शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ह्यांना कुणीतरी समजवा रे... मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांची पोलिसांकडून 'आरती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 09:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील १४ मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढवून ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे. राज्यात सोमवारी ४६६ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आता रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी नऊ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात सात मुंबईतील व दोन मालेगावमधील आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा २३२ वर पोहोचला आहे. तर मुंबईतही सोमवारी १८७ रुग्णांचे निदान झाले. मुंबईची संख्या ३ हजार ३२ वर पोहोचली आहे. तर मुंबईत बळींचा आकडा १३९ झाला. पुण्यात ५९ नव्या रूग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या ७५६ वर पोहोचली आहे. मात्र, अद्यापही लोकांना या परिस्थितीचे गांभीर्य दिसून येत नाही. लोकं विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाला घरात आमंत्रण देत असल्याचं दिसून येतयं. या नागरिकांसमोर आता महाराष्ट्र पोलीसही हतबल झाल्याचं दिसून येतंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील १४ मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढवून ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला होता. कारण, देशातील कोरानाबाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल आहे. त्यामुळे लोकांना घरााबाहेर न पडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसेच, विविध समाज प्रबोधनातून पोलीस बांधवही नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. पोलिसांकडून ज्याप्रमाणे लाठी-काठीचा प्रसाद दिला जातो, तसाचं प्रेमळ सल्लाही दिला जातो. मात्र, नागरिकांना गांभीर्य लक्षातच येत नाही. त्यामुळे, आज पोलिसांनी चक्क आरती करुन नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केलंय. ठाण्यातील काही नागरिक आज सकाळीच मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडल्याचं पोलिसांना दिसून आलं. विशेष म्हणजे हे सर्व नागरिक सुशिक्षित असूनही ते शासकीय नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी चक्क आरती ओवाळून या नागरिकांपुढे आता पोलीसही हतबल झाल्याचेच सूचवले आहे. 

दरम्यान, सोमवारी राज्यात झालेल्या मृत्यूंपैकी सहा पुरुष तर तीन महिला आहेत. या मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील पाच रुग्ण आहेत. तर एक रुग्ण ४० ते ६० वयोगटातील व एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखींपैकी दोन रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. उर्वरित सात जणांपैकी पाच रुग्णांमध्ये ७१ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार होते.

७१,६११ जणांचे नमुने निगेटिव्हआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सोमवारी ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आजपर्यंत राज्यातील ५७२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक घरगुती अलगीकरणात असून ६ हजार ८७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस