शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

उत्तन भागात निर्माण होणाऱ्या मत्स्य कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 17:04 IST

भार्इंदरच्या उत्तन ते चौक दरम्यानच्या मच्छीमारांना मिळणा-या मासळी पैकी त्यातली खराब मासळी वा मासळीतील टाकाऊ अवयवांचा रोजचा सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असल्याचा दावा करत उत्तनच्या कोळी जमात संस्थेने सदर कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याची मागणी चालवली आहे.

 मीरा रोड  - भार्इंदरच्या उत्तन ते चौक दरम्यानच्या मच्छीमारांना मिळणा-या मासळी पैकी त्यातली खराब मासळी वा मासळीतील टाकाऊ अवयवांचा रोजचा सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असल्याचा दावा करत उत्तनच्या कोळी जमात संस्थेने सदर कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याची मागणी चालवली आहे.कोळी जमात संस्थेचे पाटील कलमेत गौरया व त्यांच्या सहकारयांनी या बाबतचा एक तक्ता बनवला आहे. जमातीने तयार केलेल्या तक्त्या नुसार उत्तन ते चौक किनारपट्टी वर मच्छीमारांच्या २२५ मोठ्या बोटी , ३७० जाळीवाल्या बोटी तर २५५ लहान बोटी अशा मिळुन एकुण ८५० मासेमारी बोटी आहेत.मोठ्या २२५ बोटीं पैकी दिवसाला दिडशे बोटी मासळी घेऊन आल्या तर एक बोट सुमारे १० टन मासळी आणते. दिडशे बोटीं नुसार दिवसाला दीड हजार टन मासळी येते . त्यातील १२५ टन मासळी विक्री साठी तर ११०० टन सुकवण्यासाठी जाते. तर २७५ टन मासळी ही जेवणा साठी, खतासाठी , भेट म्हणुन वापरली जाते. त्यात खराब मासळी देखील असते.जाळीवाल्या ३७० बोटीं पैकी १२५ बोटी दिवसाला मासळी घेऊन आल्या तर प्रती बोट टन प्रमाणे १२५ टन मासळी येते. त्यातील ११८ टन विक्री साठी तर ७ टन मासळी जेवणासाठी, भेट आदी साठी वापरली जाते. २५५ लहान बोटीं पैकी दिवसाला २०० बोटी मासळी घेऊन आल्या तर प्रती बोट ५०० किलो मासळी नुसार १०० टन मासळी येते. त्यातील २० टन मासळी बाहेर विक्रीसाठी तर ७० टन मासळी सुकवली जाते. शिवाय १० टन मासळी ही जेवणासाठी, खतासाठी वापरली जाते.म्हणण्या नुसार एकुण आलेल्या रोजच्या १७०० टन ओली मासळी पैकी ११७० टन मासळी सुकवली जाते. २६३ टन मासळी विक्री साठी नेली जाते. तर उरलेल्या २६७ टन मासळी पैकी २१० टन मासळी खता साठी ; ५७ टन मासळी खाण्यासाठीतर ५ टन मासळीची आतडी, कुजलेली मासळी वा भाग आदी किनारयावर किंवा अन्यत्र फेकला जातो.किनारयावर टाकलेला हा मासळीचा कचरा जर भरतीच्या पाण्याने वाहुन गेला नाही तर किनारयावर पदुन कुजतो व त्यात किडे पडतात. दुर्गंधी पसरते असे हॅन्ड्री गंडोली यांनी सांगीतले. सदर ५ टन मासळीच्या कचरया प्रश्नी महापालिकेने लक्ष देऊन त्याची विल्हेवाट लावावी या साठी आम्ही आयुक्तांना भेटणार होतो. सभागृह नेते रोहिदास पाटील देखील सोबत होते. पण त्यांना अचानक जावे लागल्याने आमची आयुक्तां सोबतची भेट होऊ शकली नाही असे गंडोली यांनी सांगीतले. आम्ही पुन्हा आयुक्तांची वेळ घेऊन या मासळीच्या कचरया बद्दल बोलणार आहोत असे ते म्हणाले.मच्छीमार नेते बर्नड डिमेलो म्हणाले की, मासळीचा कुठलाही भाग मच्छीमार वाया जाऊ देत नाही. पावसाळ्यात मासळीच्या कचरयाचा थोडाफार प्रश्न निर्माण होतो. पालिकेने व शासनाने मच्छीमारांना मासळी सुकवण्यासाठी जागा उपलबध्द करुन द्यावी. त्याच सोबत टाकाऊ मासळी वा त्याचा भाग सुकवण्यासाठी जागा दिल्यास चांगलं कुटा खत जास्त प्रमाणात तयार करता येईल. पालिकेने सदरचे खत खरेदी करावे अशी मागणी डिमेलो यांनी केली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारmira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर