शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

Coronavirus: रिक्षाचालक बनला देवदूत; रुग्णांना अहोरात्र मुंबईपर्यंत विनामूल्य सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 16:32 IST

आतापर्यंत त्यांनी १००हून अधिक रुग्णांना अत्यावश्यक सेवेपर्यंत विनामूल्य रिक्षा सेवा सुरू केली.  त्यामुळे एका अर्थाने रिक्षाचालक देवदूत बनून आल्याची भावना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

अनिकेत घमंडी,डोंबिवली: कोरोनामुळे राज्यात पंधरा दिवसांपासून लॉकडाऊन झालेले असतानाच अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणतीही सेवा सुरू नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. विशेषत: डायलिसीस, कॅन्सर, तसेच ज्यांना सतत रक्त चढवावे लागते, अशा रुग्णांचे सर्वाधिक हाल होत असून त्यांची जास्त गैरसोय झाली आहे. ज्यांना नित्याने उपचारासाठी मुंबईत जावे लागते अशांना वाहनसेवाच नसल्याने आपुले मरण पाहिले म्या डोळा अशी त्यांची स्थिती झाली आहे. रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन म्हात्रेनगर परिसरातील रहिवासी असलेले रुपेश रेपाळ या ज्येष्ठ रिक्षा चालकाने विनामूल्य सेवा देण्याचा संकल्प सोडला. आणि आतापर्यंत त्यांनी १००हून अधिक रुग्णांना अत्यावश्यक सेवेपर्यंत विनामूल्य रिक्षा सेवा सुरू केली.  त्यामुळे एका अर्थाने रिक्षाचालक देवदूत बनून आल्याची भावना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.देशभरात संकट आलेले असतानाच आपल्याकडून मातृभूमीची सेवा कशी होईल या प्रश्नाने रेपाळ अस्वस्थ झाले होते. पण रस्त्यावर वाहनेच येऊ द्यायची नसल्याने मनात असूनही रिक्षा चालवता येत नसल्याने त्यांची अडचण झाली होती. मग एकदा आरटीओ अधिका-यांना भेटून तरी येऊ, असे मनाशी त्यांनी ठरवले आणि ते कल्याणला गेले. आरटीओ अधिका-यांनीही रेपाळ यांचा हेतू चांगला असून त्यांना ‘आपात्कालीन सुविधा’ असे विशेष परमिट देऊ केले. आणि त्यामुळे रेपाळ यांचा सेवा करण्याचा संकल्प सिद्धीस आला. आता विनामूल्य सेवा देतांना कोणाकडून काही मागायचे नसले तरीही रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रिक्षेत सीएनजी भरावेच लागणार होते.आधीच व्यवसाय नसल्याने घरात पैसा नाही, कुटुंबीय देखील त्यामुळे हैराण आहेत. पण तरीही ते संकल्पावर ते ठाम होते. त्यांची सेवा देण्याची तळमळ बघून नगरसेवक मुकुंद पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते अमित कासार यांनी त्यांना इंधनासाठी निधी देण्याचे ठरवले. त्यामुळे रेपाळ यांचा संकल्पसिद्धीस गेला.  लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून त्यांनी १०० हून अधिक जणांना रुग्णसेवा दिली आहे. म्हात्रेनगरमध्ये पेडणेकरांच्या कार्यालयासमोर त्यांचा थांबा असतो. अहोरात्र सेवा त्यांची सुरू आहे. रुग्णांची वेळ घेऊन ते त्या वेळेत उपलब्ध होतात. आणखी जेवढे दिवस लॉकडाऊन असेल तेवढे सगळे दिवस विनामूल्य सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. वाटेत जर कोणी पोलीस, नर्स, वाटसरु जरी अडकला असेल तर त्यांनाही ते सुविधा देतात. आतापर्यंत त्यांनी जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई, मुलुंड, घाटकोपर, कल्याण, डोंबिवली शहरभर सर्वत्र अशी सेवा दिली आहे. जास्ती करुन डायलीसीसचे रुग्ण असल्याचे ते सांगतात. त्यांची गैरसोय आणि पिडा बघवत नाही, मन विषीण्ण होत असल्याचे ते सांगतात. ईश्वराने सेवा करून घ्यावी आणि कोरोनामधून सगळ्यांची मुक्ती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे ते सांगतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस