शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॉरिडॉर प्रकल्पग्रस्तांचा घरसोडतीवर बहिष्कार; विरोधानंतरही ५४० घरांची काढली सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:25 IST

दिल्ली-जेएनपीटी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात बाधित झालेल्या ८४० प्रकल्पग्रस्तांना केडीएमसीच्या बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कल्याण : दिल्ली-जेएनपीटी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात बाधित झालेल्या ८४० प्रकल्पग्रस्तांना केडीएमसीच्या बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ५४० घरांची सोडत बुधवारी घेण्यात आली. मात्र, कल्याणमधील कचोरे येथील प्रकल्पाऐवजी डोंबिवलीतील पाथर्ली येथे घरे द्या, अशी मागणी करून प्रकल्पग्रस्तांनी सोडतप्रक्रियेवर बहिष्कार घातला. त्यानंतरही सोडतप्रक्रिया पूर्ण केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प अर्थात मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने २००९ मध्ये जाहीर केले. या प्रकल्पामध्ये महापालिका हद्दीतून जाणाºया दिवा-वसई रेल्वेमार्गालगत असलेल्या डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली, गावदेवी, देवीचापाडा आदी भागांतील नागरिकांची घरे बाधित होत आहेत.

प्रकल्पबाधितांना घराच्या बदल्यात घर द्या, या मागणीसाठी गावदेवी संघर्ष समिती आणि सूर्या सेवा संस्था २०१० पासून लढा देत आहेत. या लढ्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन पालिकेच्या बीएसयूपीच्या घरांमध्ये करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार, महापालिकेने महासभेत ठराव करण्यास दिरंगाई केली.

दरम्यान, राज्य सरकारने बीएसयूपी प्रकल्पातील ८४० घरे प्रकल्पबाधितांना देण्याचा अध्यादेश काढला. तसे आदेश महापालिकेला दिले आहेत. ८४० घरांची किंमत रेल्वेकडून महापालिकेला दिली जाणार आहे. त्यातील ५४० घरांची सोडत कल्याण आदर्श रेल्वे कॉलनीतील सभागृहात बुधवारी काढण्यात आली.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सोडतप्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच गावदेवी संघर्ष समिती आणि सूर्या सेवा संस्थेच्या वतीने रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनानुसार प्रकल्पबाधितांनी मागणी केली की, त्यांना कचोरे येथील प्रकल्पात घर नको. त्यांना डोंबिवली, पाथर्ली येथील प्रकल्पांत घरे हवी आहेत. अधिकाºयांनी निवेदन स्वीकारले; मात्र घरांच्या सोडतीची प्रक्रिया सुरूच ठेवली.

प्रकल्पग्रस्तांना मनसेचा पाठिंबा

प्रकल्पबाधितांचा विरोध लक्षात न घेतल्याने प्रकल्पबाधितांनी सोडतप्रक्रियेवर बहिष्कार घातला. प्रकल्पबाधित सभागृहातून बाहेर पडले, तरी सोडतप्रक्रिया सुरूच होती, असे बहिष्कार घालणाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पबाधितांसोबत मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईरही उपस्थित होते. प्रकल्पबाधितांची मागणी रास्त आहे. त्यांच्या पाठीशी मनसे आहे, असे स्पष्ट केले. या बहिष्कारानंतर जिल्हा प्रशासन आणि रेल्वे काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारthaneठाणेkalyanकल्याणMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र