शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

Coronavirus: रिक्षाचालक बनला देवदूत; रुग्णांना अहोरात्र मुंबईपर्यंत विनामूल्य सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 16:32 IST

आतापर्यंत त्यांनी १००हून अधिक रुग्णांना अत्यावश्यक सेवेपर्यंत विनामूल्य रिक्षा सेवा सुरू केली.  त्यामुळे एका अर्थाने रिक्षाचालक देवदूत बनून आल्याची भावना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

अनिकेत घमंडी,डोंबिवली: कोरोनामुळे राज्यात पंधरा दिवसांपासून लॉकडाऊन झालेले असतानाच अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणतीही सेवा सुरू नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेषत: डायलिसीस, कॅन्सर, तसेच ज्यांना सतत रक्त चढवावे लागते, अशा रुग्णांचे सर्वाधिक हाल होत असून त्यांची जास्त गैरसोय झाली आहे. ज्यांना नित्याने उपचारासाठी मुंबईत जावे लागते अशांना वाहनसेवाच नसल्याने आपुले मरण पाहिले म्या डोळा अशी त्यांची स्थिती झाली आहे. रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन म्हात्रेनगर परिसरातील रहिवासी असलेले रुपेश रेपाळ या ज्येष्ठ रिक्षा चालकाने विनामूल्य सेवा देण्याचा संकल्प सोडला. आणि आतापर्यंत त्यांनी १००हून अधिक रुग्णांना अत्यावश्यक सेवेपर्यंत विनामूल्य रिक्षा सेवा सुरू केली.  त्यामुळे एका अर्थाने रिक्षाचालक देवदूत बनून आल्याची भावना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.देशभरात संकट आलेले असतानाच आपल्याकडून मातृभूमीची सेवा कशी होईल या प्रश्नाने रेपाळ अस्वस्थ झाले होते. पण रस्त्यावर वाहनेच येऊ द्यायची नसल्याने मनात असूनही रिक्षा चालवता येत नसल्याने त्यांची अडचण झाली होती. मग एकदा आरटीओ अधिका-यांना भेटून तरी येऊ, असे मनाशी त्यांनी ठरवले आणि ते कल्याणला गेले. आरटीओ अधिका-यांनीही रेपाळ यांचा हेतू चांगला असून त्यांना ‘आपात्कालीन सुविधा’ असे विशेष परमिट देऊ केले. आणि त्यामुळे रेपाळ यांचा सेवा करण्याचा संकल्प सिद्धीस आला. आता विनामूल्य सेवा देतांना कोणाकडून काही मागायचे नसले तरीही रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रिक्षेत सीएनजी भरावेच लागणार होते.आधीच व्यवसाय नसल्याने घरात पैसा नाही, कुटुंबीय देखील त्यामुळे हैराण आहेत. पण तरीही ते संकल्पावर ते ठाम होते. त्यांची सेवा देण्याची तळमळ बघून नगरसेवक मुकुंद पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते अमित कासार यांनी त्यांना इंधनासाठी निधी देण्याचे ठरवले. त्यामुळे रेपाळ यांचा संकल्पसिद्धीस गेला.  लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून त्यांनी १०० हून अधिक जणांना रुग्णसेवा दिली आहे. म्हात्रेनगरमध्ये पेडणेकरांच्या कार्यालयासमोर त्यांचा थांबा असतो. अहोरात्र सेवा त्यांची सुरू आहे. रुग्णांची वेळ घेऊन ते त्या वेळेत उपलब्ध होतात. आणखी जेवढे दिवस लॉकडाऊन असेल तेवढे सगळे दिवस विनामूल्य सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. वाटेत जर कोणी पोलीस, नर्स, वाटसरु जरी अडकला असेल तर त्यांनाही ते सुविधा देतात. आतापर्यंत त्यांनी जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई, मुलुंड, घाटकोपर, कल्याण, डोंबिवली शहरभर सर्वत्र अशी सेवा दिली आहे. जास्ती करुन डायलीसीसचे रुग्ण असल्याचे ते सांगतात. त्यांची गैरसोय आणि पिडा बघवत नाही, मन विषीण्ण होत असल्याचे ते सांगतात. ईश्वराने सेवा करून घ्यावी आणि कोरोनामधून सगळ्यांची मुक्ती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे ते सांगतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस