शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

कॉरिडॉर प्रकल्पग्रस्तांचा घरसोडतीवर बहिष्कार; विरोधानंतरही ५४० घरांची काढली सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 01:25 IST

दिल्ली-जेएनपीटी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात बाधित झालेल्या ८४० प्रकल्पग्रस्तांना केडीएमसीच्या बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कल्याण : दिल्ली-जेएनपीटी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पात बाधित झालेल्या ८४० प्रकल्पग्रस्तांना केडीएमसीच्या बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ५४० घरांची सोडत बुधवारी घेण्यात आली. मात्र, कल्याणमधील कचोरे येथील प्रकल्पाऐवजी डोंबिवलीतील पाथर्ली येथे घरे द्या, अशी मागणी करून प्रकल्पग्रस्तांनी सोडतप्रक्रियेवर बहिष्कार घातला. त्यानंतरही सोडतप्रक्रिया पूर्ण केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प अर्थात मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने २००९ मध्ये जाहीर केले. या प्रकल्पामध्ये महापालिका हद्दीतून जाणाºया दिवा-वसई रेल्वेमार्गालगत असलेल्या डोंबिवलीतील मोठागाव ठाकुर्ली, गावदेवी, देवीचापाडा आदी भागांतील नागरिकांची घरे बाधित होत आहेत.

प्रकल्पबाधितांना घराच्या बदल्यात घर द्या, या मागणीसाठी गावदेवी संघर्ष समिती आणि सूर्या सेवा संस्था २०१० पासून लढा देत आहेत. या लढ्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन पालिकेच्या बीएसयूपीच्या घरांमध्ये करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार, महापालिकेने महासभेत ठराव करण्यास दिरंगाई केली.

दरम्यान, राज्य सरकारने बीएसयूपी प्रकल्पातील ८४० घरे प्रकल्पबाधितांना देण्याचा अध्यादेश काढला. तसे आदेश महापालिकेला दिले आहेत. ८४० घरांची किंमत रेल्वेकडून महापालिकेला दिली जाणार आहे. त्यातील ५४० घरांची सोडत कल्याण आदर्श रेल्वे कॉलनीतील सभागृहात बुधवारी काढण्यात आली.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सोडतप्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच गावदेवी संघर्ष समिती आणि सूर्या सेवा संस्थेच्या वतीने रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनानुसार प्रकल्पबाधितांनी मागणी केली की, त्यांना कचोरे येथील प्रकल्पात घर नको. त्यांना डोंबिवली, पाथर्ली येथील प्रकल्पांत घरे हवी आहेत. अधिकाºयांनी निवेदन स्वीकारले; मात्र घरांच्या सोडतीची प्रक्रिया सुरूच ठेवली.

प्रकल्पग्रस्तांना मनसेचा पाठिंबा

प्रकल्पबाधितांचा विरोध लक्षात न घेतल्याने प्रकल्पबाधितांनी सोडतप्रक्रियेवर बहिष्कार घातला. प्रकल्पबाधित सभागृहातून बाहेर पडले, तरी सोडतप्रक्रिया सुरूच होती, असे बहिष्कार घालणाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पबाधितांसोबत मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईरही उपस्थित होते. प्रकल्पबाधितांची मागणी रास्त आहे. त्यांच्या पाठीशी मनसे आहे, असे स्पष्ट केले. या बहिष्कारानंतर जिल्हा प्रशासन आणि रेल्वे काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारthaneठाणेkalyanकल्याणMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र