शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

coronavirus: जनता शोकमग्न, नेते चिखलफेकीत मग्न, कोरोनावरून ठाण्यात शिवसेना राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 01:32 IST

जनता अक्षरश: शोकमग्न आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील व राज्यातील सत्ताधारी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भाजप हे पक्ष परस्परांवर आरोपप्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात मग्न आहेत.

ठाणे महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याने दोन कुटुंबांवर न भुतो न भविष्यती असा दु:खाचा प्रसंग ओढवला. ठाणे शहरच नव्हे तर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त व त्यांचे कुटुंबीय अपुरी आरोग्यव्यवस्था, औषधांचा काळाबाजार, खासगी रुग्णालयांची लूट यामुळे बेजार आहेत. इतक्या संकटांचा मुकाबला केल्यावरही आपली जीवाभावाची व्यक्ती सुखरूप घरी परतेल, याची खात्री नाही. परिणामी, जनता अक्षरश: शोकमग्न आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील व राज्यातील सत्ताधारी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भाजप हे पक्ष परस्परांवर आरोपप्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात मग्न आहेत.पालकमंत्री शांत बसल्याने कोरोनाग्रस्तांचे हाल - आनंद परांजपेठाणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचे प्रचंड हाल होत आहेत. मृतदेह बदलण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला ठामपा प्रशासनच जबाबदार आहे. पालकमंत्रीही थेट रस्त्यावर न उतरता प्रशासनावर विश्वास ठेवून शांत बसले आहेत. त्याचा त्रास नाहक ठाणेकरांना होत आहे, असा आरोप बुधवारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यास होणारी टाळाटाळ, मृतदेहांची अदलाबदल, ग्लोबल हब कोविड सेंटरमधील अनागोंदी या सर्व प्रकारांवर त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या शहरात प्रशासनाची एकाधिकारशाही सुरू आहे. कोविड सेंटरमधील डॉक्टरांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. गोरगरिबांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. ठामपाने रुग्णालयातील बिलांसाठी आॅडिटर नेमण्याची घोषणा केली असली, तरी डिपॉझिट घेतल्याशिवाय रुग्णांना घेतले जात नाही. लाखोंची बिले दिली जात आहेत. महापालिकेने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. परिणामी, महापालिकेचे पत्र नसल्याचे कारण सांगून अनेक रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेत नाहीत, असे ते म्हणाले.‘अधिकारी पालकमंत्र्यांना गंडवत आहेत’पालकमंत्र्यांनाही हे प्रशासन चुकीची माहिती देत आहे. एकंदर, पालकमंत्र्यांना गंडवण्याचा प्रयत्न अधिकाºयांकडून सुरू असून त्यामुळे सरकारला नाहक बदनामी सहन करावी लागत आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम केले, तरच या शहरातील ही महामारी व अधिकाºयांची मुजोरी संपुष्टात येईल, असेही परांजपे म्हणाले.‘परांजपे घरात दडी मारून बसलेत’ठाणे : पालकमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे म्हणणारे स्वत: कोरोना झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घरात दडी मारून बसले आहेत. त्यामुळे पालकमंत्री केवळ रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर प्रसंगी पीपीई किट घालून कोविड रुग्णालयांमध्ये जाऊन चौकशी करत असल्याचे त्यांना माहीत नाही. जे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणवणाºया व्यक्तीच्या गावीही नसावे, हे दुर्दैवी असल्याची टीका म्हस्के यांनी बुधवारी आनंद परांजपे यांच्यावर केली. परांजपे यांनी प्रशासन पालकमंत्र्यांची फसवणूक करत असून त्यांनीच रस्त्यावर उतरावे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला.सेनेने राष्ट्रवादीचा ‘घरचा आहेर’ स्वीकारावा : भाजपची टीकाठाणे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बेड मिळत नाही, औषधांचा काळाबाजार, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार म्हणजे राज्य सरकार व महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मिळालेला 'घरचा आहेर' आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार व सत्ताधारी शिवसेना व प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचा भाजपचा आरोप १०० टक्के खरा होत आहे, असे मत भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केले. गैरव्यवस्था, खाजगी हॉस्पिटलांची लूटमार याकडे भाजपने लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ठाणे शहर धोकादायक स्थितीत पोहोचले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेली वस्तुस्थिती तरी समजून शिवसेना व प्रशासनाने कामाला लागावे. अन्यथा, जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस