शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

भुयारी गटार योजनेचा खर्च ४० कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:24 AM

प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी : भाजप नगरसेविकेचा विरोध

ठाणे : घोडबंदर परिसरात शहरीकरणाचा वेग जास्त असला तरी, या पट्ट्यात राबवण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाचा वेग मात्र मंदावलेलाच आहे. भुयारी गटार योजनेच्या टप्पा क्र मांक ४ अंतर्गत हे काम येत असून मार्च २०२० पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ ४५ टक्केच काम झाले असल्याचा दावा करून आता ते डिसेंबर २०२० किंवा मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे विलंबामुळे त्याचा खर्चही ४० कोटींनी वाढल्याने तसा प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.

केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत या भुयारी गटार योजनेचा तब्बल १७९.१ कोटींचा जम्बो आराखडा तयार केला आहे. पूर्वी जेएनएनयूआरएमअंतर्गत महापालिका क्षेत्रात भुयारी गटार योजना टप्पा १, २ व ३ अंतर्गत मलनि:सारण योजना राबविण्यात येत असून महापालिका हद्दीतील सुमारे ७१ टक्के भागांत ती कार्यान्वित करण्यात येत आहे.टप्पा क्र मांक ४ मध्ये मानपाडा, ब्रह्मांड, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, वाघबीळ, विजयनगरी, आनंदनगर, भार्इंदरपाडा, ओवळा, कासारवडवली, नागलाबंदर, गायमुख, पानखंडा, टकारडापाडा, सुकुरपाडा अशा परिसराचा समावेश आहे. यात नऊ लाख ७९ हजार ७११ एवढी लोकसंख्या गृहीत धरली आहे. या कामांतर्गत पंपहाउस बांधणे, एसटीपी प्लान्ट उभारणे, पाइपलाइन टाकण्यासह इतर कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्राकडून ५९. ६६९ कोटी, राज्य शासनाकडून २९.८ कोटी आणि महापालिकेकडून ८९.५०५ कोटी असा खर्च केला जाणार आहे.अधिकाऱ्यांची खेळी असल्याचा आरोपवाढीव खर्चाच्या मंजुरीला भाजपाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी मात्र विरोध दर्शवला आहे. अधिकारी पालिकेच्या निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे पत्राद्वारे माहिती मागवली होती. यामध्ये दिलेल्या मुदतीमध्ये काम केले नाही, तर संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करणार, असे विचारले होते. यावर प्रशासनाने वेळेत प्रकल्प पूर्ण नाही केला तर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाढीव खर्च देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट उत्तर दिले असल्याने या प्रकल्पावर आता संशय निर्माण झाला आहे.प्रकल्प आखताना या तांत्रिक गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आल्या नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित करून या वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला मणेरा यांनी आपला विरोध दर्शवून प्रशासनाच्या तांत्रिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने महासभेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे .