शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

सुसंस्कृत ठाण्यात गुन्हेगार माेकाट; विकृतीला माेकळे रान

By जितेंद्र कालेकर | Updated: July 24, 2025 13:26 IST

भरदिवसा पाच विद्यार्थिनींचा विनयभंग; पीडितेच्या घरासमोर जल्लोष

जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात भरदिवसा एक विकृत तरुण रस्त्यावरून जाणाऱ्या चार ते पाच विद्यार्थिनींसोबत खुलेआम अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग करतो, उल्हासनगरमध्ये विनयभंगातील आरोपीने जामिनावर सुटल्यानंतर पीडितेच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष केला. अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार, विनयभंगाच्या तर रोज केस दाखल होत आहेत. कायद्याची जरब संपली आहे. पोलिसांचे भय उरलेले नाही. समाजातील विकृती पराकोटीची वाढली असून, सुसंस्कृत वगैरे टेंभा मिरवणाऱ्या ठाणे जिल्ह्यात कायद्याचे राज्य उरलेले नसून विकृतीला माेकळे रान मिळत आहे.  सावरकरनगर, लोकमान्यनगर भागांतून जाणाऱ्या पाच मुलींचा विनयभंग करणाऱ्या शंकर सोनी (३२) याला गुन्हे अन्वेषण विभाग आणि वर्तकनगर पोलिसांनी  अटक केली. त्याच्याविरुद्ध सात वर्षांपूर्वीही कळवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. छेडछाड करण्यात सराईत असलेला हा आरोपी बिनधास्त फिरत होता व तोच गुन्हा पुन:पुन्हा करत होता. अनेक हद्दपार गुंड पोलिसांचे भय न बाळगता जिल्ह्यातील बंदी केलेल्या परिसरात फिरताना पकडले जातात. कदाचित जेलमध्ये दोन वेळा बसून खायला मिळत असेल. शिवाय मोबाइलपासून गांजापर्यंत सर्व खातीरदारी होत असल्याने गुन्हेगारांना तेच तेच गुन्हे पुन्हा करून जेलमध्ये जाण्यात भय वाटत नसावे. पोलिस व्हॅनमध्ये केक कापलाउल्हासनगरातील रोशन झा या गुंडाला दोन वर्षांपूर्वी आधारवाडी तुरुंगातून कल्याण न्यायालयात सुनावणीला आणले असता त्याने पोलिस व्हॅनमध्ये केक कापला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दोन पोलिस निलंबित झाले. पोलिस कोठडी असो की जेल; तेथे प्रत्येक गोष्ट कैद्याला पुरवण्याकरिता पैसे घेतले जातात हे उघड गुपित आहे. कुख्यात गुंड वैद्यकीय तपासणी किंवा कोर्टाची तारीख या निमित्ताने खासगी फ्लॅटवर जाऊन बायको किंवा मैत्रिणींसोबत मौजमजा करताना सापडल्याचे प्रकार उघड झाले होते. याच फ्लॅटवर खंडणी वसुलीच्या, मांडवलीच्या भेटीगाठी होतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पोलिसांची विश्वासार्हता पूर्णत: लयाला गेली आहे.

उल्हासनगरात कहरतडीपार असूनही अंशू झा उल्हासनगरात २७ एप्रिल २०२५ रोजी दारू पित होता. यातून झालेल्या वादात एक कुटुंब त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. त्यावेळी त्याचा भाऊ रोहित याने संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन एका मुलीचा विनयभंग केला. परिसरातील काही लोकांनी मध्यस्थी करीत त्याला चोप दिला. या प्रकरणी अंशू आणि त्याचा भाऊ रोहित यांना पाेलिसांनी अटक केली. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्याने तक्रारदार कुटुंबातील एकाला अटक झाली. १७ जुलैला  रोहितची जामिनावर सुटका झाल्यावर त्याच्या सहकाऱ्यांनी रॅली काढून पीडितेच्या घरासमोर आतषबाजी करून ढोलताशे वाजविले.  त्याआधी पीडितेच्या भावानेही त्याची सुटका झाल्याने जल्लोष केला. बिहार, झारखंडमध्ये गुंडांनी दहशत वाढविण्याकरिता सुटकेनंतर ‘शोभायात्रा’ काढाव्यात, तसे प्रकार उल्हासनगरात घडतात आणि पोलिसांना त्याची गंधवार्ता लागत नाही, हे संतापजनक आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे