शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरक्षित भूखंडांच्या वापरासाठी काय पावले उचलली? चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:29 IST

ठाणे पालिका आयुक्तांना न्यायालयाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाणे जिल्ह्याची गरज विचारात घेऊन १९९० च्या काळात स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडांची सध्याची स्थिती काय आहे? आरक्षित भूखंडाचा वापर त्याच कारणासाठी व्हावा यासाठी काय पावले उचलली? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने ठाणे महापालिका आयुक्तांना चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

ठाण्यातील भाइंदर पाडा येथील संयुक्त स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या ३७,००० चौरस मीटर जागेवर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप कंपनीचे बांधकाम सुरू असल्याचा दावा जनहित याचिकेद्वारे करण्यात आला होता. मात्र, आता संबंधित बांधकाम प्रकल्प मेसर्स बालाजी एन्टरप्राइजेसला दिल्याने उच्च न्यायालयाने विहंग ग्रुपला याचिकेतून प्रतिवादी म्हणून हटविण्यास याचिकादाराला परवानगी दिली.

भाइंदर पाडा येथे दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण केल्याचा दावा याचिकादार मेलविन फर्नांडिस यांनी केला होता. मात्र, पालिकेने हा दावा फेटाळला. त्यानंतर याचिकादाराने बालाजी एन्टप्राइजेस या जागेवर पार्किंग व बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी वापर करत असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने त्याची दखल घेत पालिकेला या जागेवरील अनधिकृत बांधकाम साहित्य  हटवून संबंधित जागेच्या चारी बाजूने कुंपण घालण्याचे निर्देश दिले, तसेच या जागेचा वापर अन्य कोणत्याही उद्देशासाठी करू नये, असेही बजावले.

पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीला

  • मुंबईत व ठाण्याची लोकसंख्या पाहता  येथे दफनभूमी आणि स्मशानभूमीसाठी जागा अपुरी असल्याचे मत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. त्यावर पालिकेचे वकील मंदार लिमये यांनी ठाण्यात स्मशानभूमी आणि दफनभूमीसाठी पुरेशा जागा असल्याची माहिती न्यायालयाला दिली.
  • १९९० च्या दरम्यानचा विकास आराखडा पाहत शहराची व्याप्ती विचारात घेऊन काही जागा दफनभूमी आणि स्मशानभूमीसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या. आता या जागांवर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. काही जागा सीआरझेड एकमध्ये येतात, तर एका जागेवर ठाणे ग्रामीण पोलिस मंडळाच्या ताब्यात आहे.  
  • या सर्व जागांची सद्य:स्थिती काय आहे  आणि ज्या उद्देशासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या त्यासाठी जागेचा वापर करण्याकरिता काय पावले उचलली? यासंबंधी पालिका आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश देत न्यायालयाने याचिकेवरील पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी ठेवली.
टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट