शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

वंचित आघाडीच्या सभेतील गर्दी युतीचा रक्तदाब वाढविणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 01:00 IST

सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युतीच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता

- प्रशांत मानेकल्याण : पश्चिमेकडील एपीएमसी मार्केटच्या मैदानावर रविवारी पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कल्याण डोंबिवली, मुंब्रा, उल्हासनगर, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिक या सभेसाठी आले होते. पोलिसांच्या अंदाजानुसार हा आकडा १0 ते १५ हजारांच्या आसपास होता. ठाण्याशिवाय बाहेरून आलेल्या नागरीकांनीही या सभेला मोठी गर्दी केली होती. कल्याण डोंबिवली हा युतीचा बालेकिल्ला असताना बहुजन आघाडीच्या सभेला झालेली गर्दी पाहता राजकीय पंडितांच्या मते, ही भाजपासाठी धोक्याची घंटाच आहे.रविवारच्या बहुजन आघाडीच्या सभेला भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी, आमदार वारीस पठाण यांनी उपस्थिती लावली होती. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर या सभेमध्ये बहुजन आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषपूर्ण वातावरण होते. सभेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे येथील शिवसेना, भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. कल्याण पश्चिम मतदारसंघात भाजपाचा आमदार असून, भिवंडी लोकसभेत मोडणाºया या भागाचा खासदारही भाजपाचाच आहे. पश्चिमेतील केडीएमसीचे नगरसेवक सेनेचे आहेत. असदुद्दीन यांची कल्याणमधील पहिली सभा होती. त्यांचे भाषण कडवट असते. त्यामुळे सभेत ते कोणाला लक्ष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. सभेची वेळ दुपारी दोनची होती. त्यामुळे एक वाजतापासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांनी गर्दी करायला सुरु वात केली होती. ही गर्दी पाहता चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. कल्याण डोंबिवलीसह भिवंडीतूनही पोलीस बंदोबस्तासाठी होते. पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे हेदेखील जातीने होते. प्रमुख वक्त्यांचे चार वाजण्याच्या आसपास आगमन झाले. सभा तब्बल चार ते पाच तास चालली. तरीही एकही कार्यकर्ता जागचा हलला नाही. गर्दीचे नियोजन करताना आयोजकांची तारांबळ उडाली होती.कार्यकर्त्यांनी मोठा परिसर व्यापल्याने पत्रकारांनाही बसण्यासाठी जागा नव्हती. अखेर त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव मज्जाव असलेल्या सभेसमोरील क्षेत्रात बसविण्याची वेळ आयोजकांवर आली. ओवेसी यांनी भाषणाच्यावेळी परिधान केलेली कोळी बांधवांची टोपी लक्षवेधी ठरली. दरम्यान, ओवेसी आण िआंबेडकरांच्या तडाखेबाज आणि रोखठोक भाषणाने कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरल्याचे पहावयास मिळाले. कल्याण पश्चिममधील सभेला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे सत्ताधाºयांच्या भुवया उंचावल्या आहेत.बहुजन आघाडीचा धोका नेमका कुणाला?वंचित बहुजन आघाडीची सभा सेनेच्या बालेकिल्ल्यात पार पडल्याने हा भाजपा-सेनेसाठी धोका असल्याचे मानले जात असले तरी, काही जाणकारांच्या मते यामध्ये जास्त नुकसान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे होण्याची शक्यता आहे.वंचित आघाडीकडे दलित तथा मुस्लिम मतदान आकर्षित होण्याची शक्यता आहे. हा मतदार वर्ग बरेचदा काँग्रेसलाही झुकते माप देतो. याशिवाय केवळ सभेला गर्दी जमवून काही साध्य होत नाही. ती मतांमध्ये परावर्तीत करणे सर्वांना जमत नाही, असे जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन