शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

Coronavirus : ह्यांना कुणीतरी समजवा रे... मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांची पोलिसांकडून 'आरती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 09:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील १४ मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढवून ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे. राज्यात सोमवारी ४६६ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आता रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी नऊ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात सात मुंबईतील व दोन मालेगावमधील आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा २३२ वर पोहोचला आहे. तर मुंबईतही सोमवारी १८७ रुग्णांचे निदान झाले. मुंबईची संख्या ३ हजार ३२ वर पोहोचली आहे. तर मुंबईत बळींचा आकडा १३९ झाला. पुण्यात ५९ नव्या रूग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या ७५६ वर पोहोचली आहे. मात्र, अद्यापही लोकांना या परिस्थितीचे गांभीर्य दिसून येत नाही. लोकं विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाला घरात आमंत्रण देत असल्याचं दिसून येतयं. या नागरिकांसमोर आता महाराष्ट्र पोलीसही हतबल झाल्याचं दिसून येतंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील १४ मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढवून ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला होता. कारण, देशातील कोरानाबाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल आहे. त्यामुळे लोकांना घरााबाहेर न पडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसेच, विविध समाज प्रबोधनातून पोलीस बांधवही नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. पोलिसांकडून ज्याप्रमाणे लाठी-काठीचा प्रसाद दिला जातो, तसाचं प्रेमळ सल्लाही दिला जातो. मात्र, नागरिकांना गांभीर्य लक्षातच येत नाही. त्यामुळे, आज पोलिसांनी चक्क आरती करुन नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केलंय. ठाण्यातील काही नागरिक आज सकाळीच मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडल्याचं पोलिसांना दिसून आलं. विशेष म्हणजे हे सर्व नागरिक सुशिक्षित असूनही ते शासकीय नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी चक्क आरती ओवाळून या नागरिकांपुढे आता पोलीसही हतबल झाल्याचेच सूचवले आहे. 

दरम्यान, सोमवारी राज्यात झालेल्या मृत्यूंपैकी सहा पुरुष तर तीन महिला आहेत. या मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील पाच रुग्ण आहेत. तर एक रुग्ण ४० ते ६० वयोगटातील व एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखींपैकी दोन रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. उर्वरित सात जणांपैकी पाच रुग्णांमध्ये ७१ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार होते.

७१,६११ जणांचे नमुने निगेटिव्हआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सोमवारी ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आजपर्यंत राज्यातील ५७२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक घरगुती अलगीकरणात असून ६ हजार ८७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस