह या यंत्रणांनी रोखले आहेत. बालविवाहाचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळेच बालविवाहांसंदर्भात प्रतिबंधात्मक आणि प्रतिसादात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर काम करणे आवश्यक आहे. 

बालसंरक्षक समित्या करतात हे कामस्थानिक पातळीवरील या बालसंरक्षक समितीचे सदस्य त्यांच्या कार्यक्षेत्रात एखाद्या ठिकाणी बालविवाह होत असल्याची माहिती प्राप्त होताच तातडीने त्याची दखल घेऊन त्याची माहिती बालविवाह प्रतिबंधक अधिकारी किंवा सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना देऊन बालविवाह थांबवण्याचे आवश्यक व महत्त्वाचे कार्य या समित्यांकडून केले जाते. त्यासाठी जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलीस विभाग आणि चाइल्ड लाइन यांचेही कार्य महत्त्वाचे आहे.

या शहरांत एकही समिती नाहीअसे असले तरी बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या शहरांत प्रभागनिहाय व ग्रामीणमध्ये गावनिहाय समित्या अद्यापही स्थापन झालेल्या नसल्याचे गंभीर वास्तव बालविवाहासंदर्भातील चौकशीअंती निदर्शनात आले आहे. केवळ मुरबाड तालुक्यात २६९ महसुली गावांत बालसंरक्षक समित्यांची स्थापना झाली असल्याचे निदर्शनात आले आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर या सहापैकी एकाही महानगरपालिकेच्या शहरात बालसंरक्षक समिती स्थापन झाली नसल्याची गंभीर बाब प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात समित्यांबाबत उदासीनतासमित्या स्थापन करण्याची उदासीनता जिल्ह्यात आढळून आली आहे. देशात सर्वात जास्त महापालिकांचा जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. या महानगराच्या कोणत्या कोपऱ्यात काय घडते त्याची माहिती ठेवणाऱ्या यंत्रणांच्या समित्यांप्रमाणे बाल संरक्षक समित्यांची सर्वत्र आवश्यकता आहे.

 

टॅग्स :marriageलग्न