शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

ठाणे जिल्ह्यात वीजेच्या धक्याने दोघांचा मृत्य; धरणातील पाणी साठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 4:44 PM

ठाणे : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या दरम्यान रात्रभरातील वीजेच्या धक्याच्या दुर्घटनेत अंबरनाथसह ठाण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर काही ...

ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी.सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २५० मिमी.१७१ मिमी. सर्वाधिक पाऊस बारवी धरणात

ठाणे : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या दरम्यान रात्रभरातील वीजेच्या धक्याच्या दुर्घटनेत अंबरनाथसह ठाण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर काही उल्हासनगरमधील मार्केटमध्ये पाणी साचले. जिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी. पडल्याची नोंद झाली असून धरणांच्या पाणी साठ्यात दीड ते सव्वा दोन टक्केने वाढ झाली आहे.       येथील पश्चिमेकडील शिरोर पाडा येथे वीजेच्या तारावर झाडाची फांदी पडली. त्याव्दारे वीजेचा धक्का बसून नागेश मलअप्पा निरंगे (४६) यांचा मृत्यू झाला. या प्रकारची दुर्घटना आंबरनाथ रेल्वे स्टेशनबाहेरील परिसरात झाडाच्या फांदीमुळे वीजेचा धक्का लागून स्टँडवर उभ्या असलेल्या रिक्षातील चालक विश्न नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. तर येथील कामगार नाक्याजवळी इंदिरा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यात रात्री झाड पडल्याची घटना घउली. या दुर्दैवी घटने व्यतिरिक्त जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे दिसून येत आहे.        जिल्ह्यात एक हजार ३३६ मिमी पाऊस पउला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २५० मिमी. तर या खालोखाल कल्याणला २३८ मिमी, ठाणेला २२८, उल्हासनगरला २०८, अंबरनाथला १८७, शहापूरला १७० मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस मुरबाड तालुक्यात ५५ मिमी पाऊस पडला. आहे.जिल्ह्यात सरासरी १९०.९४ मिमी. पाऊस मागील २४ तासात पडल्याची नोंद करण्यात आली आहे.याप्रमाणेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.        भातसा धरणात १७० मिमी. तर मोडकसागरमध्ये ११९, तानसात १२७ मिमी पाऊस पडला आहे. याप्रमाणेच बारवी धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाल्याचे आढळून आले. या धरणात रात्रभरात सब्बा दोन टक्के पाणी साठा वाढला असून तो आता १५.२० टक्के आहे. या धरणात १७१ मिमी. सर्वाधिक पाऊस पडला. या बारवी धरणातील पाणलोटक्षत्रापैकी खानीवरे परिसरात १६२ मिमी, कानहोल परिसरात १६१ मिमी. पाटगाव क्षेत्रात १८४ आणि ठाकूरवाडी परिसरात १३१ मिमी पाऊस या पाणलोट क्षेत्रात पडल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेdam tourismधरण पर्यटन