शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

पाणीवितरण रिमॉडेलिंगचा खर्च ६९ कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:20 IST

दिव्याचाही केला समावेश : बांधणार नवे १० जलकुंभ, मुंब्य्राची पाणीटंचाई होणार दूर

ठाणे : ठाणे महापालिकेने घोडबंदरच्या रिमॉडेलिंगच्या धर्तीवर मुंब्य्राचीही तहान भागवण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव येत्या महासभेत ठेवला आहे. यामुळे येत्या काळात मुंब्य्राची तहान भागवली जाणार आहे. हे काम महापालिका स्वत: करणार असून यासाठी लागणाऱ्या खर्चात दिव्याचाही समावेश केल्याने ६९ कोटींनी वाढ झाली आहे.

ठाणे महापालिकेने मुंब्य्रातील पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. त्यानुसार, २०१०-११ मध्ये यासाठी ९७.४१ कोटींचा खर्च अपेक्षित होता. केंद्राच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत हे काम करण्याचे निश्चित केले होते. परंतु, त्यासाठी निधी उपलब्ध नझाल्याने ही योजना बंद झाली. त्यामुळे ती कशी राबवायची, असा पेच पालिकेपुढे पडला होता. त्यानंतर, केंद्राच्या अमृत योजनेतून ते करण्याचा पालिकेने विचार केला होता. परंतु, अमृत योजनेतूनदेखील या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने अखेर तिचा खर्च स्वत: करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

सध्या मुंब्य्राची लोकसंख्या वाढली असून येथे असलेले जलकुंभ हे २०११ पर्यंत पाणीपुरवठा होईल एवढेच होते. परंतु, आता त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार, आता एकूणच तेथील पाणीवितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी १२६ कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, तीत दिव्याचाही समावेश केल्यामुळे तो १९६ कोटींच्या घरात गेला आहे. यात मुंब्रा व दिवा विभागांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन हे पायाभूत वर्ष २०१८ धरून पुढील ३० वर्षांसाठी वहनव्यवस्था व वितरणव्यवस्था गृहीत धरण्यात येणार आहे.

जलकुंभ संप व पंपहाउस १५ वर्षे कालावधीसाठी संकल्पित करण्यात येतील. या योजनेसाठी महापालिकेची स्वत:ची योजना व एमआयडीसीकडून पाणी उपलब्ध करून देणार आहे. मुंब्रा, दिवा विभागांसाठी मुख्य जलसंतुलन टाकी बांधण्याचा समावेश करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुंब्रा आणि दिव्यातील शेकडो इमारतीमधील रहिवाशांना दिलासा लाभणार आहे.नव्याने २०० मिमी ते एक हजार मिमी व्यासाच्या सुमारे १८ किमी लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. तसेच या कामासाठी सल्लागाराचीही नेमणूक केली जाणार आहे. या योजनेंतर्गत नव्याने १० जलकुंभ बांधले जाणार असून आदी कामांसह इतर कामांचा यात समावेश केला आहे. 2018-19 या वर्षात ३० कोटी, २०१९-२० मध्ये ९० कोटी आणि २०२०-२१ या कालावधीत ७६ कोटींचा खर्च केला जाणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया राबवून ही कामे केली जाणार आहेत. 

टॅग्स :WaterपाणीthaneठाणेCorruptionभ्रष्टाचार