शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

धरण भरले पण बिघाड व तांत्रिक अडचणींमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 19:44 IST

जोरदार पावसामुळे धरणं भरली असताना पाणी मात्र कमी येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीत झालेल्या सततच्या तांत्रिक बिघाड व अडचणींमुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर मात्र विपरीत परिणाम झाला आहे. जोरदार पावसामुळे धरणं भरली असताना पाणी मात्र कमी येत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. 

शहराला महाराष्ट्र् औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. बारवी धरण भरून वाहू लागले असताना मीरा भाईंदर मध्ये मात्र पाणी पुरवठा कमी होत आहे. गेल्या काही दिवसात विविध कारणांनी पाणी पुरवठा अपुरा होत आहे . मुसळधार पावसामुळे कचरा अडकून पंप चॉकअप होणे, बंद पडणे, बिघडणे असे प्रकार घडले. दोन वेळा जलवाहिनी फुटली. दुरुस्तीसाठी चार तासांचा शटडाऊन घेतला तरी शहराला पाणी मिळण्यास ८ तास जातात. ते पाणी सुद्धा कमी दाबाने असते. 

पाऊस जोरात असला कि वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा बंद पडतो. त्यातही मीरा भाईंदर हे टेल एन्ड ला असल्याने पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो पुन्हा सुरळीत होण्यास व पाण्याचे प्रेशर वाढण्यास एक - दोन दिवस तर सहज जातात . जेणे करून गेल्या काही दिवसां पासून पाणी कमी येत असल्याने नागरिकांना देखील पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. 

महामंडळाकडून पाणी पुरवठा या विविध तांत्रिक अडचणी, बिघाड यामुळे अगदी ८० ते ८५ दशलक्ष लिटर वर आला होता  स्टेमकडून ८६ दशलक्ष लिटर पाणी येत असले तरी तेथे देखील वीज गेली वा तांत्रिक बिघाड मुळे शटडाऊन घ्यावा लागला होता. परंतु महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा कमी झाल्याने त्याचा जास्त फटका नागरिकांना बसला. जेणेकरून शहरातील पाणी पुरवठा  ४८ ते ६० तासांवर जाऊन पोहचला होता. आता त्यात सुधारणा झाली असून पुरवठा ३८ ते ४० तासांवर आला आहे असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :WaterपाणीMira Bhayanderमीरा-भाईंदर