शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

Coronavirus : भाईंदरमधील रविवार बाजार कोरोनाच्या सावटातही गजबजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 00:17 IST

वाहतुकीला अडथळा ठरणारा हा बाजार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही बंद न ठेवल्याने महापालिका आणि नगरसेवकांचा वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे.

मीरा रोड - कोरोनाचा संसर्ग फैलावू नये, म्हणून एकीकडे गर्दीची ठिकाणे बंद केली जात असताना भाईंदर पश्चिमेतील रविवारचा आठवडा बाजार गजबजला होता. सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिलेले आदेश डावलून भरलेल्या बाजाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारा हा बाजार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही बंद न ठेवल्याने महापालिका आणि नगरसेवकांचा वरदहस्त पुन्हा उघड झाला आहे.नव्याने आलेले प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी महिनाभरापासून कारवाईच गुंडाळून टाकली आहे. पोलीसही दुर्लक्ष करत असल्यामुळे या बाजारावर कोरोनाचाही परिणाम झालेला नाही. गावाचे शहर झाले तरी बाजारवसुली करणाऱ्या ठेकेदारांना आणि त्यात हितसंबंध गुंतलेल्यांनेच हा बाजार रविवारी भरला.भाईंदर रेल्वेस्थानकापासून भाईंदर शहरच नव्हे तर मुर्धापासून थेट उत्तन-चौक व गोराईपर्यंत जाणारा एकमेव मुख्य मार्ग आहे. हा वाहतुकीसाठीचा एकमेव मार्ग असताना रविवार बाजारच्या आड फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांची संख्या आठवड्यागणिक वाढलीआहे.आधीच बेकायदा पार्किंग, दुकान आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे येथे वाहतूककोंडी नित्याची झालेली आहे. त्यातच रविवार बाजारामुळे भाईंदर पोलीस ठाण्यापासून शिवसेना गल्ली नाकयापर्यंतचा मुख्य रस्ता, दुसरीकडे नगरभवनपर्यंत आणि महापालिका मुख्यालयामागची गल्ली बेकायदा फेरीवाल्यांमुळे व्यापली आहे.पालिकेचे बसस्थानकही यांनी बळकावले आहे. शहराचा मुख्य मार्ग असल्याने एसटी, एमबीएमटी, बेस्ट या सार्वजनिक उपक्रमांच्या बस, रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते.अतिक्रमणामुळे प्रचंड वाहतूककोंडी होऊन लोक अडकून पडतात. आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहनही येथून नेणे अशक्य बनले आहे. त्यातच भुरटे चोर, पाकीटमारांसह महिला-मुलींची छेड काढण्याचे प्रकार नेहमीचेच झालेले आहेत. रविवारचा बाजार सायंकाळपर्यंत बस्तान मांडून बसत आहे.बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर तसेच फेरीवाल्यांनी टाकलेला कचरा याचा उपद्रव लोकांना सहन करावा लागत आहे. डिसेंबर २०१५ च्या महासभेमध्ये भाजी आणि सुकी मासळीविक्रेत्या स्थानिकांना वगळून अन्य बाजार सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ हलवण्याचा ठराव केला होता.तोही बासनात गुंडाळला आहे. फेरीवाल्यांशी तसेच बाजारवसुली ठेकेदाराचे नगरसेवक, राजकारणी आणि महापालिकेशी अर्थपूर्ण लागेबांधे असल्याशिवाय पालिका संरक्षण देणे शक्य नसल्याचे आरोप नागरिक करत आहेत.रविवार बाजारासंबंधी आयुक्तांशी चर्चा केली आहे. या बाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने रविवार बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांनी तसे आदेश उपायुक्तांना दिले आहेत.- डॉ. शशिकांत भोसले, पोलीस उपअधीक्षक, भाईंदरकोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आणि रहदारी-वाहतुकीला होणारा अडथळा विचारात घेता पालिका रविवार बाजारावर कारवाई करण्यात येणार आहे.-चंद्रकांत डांगे, आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाMira Bhayanderमीरा-भाईंदर