शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

डोंबिवलीमार्गे मेट्रो धावण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच , १७ स्थानके प्रस्तावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 06:36 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबरच्या कल्याण येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डोंबिवली-तळोजा या नव्या मेट्रोमार्गाची घोषणा केली होती.

- नारायण जाधवठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबरच्या कल्याण येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डोंबिवली-तळोजा या नव्या मेट्रोमार्गाची घोषणा केली होती. परंतु, प्रत्यक्षात एमएमआरडीएने आपल्या २१ नोव्हेंबरच्या बैठकीत मेट्रो-१२ च्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) वर शिक्कामोर्तब करून ती डोंबिवलीमार्गेच धावणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेच्या महिनाभर आधीच मेट्रो ही कल्याणहून डोंबिवलीमार्गे धावणार असल्याचे एमएमआरडीएने निश्चित केले होते, हे या बैठकीचे जे इतिवृत्त दि. २४ डिसेंबरला प्रसिद्ध केले आहे, त्यावरून स्पष्ट झालेआहे.मेट्रो-५ अर्थात ठाणे-भिवंडी-कल्याणचाच मेट्रो-१२ हा विस्तारित मार्ग असल्याचे दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने आॅक्टोबर २०१८ मध्ये एमएमआरडीएला सादर केलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. हा मार्ग पूर्ण करण्यासही डिसेंबर २०२१ ची डेडलाइन आहे.मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली-तळोजा हा नवा मार्ग सुरू करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर खा. श्रीकांत शिंदे यांनी २१ नोव्हेंबरच्या बैठकीत मंजूर केलेला डीपीआर खरा की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबरला घोषित केलेला डोेंबिवली-तळोजा हा मार्ग खरा, असा प्रश्न करून संभ्रम दूर करावा, असे आवाहन केले होते. मात्र, आता एमएमआरडीएच्या इतिवृत्तानंतर या सर्व वादावर पडदा पडला आहे.ग्रोथ सेंटरसह नवी मुंबई विमानतळाला फायदाकल्याणनजीकचे ग्रोथ सेंटर, २७ गावे, नैना परिसरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील वसाहती, औद्योगिक पट्टा यांना फायदा होईल. शिवाय इंधन, प्रवासाचा वेळ यात बचत होणार असून हवा, ध्वनिप्रदूषण कमी होऊन प्रवाशांना सुरक्षित असा गारेगार प्रवास करता येईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.पहिल्या टप्प्याचे भाडे १० रुपयेकल्याण-डोंबिवली-तळोजा मेट्रो-१२ हा मार्ग २०.७५ किमीचा असून या मार्गावर एकूण १७ उन्नत स्थानके राहणार आहेत. या मार्गावर सध्या ४१३२ कोेटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. इतर मेट्रोमार्गांप्रमाणेच या मार्गावरील पहिल्या तीन किमीच्या टप्प्याचे भाडे १० रुपये असून पुढे ते १२ किमीपर्यंत २० रुपये, १८ किमीपर्यंत ३० रुपये, २४ किमीपर्यंत ४० रुपये ३० किमीपर्यंत ५० रुपये, ३६ किमीपर्यंत ६० रुपये, ४२ किमीपर्यंत ७० रुपये आणि त्यापुढील टप्प्यासाठी ८० रुपये असेल, असे एमएमआरडीएने म्हटले आहे.अशी असेल प्रवासीसंख्यामे.ली. असोसिएट्सचा २००८ चा अहवाल आणि एमएमआरडीए, सिडको यांच्या २०१६-३६ च्या अहवालांच्या आधारे दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने या मार्गावर एमएमआरडीए क्षेत्रातील २९.३२ लाख, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २.४४ लाख आणि कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ३.४८ लाख प्रवासी प्रवास करतील, असे गृहीत धरले आहे.जमीन देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवररेल्वेमार्ग, १७ स्थानके, कारडेपो आणि विद्युतव्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी जमीन संपादन करावी लागणार आहे. यात कारडेपो आणि विद्युतकर्षण केंद्रासाठी आवश्यक ती शासकीय किंवा खासगी जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यात्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवण्यात आली आहे.

टॅग्स :Metroमेट्रोdombivaliडोंबिवली