शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

coronavirus: जनता शोकमग्न, नेते चिखलफेकीत मग्न, कोरोनावरून ठाण्यात शिवसेना राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 01:32 IST

जनता अक्षरश: शोकमग्न आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील व राज्यातील सत्ताधारी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भाजप हे पक्ष परस्परांवर आरोपप्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात मग्न आहेत.

ठाणे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याने दोन कुटुंबांवर न भुतो न भविष्यती असा दु:खाचा प्रसंग ओढवला. ठाणे शहरच नव्हे तर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त व त्यांचे कुटुंबीय अपुरी आरोग्यव्यवस्था, औषधांचा काळाबाजार, खासगी रुग्णालयांची लूट यामुळे बेजार आहेत. इतक्या संकटांचा मुकाबला केल्यावरही आपली जीवाभावाची व्यक्ती सुखरूप घरी परतेल, याची खात्री नाही. परिणामी, जनता अक्षरश: शोकमग्न आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील व राज्यातील सत्ताधारी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भाजप हे पक्ष परस्परांवर आरोपप्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात मग्न आहेत.पालकमंत्री शांत बसल्याने कोरोनाग्रस्तांचे हाल - आनंद परांजपेठाणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचे प्रचंड हाल होत आहेत. मृतदेह बदलण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला ठामपा प्रशासनच जबाबदार आहे. पालकमंत्रीही थेट रस्त्यावर न उतरता प्रशासनावर विश्वास ठेवून शांत बसले आहेत. त्याचा त्रास नाहक ठाणेकरांना होत आहे, असा आरोप बुधवारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यास होणारी टाळाटाळ, मृतदेहांची अदलाबदल, ग्लोबल हब कोविड सेंटरमधील अनागोंदी या सर्व प्रकारांवर त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या शहरात प्रशासनाची एकाधिकारशाही सुरू आहे. कोविड सेंटरमधील डॉक्टरांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. गोरगरिबांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. ठामपाने रुग्णालयातील बिलांसाठी आॅडिटर नेमण्याची घोषणा केली असली, तरी डिपॉझिट घेतल्याशिवाय रुग्णांना घेतले जात नाही. लाखोंची बिले दिली जात आहेत. महापालिकेने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. परिणामी, महापालिकेचे पत्र नसल्याचे कारण सांगून अनेक रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेत नाहीत, असे ते म्हणाले.‘अधिकारी पालकमंत्र्यांना गंडवत आहेत’पालकमंत्र्यांनाही हे प्रशासन चुकीची माहिती देत आहे. एकंदर, पालकमंत्र्यांना गंडवण्याचा प्रयत्न अधिकाºयांकडून सुरू असून त्यामुळे सरकारला नाहक बदनामी सहन करावी लागत आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम केले, तरच या शहरातील ही महामारी व अधिकाºयांची मुजोरी संपुष्टात येईल, असेही परांजपे म्हणाले.‘परांजपे घरात दडी मारून बसलेत’ठाणे : पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे म्हणणारे स्वत: कोरोना झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घरात दडी मारून बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर प्रसंगी पीपीई किट घालून कोविड रुग्णालयांमध्ये जाऊन चौकशी करत असल्याचे त्यांना माहीत नाही. जे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणवणाºया व्यक्तीच्या गावीही नसावे, हे दुर्दैवी असल्याची टीका म्हस्के यांनी बुधवारी आनंद परांजपे यांच्यावर केली. परांजपे यांनी प्रशासन पालकमंत्र्यांची फसवणूक करत असून त्यांनीच रस्त्यावर उतरावे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला.सेनेने राष्ट्रवादीचा ‘घरचा आहेर’ स्वीकारावा : भाजपची टीकाठाणे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बेड मिळत नाही, औषधांचा काळाबाजार, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार म्हणजे राज्य सरकार व महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मिळालेला 'घरचा आहेर' आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार व सत्ताधारी शिवसेना व प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचा भाजपचा आरोप १०० टक्के खरा होत आहे, असे मत भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले. गैरव्यवस्था, खाजगी हॉस्पिटलांची लूटमार याकडे भाजपने लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ठाणे शहर धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेली वस्तुस्थिती तरी समजून शिवसेना व प्रशासनाने कामाला लागावे. अन्यथा, जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस