शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुरबाड तालुक्यातील घरांचे वादळी पावसाने केले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:16 IST

नेत्यांकडून साधी चौकशीही नाही; कुटुंबे आली रस्त्यावर

मुरबाड : गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी तालुक्यातील शिरोशी, टोकावडे, शेलगाव, माळ, वैशाखरे अशा सुमारे पंचवीस ते तीस गावात झालेल्या वादळी पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले. या घरांमध्ये राहणारी कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अगोदरच रोजगार तसेच अन्नधान्यापासून वंचित असणारी कुटुंबे उघड्यावर दिवस काढत आहेत.पावसाळा सुरु होण्यापूर्वी प्रत्येकजण पावसाळ््यापासून घराचा बचाव करण्यासाठी काळजी घेत असतो. टोकावडे परिसरातील शिरोशी, वेळुक, माळ, शेलगाव, वैशाखरे आणि धसई परिसरातील अनेक गावांमध्ये दोन दिवसांपूर्वी वादळी पावसाने थैमान घातले. यात घरांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत. अगोदरच रोजगारासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करणाऱ्या नागरिकांपुढे निवाºयाचा प्रश्न उभा राहिला असून मागील महिन्यात मतांसाठी फिरणाºया नेत्यांनी बेघर कुटुंबांची साधी भेटही घेतलेली नाही.या परिसरातील नागरिकांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जरी तहसीलदारांनी दिले असले तरी तालुक्यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे त्यांना तात्काळ मदत देऊन निवाºयाची सुविधा उपलब्ध केव्हा होईल या प्रतीक्षेत नागरिक आहेत. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.पंचनामे करण्याचे दिले आदेशनैसर्गिक आपत्तीत शेकडो घरांचे नुकसान होऊन काही कुटुंबे रस्त्यावर आली असल्याने त्याचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिले आहेत. ते मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून बांधकाम विभागाच्या अहवालानुसार भरपाई देण्यात येईल, असे तहसीलदार अमोल कदम यांनी सांगितले. दरम्यान, खासदार कपिल पाटील यांनी घटनास्थळी भेट द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रकाश पवार यांनी केली आहे.

टॅग्स :murbadमुरबाड