शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबिवली शहराला गुन्हेगारीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 06:07 IST

पोलीस यंत्रणेने या गंभीर घटनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक ठिकाणी सीसी कॅमेरे लावणे अत्यावश्यक आहे

अनिकेत घमंडी, डोंबिवली

हल्ल्यामुळे महापालिकेतील अधिकारी दहशतीखाली कार्यरत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात असून त्याचा सर्वाधिक परिणाम शहराच्या विकासकामांवर होणार आहे. लाचखोरीमध्ये ही महापालिका आघाडीवर आहे. या भ्रष्टाचारात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लागेबांधे वेळोवेळी स्पष्ट झाले आहेत; पण म्हणून कुणी जुना वाद, राग मनात ठेवून अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करत असेल, तर ते कृत्य निश्चितच समर्थनीय नाही. असे हल्ले करून महापालिकेच्या यंत्रणेवर कोणी दबाव आणणार असेल, तर ते निंदनीय आहे.

अशा घटनांमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचा संबंधितांचा हेतू काहीअंशी साध्य होत असला, तरी त्यामुळे शहरांची बकाल अवस्था आणखी वाढणार असून, पुढच्या पिढीचे आयुष्यही धोक्यात येणार आहे. आधीच नियमांना बगल देत अनेक बेकायदा कामे या ठिकाणी होत असल्याने त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. या शहरामध्ये रातोरात बेकायदा बांधकामे उभी राहत असून, टोलेजंग इमारती बांधण्यापर्यंत अनेकांची मजल जाते. त्यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर कारवाईसाठी कोणी अधिकारी गेला की, कारवाई कशी होणार नाही, यासाठी कसे दबावतंत्र वापरले जाते, हेदेखील सर्वश्रुत आहे. त्यामुळे येथील लोकशाही सशक्त नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. त्यामुळे अधिकारीच काय, तर येथील नागरिकदेखील प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.प्रभाग अधिकाºयांवर हल्ला करणे, अतिक्रमण हटाव पथक कारवाईला गेल्यावर जमावाने अधिकाºयांवर दबाव निर्माण करण्याच्या घटना याआधीही येथे घडल्या आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांचे प्रचंड मोठे जाळे याठिकाणी झाले असून, त्याविरोधात कुणालाही अवाक्षर बोलण्याची सोय नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार इथे सर्वांनाच सहन करावा लागतो. या परिस्थितीला अधिकारीही काही प्रमाणात जबाबदार आहेतच. त्यात्यावेळी एखाद्या अनधिकृत प्रकार किंवा गैरकृत्याचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे असते. पण, तसे न करता वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्यामुळे अनेकदा प्रकरण गंभीर होत जाते. त्यामुळे अशा पद्धतीने जीवघेण्या हल्ल्याच्या घटना घडतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कोणावरही जीवघेणा हल्ला करणे आणि त्याचा सुगावा लागू नये, यासाठी दहशत निर्माण करून पळ काढणे, यावरून गुंडागर्दीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहे, हेदेखील स्पष्ट आहे. याचा विचार महापालिकेच्या आयुक्तांसह येथील सत्ताधारी पक्षश्रेष्ठींनीही करण्याची गरज आहे. विकास केवळ कागदावरच नको, तर तो प्रत्यक्षात दिसणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत चालला आहे.पोलीस यंत्रणेने या गंभीर घटनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक ठिकाणी सीसी कॅमेरे लावणे अत्यावश्यक आहे. वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणे, चौकी, बीटमार्शलचे काम प्रभावी करून खाकी वर्दीचा धाक निर्माण करण्याची गरज आहे. येथील अधिकारी, कर्मचारी कार्यरत असतात; पण तरीही भरवस्तीमधील अशा प्रकारच्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती धोक्यात नव्हे, तर धाब्यावर बसवली जात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी यंत्रणेनेही अंतर्मुख होऊन अशा घटना घडू नयेत आणि नागरिकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी प्रयत्न करण्याची जास्त आवश्यकता आहे.सुदैवाने सुभाष पाटील हे या हल्ल्यातून सुखरूप बचावले; मात्र अशा कृत्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधितांना चांगला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कोणत्याही प्रकारे हे प्रकरण दाबले गेले, तर लोकशाहीचा गळा घोटला जाणार असून शहराला मिळालेली सांस्कृतिक उपराजधानीची उपाधी लोप पावेल आणि पुन्हा एकदा या ठिकाणी गुंडाराज फोफावेल, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत. डोंबिवलीसारख्या शहरात सायंकाळच्यावेळेत गजबजलेल्या पुलावर अशी घटना घडणे म्हणजे निश्चितच चिंता करणारे आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर दिवसाढवळ्या पूर्वेकडील स्कायवॉकवर २२ मार्च रोजी जीवघेणा हल्ला झाला. ऐन लोकसभा निवडणुकीत हा प्रकार झाल्याने आणि वरिष्ठांकडून दबाव आल्याने रामनगर पोलिसांनी कसाबसा तपास करून आठ दिवसांत हल्लेखोरांना माणगाव, महाड येथून अटक केली. आरोपींनी चौकशीदरम्यान तोंड न उघडल्याने या हल्ल्याचे ठोस कारणच अद्याप समजू शकलेले नाही. दुसरीकडे या हल्ल्याला राजकीय किनार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी